शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महामार्गावरील वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:06 IST

नशिबारादजवळ चौपदरीकरणाची डोकेदुखी : खड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला

प्रसाद धर्माधिकारी ।नशिराबाद : जळगाव -नशिराबाद -भुसावल महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागत आहेत. चौपदरीकरणाच्या कामामुळे ठिकठिकाणी वळण रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. मात्र वळण घेणार या रस्त्यावरच काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी डांबरच उखडल्याने वाहन चालवणे जिकरीचे ठरत मृत्यूला आमंत्रण दिले जात आहे. मात्र ढिम्म प्रशासन व ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे.जळगाव -नशिराबाद भुसावल महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चौपदरीकरणाचे काम दोन्ही बाजूंनी सुरू आहे. काही ठिकाणी खोदून ठेवल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनासह,डोळ्यांचा विकार होत आहे.प्रवाशांच्या जीवाशी पोरखेळचौपदरीकरणाच्या कामात नुकत्याच तयार केलेल्या रस्त्यांवर पावसाच्या अतिवषार्वाने अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहे. पर्यायी रस्त्यांच्या वळणांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. भादली चौफुली रोडवर महालक्ष्मी मंदिराजवळ माती मुरमाचा टेकडीच असल्याने रस्ता ओलांडताना शेतकऱ्यांसह नागरिकांना अतोनात हाल होत आहे.लोकप्रतिनिधी गप्प...जळगाव भुसावळ महामार्गावरून अनेक पुढारी ,लोकप्रतिनिधी ये जा करतात. मात्र त्यांनाही खड्ड्यांचा त्रास होत असला तरी कोणीही यावर आवाज उठवत नाही. लोकप्रतिनिधी याबाबत गप्प का? असा संताप व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर ये जा करतांना रस्ताही समजत नाही.त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कुंभकर्णी झोपी प्रशासन जागे कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहेखड्ड्यातून तारेवरची कसरतनशिराबाद उड्डाणपूल , डॉ उल्हास पाटील रुग्णालय, ते पुढील काही अंतरापर्यंत मोठ्या प्रमाणावर डांबर उघडले असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे त्यातच लगतच बाजूंना खोदून ठेवले असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तारेवरची कसरत म्हणजे एक सर्कस आहे. खड्डेयुक्त रस्ते, वळण रस्ते या ठिकाणी अनेकवेळा वाहने घसरून अपघातही होतं आहेत. अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.दूरदर्शन टावर जवळ तर डांबर मोठ्या प्रमाणात उखडले असून खड्डेच खड्डे वाढत आहे.मान पाठीचे दुखणे वाढले...रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना मान पाठ दुखण्याचे विकार जडले आहे. अनेकदा ओरड होवूनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची तसदी प्रशासन वा ठेकेदार घेत नसल्याने नागरिक प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव