शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

तुका म्हणे विठो भरला सबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 21:10 IST

अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला तर प्रत्येक क्षण हा नवीन असतो

२०१८ हे वर्ष संपलं आणि नवीन २०१९ हे वर्ष सुरू होणार. अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला तर प्रत्येक क्षण हा नवीन असतो आणि संतांनी प्रत्येक क्षणाला महत्व दिले आहे. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठातील पहिल्याच अभंग बघा, ‘देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधियेला’ ज्ञानोबांच्या या चिंतनानुसार माणूस हा एक क्षण जगतो, त्यामुळे त्यांनी क्षणाचे महत्व विषद केले आहे. संत तुकोबांनी देखील काळाबद्दल सावधान केले आहे.आयुष्य खातो काळ सावधान !आपले आयुष्य काळाच्या तोंडात आहे, काळ कधी ग्रासेल ते सांगता येत नाही. म्हणूनच तुकोबांंनी स्पष्ट शब्दात माणसांना सूचित केले आहे.क्षणो- क्षणी हाचि करावा विचार ।तरावया पार भवसिंधू ।।प्रत्येक क्षणाचा विचार करावा आणि येणाऱ्या नवीन वर्षात एक संकल्प करावा की, माणसाच्या हातात काही नाही. या विश्वाचे उदरभरण करणाºया विश्वंभराला आठवावे. यासाठी संकल्प करु या! जेणे करुन आपल्या हातून चांगलेच होईल.एकदा संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करीत होते. त्यावेळी एक विज्ञानाधिष्ठित, बुद्धीप्रामाण्यवादी सद्गृहस्थ महाराजांच्या समोर येऊन बसले. त्या सद्गृहस्थाने महाराजांना सांगितले की, ‘मला बरेच लोक सांगतात की, मला पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तुम्हीच देऊ शकता. यावर महाराज नम्रपणे म्हणाले, ‘विचारा आपला प्रश्न काय आहे? त्या सद्गृहस्थाने प्रश्न विचारला ‘महाराज या जगात देव आहे का?’ यावर तुकोबांनी त्या सद्गृहस्थास सांगितले की, ‘आपण निवांत बसावे, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर नक्की देतो, परंतु तुम्ही त्याआधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या’ आणि तुकोबांनी विणेच्या तारावर बोट ठेविले व खालील अभंग गायला सुरुवात केली.‘चालें हे शरीर कोंणाचिये सत्ते।कोण बोलवितें हरी विण।।१।।देखली ऐकवी एक नारायण।तयाचें भजन चुकों नको।।२।।माणसाची देव चालवी अहंता।मीची एक कर्ता म्हणोनिया ।।३।।वृक्षाचेही पाने हाले त्याची सत्ता।राहिली अहंता मग कोंठे ।।४।।तुका म्हणे विठोे भरला सबाह्य।उणें काय आहे चराचरी।।५।।३०६६।।या अभंगात संत तुकाराम महाराजांनी चारही वेदांचे सार सांगितले. या सद्गृहस्थाचे समाधान झाले व त्याला कळले की, चराचरात विठ्ठल भरलेले आहेत. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी किती सरळ भाषेत वेदांत सांगितला. भोळ्या भाविकाला कळण्यासाठी तुकोबांची गाथा आहे. म्हणूनच या गाथेला ‘पंचमवेद’ असे म्हणतात. याचा सरळ अर्थ असा आहे की, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते याचा शोध घ्या. देखणे- ऐकणे या क्रिया कोणाच्या सत्तेने चालतात. याचा शोध घ्या, वृक्षाचे पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलते ही सत्ता दुसरी तिसरी कोणी नसून मायबाप पांडुरंग- श्रीहरी- विठ्ठल आहेत. याची जाणीव आपोआप होते.नववर्षानिमित्त आपणही तुकोबांच्या अभंगाचे चिंतन करावे. त्यामुळे आपोआप माणसाला समजते की, सर्व सृष्टी एका ईश्वरी सत्तेने चालत आहे. सर्व वाद, वितंडवाद, संशय सांडून श्रद्धा व भक्तीने विठ्ठलाचे भजन करावे, आपण सर्व समर्थ आहोत. श्री विठ्ठल समर्थ आहेत. असेच संत तुकाराम महाराजांना सांगायचे आहे.- डॉ.कैलास पाटील, जळगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव