शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

तुका म्हणे विठो भरला सबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 21:10 IST

अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला तर प्रत्येक क्षण हा नवीन असतो

२०१८ हे वर्ष संपलं आणि नवीन २०१९ हे वर्ष सुरू होणार. अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला तर प्रत्येक क्षण हा नवीन असतो आणि संतांनी प्रत्येक क्षणाला महत्व दिले आहे. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठातील पहिल्याच अभंग बघा, ‘देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधियेला’ ज्ञानोबांच्या या चिंतनानुसार माणूस हा एक क्षण जगतो, त्यामुळे त्यांनी क्षणाचे महत्व विषद केले आहे. संत तुकोबांनी देखील काळाबद्दल सावधान केले आहे.आयुष्य खातो काळ सावधान !आपले आयुष्य काळाच्या तोंडात आहे, काळ कधी ग्रासेल ते सांगता येत नाही. म्हणूनच तुकोबांंनी स्पष्ट शब्दात माणसांना सूचित केले आहे.क्षणो- क्षणी हाचि करावा विचार ।तरावया पार भवसिंधू ।।प्रत्येक क्षणाचा विचार करावा आणि येणाऱ्या नवीन वर्षात एक संकल्प करावा की, माणसाच्या हातात काही नाही. या विश्वाचे उदरभरण करणाºया विश्वंभराला आठवावे. यासाठी संकल्प करु या! जेणे करुन आपल्या हातून चांगलेच होईल.एकदा संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करीत होते. त्यावेळी एक विज्ञानाधिष्ठित, बुद्धीप्रामाण्यवादी सद्गृहस्थ महाराजांच्या समोर येऊन बसले. त्या सद्गृहस्थाने महाराजांना सांगितले की, ‘मला बरेच लोक सांगतात की, मला पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तुम्हीच देऊ शकता. यावर महाराज नम्रपणे म्हणाले, ‘विचारा आपला प्रश्न काय आहे? त्या सद्गृहस्थाने प्रश्न विचारला ‘महाराज या जगात देव आहे का?’ यावर तुकोबांनी त्या सद्गृहस्थास सांगितले की, ‘आपण निवांत बसावे, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर नक्की देतो, परंतु तुम्ही त्याआधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या’ आणि तुकोबांनी विणेच्या तारावर बोट ठेविले व खालील अभंग गायला सुरुवात केली.‘चालें हे शरीर कोंणाचिये सत्ते।कोण बोलवितें हरी विण।।१।।देखली ऐकवी एक नारायण।तयाचें भजन चुकों नको।।२।।माणसाची देव चालवी अहंता।मीची एक कर्ता म्हणोनिया ।।३।।वृक्षाचेही पाने हाले त्याची सत्ता।राहिली अहंता मग कोंठे ।।४।।तुका म्हणे विठोे भरला सबाह्य।उणें काय आहे चराचरी।।५।।३०६६।।या अभंगात संत तुकाराम महाराजांनी चारही वेदांचे सार सांगितले. या सद्गृहस्थाचे समाधान झाले व त्याला कळले की, चराचरात विठ्ठल भरलेले आहेत. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी किती सरळ भाषेत वेदांत सांगितला. भोळ्या भाविकाला कळण्यासाठी तुकोबांची गाथा आहे. म्हणूनच या गाथेला ‘पंचमवेद’ असे म्हणतात. याचा सरळ अर्थ असा आहे की, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते याचा शोध घ्या. देखणे- ऐकणे या क्रिया कोणाच्या सत्तेने चालतात. याचा शोध घ्या, वृक्षाचे पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलते ही सत्ता दुसरी तिसरी कोणी नसून मायबाप पांडुरंग- श्रीहरी- विठ्ठल आहेत. याची जाणीव आपोआप होते.नववर्षानिमित्त आपणही तुकोबांच्या अभंगाचे चिंतन करावे. त्यामुळे आपोआप माणसाला समजते की, सर्व सृष्टी एका ईश्वरी सत्तेने चालत आहे. सर्व वाद, वितंडवाद, संशय सांडून श्रद्धा व भक्तीने विठ्ठलाचे भजन करावे, आपण सर्व समर्थ आहोत. श्री विठ्ठल समर्थ आहेत. असेच संत तुकाराम महाराजांना सांगायचे आहे.- डॉ.कैलास पाटील, जळगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव