शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याची जातपंचायतीच्या जाचातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:55 IST

घटस्फोटानंतर पुन्हा संसार सुरू करणाºया चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देणाºया जात पंचायतीला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची वेळीच समज देऊन या प्रकरणी यशस्वी तोडगा काढण्यात यश मिळवले.

ठळक मुद्देघटस्फोटानंतर पुन्हा एकत्र संसार सुरू करणाºया आदिवासी दाम्पत्याची आपबितीअंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी पंचाना दिली वेळीच समजतब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया पंचासह आदिवासींचेही केले प्रबोधन

लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.१२ : कुंड्यापाणी ता. चोपडा येथील आदिवासी दाम्पत्याने घटस्फोट घेऊन नंतर पुन्हा एकत्र नांदण्यास सुरुवात केल्यावर जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार घालण्याची धमकी देत लाखाचा दंड केला, तो भरल्याशिवाय तुम्हाला एकत्र राहण्याचा अधिकार नाही असा निर्णयही कळविला. त्यामुळे या दाम्पत्याने अंनिस व पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी पंचांना कायद्याची जाणीव करून देत वेळीच समज दिली आणि पंचांचे डोळे उघडले. त्यांनी यापुढे जात पंचायतीकडून असे प्रकार घडणार नसल्याचे स्पष्ट कबूल करीत पावरा दाम्पत्याला पदरात घेतले. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.सातपुड्याच्या कुशीत वसलेले कुंड्यापाणी हे छोटेसे आदिवासी पाडा वजा खेडेगाव. तेथील बाळू नुरा पावरा याचा विवाह ६ वर्षापूर्र्वी जवळच असलेल्या वरगव्हाण ता. चोपडा येथील मुलीशी झाला. उभयतांचा संसार सुखरुप सुरु होता. त्यांना दोन अपत्ये झालीत . मध्यंतरी या दोघांमध्ये काही वाद निर्माण झाले. ते विकोपाला गेल्याने त्यांनी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे घटस्फोट घेऊन ते विभक्त राहू लागले. काही कालावधीनंतर दोघा नवरा बायकोमधील गैरसमज दूर होऊन वाद मिटला आणि ते पुन्हा संसार करण्यासाठी एकत्र आलेत.पंचांनी ठोठावला लाखाचा दंडदरम्यान, कुंड्यापाणी गावातील काही अशिक्षित पंचानी त्यांना एकत्र नांदण्यास मज्जाव केला. त्यांना पुन्हा एकत्र संसार करायचा असल्यास दोघा नवरा बायको यांना प्रत्येकी ५० हजार रुपये असा एक लाखांचा दंड ठोठावला. या गरीब आदिवासी दाम्पत्याला हा जाचक दंड भरणे शक्य नसल्याने त्यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस. कट्यारे यांच्या कडे आपली कैफियत मांडली. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी प्रा. कट्यारे, अंनिसचे चोपडा तालुकाध्यक्ष डॉ.अय्युब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रकुमार शिंपी यांनी अडावद पोलिस स्टेशन गाठून सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची भेट घेतली. या वेळी पिडीतांनी पंचानी लादलेल्या आर्थिक दंडात्मक शिक्षेबाबत आपबिती कथन केली. तेव्हा सपोनि हिरे यांनी कुंड्यापाणी येथील कथित पंचांना समक्ष बोलवून त्यांना मंजूर झालेल्या नवीन कायद्याची माहिती दिली. तर अंनिसच्या पदाधिकाºयांनी प्रबोधन करुन या अनिष्ट सामाजिक बहिष्काराच्या पध्दतीला पायबंद घालण्यासाठी बनविण्यात आलेल्या कायद्याबाबत पंचासह आदिवासी समुदायाचे उद्बोधन केले, आणि जातपंचायतीच्या जाचातून आदिवासी दाम्पत्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेत.गावकºयांनीही चूक मान्य करीत 'सामाजिक बहिष्कार' या अनिष्ट रुढीचे उच्चाटन करुन बाळू पावरा व त्याच्या पत्नीस यापुढे कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासन सपोनि जयपाल हिरे व अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिले. यावेळी रुपसिंग बारेला, वाहºया बारेला, वजीर बारेला, रेंमसिंग बारेला, किरना बारेला, सहाय्यक फौजदार विठ्ठल धनगर, हवालदार रविंद्र साळुंके आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Divorceघटस्फोटPolice Stationपोलीस ठाणे