शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याची जातपंचायतीच्या जाचातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:55 IST

घटस्फोटानंतर पुन्हा संसार सुरू करणाºया चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देणाºया जात पंचायतीला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची वेळीच समज देऊन या प्रकरणी यशस्वी तोडगा काढण्यात यश मिळवले.

ठळक मुद्देघटस्फोटानंतर पुन्हा एकत्र संसार सुरू करणाºया आदिवासी दाम्पत्याची आपबितीअंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी पंचाना दिली वेळीच समजतब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया पंचासह आदिवासींचेही केले प्रबोधन

लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.१२ : कुंड्यापाणी ता. चोपडा येथील आदिवासी दाम्पत्याने घटस्फोट घेऊन नंतर पुन्हा एकत्र नांदण्यास सुरुवात केल्यावर जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार घालण्याची धमकी देत लाखाचा दंड केला, तो भरल्याशिवाय तुम्हाला एकत्र राहण्याचा अधिकार नाही असा निर्णयही कळविला. त्यामुळे या दाम्पत्याने अंनिस व पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी पंचांना कायद्याची जाणीव करून देत वेळीच समज दिली आणि पंचांचे डोळे उघडले. त्यांनी यापुढे जात पंचायतीकडून असे प्रकार घडणार नसल्याचे स्पष्ट कबूल करीत पावरा दाम्पत्याला पदरात घेतले. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.सातपुड्याच्या कुशीत वसलेले कुंड्यापाणी हे छोटेसे आदिवासी पाडा वजा खेडेगाव. तेथील बाळू नुरा पावरा याचा विवाह ६ वर्षापूर्र्वी जवळच असलेल्या वरगव्हाण ता. चोपडा येथील मुलीशी झाला. उभयतांचा संसार सुखरुप सुरु होता. त्यांना दोन अपत्ये झालीत . मध्यंतरी या दोघांमध्ये काही वाद निर्माण झाले. ते विकोपाला गेल्याने त्यांनी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे घटस्फोट घेऊन ते विभक्त राहू लागले. काही कालावधीनंतर दोघा नवरा बायकोमधील गैरसमज दूर होऊन वाद मिटला आणि ते पुन्हा संसार करण्यासाठी एकत्र आलेत.पंचांनी ठोठावला लाखाचा दंडदरम्यान, कुंड्यापाणी गावातील काही अशिक्षित पंचानी त्यांना एकत्र नांदण्यास मज्जाव केला. त्यांना पुन्हा एकत्र संसार करायचा असल्यास दोघा नवरा बायको यांना प्रत्येकी ५० हजार रुपये असा एक लाखांचा दंड ठोठावला. या गरीब आदिवासी दाम्पत्याला हा जाचक दंड भरणे शक्य नसल्याने त्यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस. कट्यारे यांच्या कडे आपली कैफियत मांडली. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी प्रा. कट्यारे, अंनिसचे चोपडा तालुकाध्यक्ष डॉ.अय्युब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रकुमार शिंपी यांनी अडावद पोलिस स्टेशन गाठून सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची भेट घेतली. या वेळी पिडीतांनी पंचानी लादलेल्या आर्थिक दंडात्मक शिक्षेबाबत आपबिती कथन केली. तेव्हा सपोनि हिरे यांनी कुंड्यापाणी येथील कथित पंचांना समक्ष बोलवून त्यांना मंजूर झालेल्या नवीन कायद्याची माहिती दिली. तर अंनिसच्या पदाधिकाºयांनी प्रबोधन करुन या अनिष्ट सामाजिक बहिष्काराच्या पध्दतीला पायबंद घालण्यासाठी बनविण्यात आलेल्या कायद्याबाबत पंचासह आदिवासी समुदायाचे उद्बोधन केले, आणि जातपंचायतीच्या जाचातून आदिवासी दाम्पत्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेत.गावकºयांनीही चूक मान्य करीत 'सामाजिक बहिष्कार' या अनिष्ट रुढीचे उच्चाटन करुन बाळू पावरा व त्याच्या पत्नीस यापुढे कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासन सपोनि जयपाल हिरे व अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिले. यावेळी रुपसिंग बारेला, वाहºया बारेला, वजीर बारेला, रेंमसिंग बारेला, किरना बारेला, सहाय्यक फौजदार विठ्ठल धनगर, हवालदार रविंद्र साळुंके आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Divorceघटस्फोटPolice Stationपोलीस ठाणे