शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:06 IST

नशिबारादजवळ चौपदरीकरणाची डोकेदुखी : खड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला

प्रसाद धर्माधिकारी ।नशिराबाद : जळगाव -नशिराबाद -भुसावल महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागत आहेत. चौपदरीकरणाच्या कामामुळे ठिकठिकाणी वळण रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. मात्र वळण घेणार या रस्त्यावरच काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी डांबरच उखडल्याने वाहन चालवणे जिकरीचे ठरत मृत्यूला आमंत्रण दिले जात आहे. मात्र ढिम्म प्रशासन व ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे.जळगाव -नशिराबाद भुसावल महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चौपदरीकरणाचे काम दोन्ही बाजूंनी सुरू आहे. काही ठिकाणी खोदून ठेवल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनासह,डोळ्यांचा विकार होत आहे.प्रवाशांच्या जीवाशी पोरखेळचौपदरीकरणाच्या कामात नुकत्याच तयार केलेल्या रस्त्यांवर पावसाच्या अतिवषार्वाने अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहे. पर्यायी रस्त्यांच्या वळणांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. भादली चौफुली रोडवर महालक्ष्मी मंदिराजवळ माती मुरमाचा टेकडीच असल्याने रस्ता ओलांडताना शेतकऱ्यांसह नागरिकांना अतोनात हाल होत आहे.लोकप्रतिनिधी गप्प...जळगाव भुसावळ महामार्गावरून अनेक पुढारी ,लोकप्रतिनिधी ये जा करतात. मात्र त्यांनाही खड्ड्यांचा त्रास होत असला तरी कोणीही यावर आवाज उठवत नाही. लोकप्रतिनिधी याबाबत गप्प का? असा संताप व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर ये जा करतांना रस्ताही समजत नाही.त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कुंभकर्णी झोपी प्रशासन जागे कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहेखड्ड्यातून तारेवरची कसरतनशिराबाद उड्डाणपूल , डॉ उल्हास पाटील रुग्णालय, ते पुढील काही अंतरापर्यंत मोठ्या प्रमाणावर डांबर उघडले असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे त्यातच लगतच बाजूंना खोदून ठेवले असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तारेवरची कसरत म्हणजे एक सर्कस आहे. खड्डेयुक्त रस्ते, वळण रस्ते या ठिकाणी अनेकवेळा वाहने घसरून अपघातही होतं आहेत. अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.दूरदर्शन टावर जवळ तर डांबर मोठ्या प्रमाणात उखडले असून खड्डेच खड्डे वाढत आहे.मान पाठीचे दुखणे वाढले...रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना मान पाठ दुखण्याचे विकार जडले आहे. अनेकदा ओरड होवूनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची तसदी प्रशासन वा ठेकेदार घेत नसल्याने नागरिक प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव