शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

तुरीची डाळ नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:37 IST

आयात बंदी, आवक घटण्यासह पावसाच्या अंदाजाने वाढताहेत भाव

जळगाव : कडधान्यावरील आयात बंदी, बाजारातील घटलेली आवक व आता मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजाने डाळींच्या भावात पुन्हा वाढ होऊ लागली असून तूर डाळीचे भाव तर नव्वदी पार गेले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तूर डाळीचे भाव ४०० ते ६०० रुपयांनी वाढून ते ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. या सोबतच सर्वच डाळींना महागाईचा तडका बसला असून त्यादेखील सरासरी ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढल्या आहेत. यात तीन वर्षांपासून दिलासा देणाऱ्या डाळींनी गृहिणींची चिंता पुन्हा एकदा वाढविली आहे.कमी पावसामुळे सुरुवातीपासून कडधान्याची आवक घटल्याने यंदा डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यात सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने भाववाढीत आणखी भर पडली. त्यानंतरही डाळींची आवक घटतच असल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव दर आठवड्याला वाढतच गेले. त्याची झळ थेट ग्राहकांच्या खिशाला बसू लागली.मान्सूनचे अंदाज डाळीच्या मूळावरआयात कमी असण्यासह सरकारी गोदामात असलेला व शेतकऱ्यांकडे असलेला माल संपत आल्याने तसेच आता पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणार असण्याचा अंदाजदेखील डाळींच्या भाववाढीस कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा जूनच्या शेवटी पाऊस येणार असल्याचे सांगितले जात असल्याने त्याचा भाववाढीवर मोठा परिणाम होत आहे.तीन वर्षानंतर पुन्हा चिंतातुरीचे उत्पादन कमी आल्याने २०१६मध्ये तूर डाळींचे भाव २०० ते २५० रुपये प्रती किलो झाले होते. त्या वेळी या डाळीने सर्वांचेच गणित कोलमडले होते. मात्र त्यानंतर तुरीचे उत्पादन वाढले व विदेशातूनही कच्च्या मालाची आवक सुरू असल्याने २०१७मध्ये डाळींचे भाव ५५ रुपये किलोवर आले होते. त्यानंतर त्यात थोडी-थोडी वाढ होत जावून ते मार्च २०१८मध्ये ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर पोहचले होते. असे असले तरी ते २०१८ अखेरपर्यंत ८० रुपये प्रती किलोच्या आसपास राहिले. मात्र त्यानंतर ते वाढत गेले. या आठवड्यात तर तूर डाळीच्या भावात थेट ४ ते ६ रुपये प्रती किलोने एकदम वाढून डाळ नव्वदी पार जात ८९ ते ९४ रुपये प्रती किलो झाली.नवीन तूर येण्यास वेळपावसाळा सुरू झाल्यानंतर उडीद-मूग आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकेल. मात्र नवीन तूर डिसेंबर-जानेवारीमध्ये येते. त्यामुळे ही तूर येण्यास सात ते आठ महिन्यांच्या कालावधी असल्याने तूर डाळीच्या भावात अधिक वाढ होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.सर्वच डाळींना महागाईचा तडकागेल्या आठवड्यात ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूरडाळीचे भाव ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. या सोबतच ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटलवरून ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.मागणी चांगली असल्याने व त्यात तुरीचा साठा संपत येत असल्याने तसेच कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी असल्याने सर्वच डाळींचे भाव वाढत आहे. यात तूर डाळीत सर्वाधिक वाढ होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.सध्या डाळींची आवक कमी झाली असून त्यात पाऊस लांबणार असल्याच्या अंदाजाने डाळींच्या भाववाढीस मदत होत आहे. यात तूर डाळ ९० रुपये प्रती किलोच्याही पुढे गेली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव