शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खरेदी-विक्री व्यवहारांच्या फेरफार नोंदी आता आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:53 IST

अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम

ठळक मुद्दे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून थेट तलाठ्यांकडे जाणार माहिती नागरिकांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही

जळगाव: दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीकृत दस्तांनुसार सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदी तहसीलदार कार्यालयातील फेरफार कक्षामार्फत न करता थेट तलाठ्यामार्फत करण्याची योजना जमा बंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांनी आखली आहे. त्यासाठी ७/१२वर जानेवारी २०१८ पासूनच्या सर्व खरेदी-विक्री व्यवहारांची फेरफार नोंद घेण्याची विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे.अशी असेल मोहीम१५ सप्टेंबर २०१८ रोजी तहसिलदारांनी दुय्यम निबंधक यांच्याकडून जानेवारी २०१८ पासून ते आजपर्यंतच्या सर्व खरेदी विक्री व्यवहारांच्या सूची क्र.२ च्या प्रती प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. १७ रोजी दुय्यम निबंधक यांच्याकडील सूची क्र.२ च्या प्रती तलाठी यांना देणे, १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत सूची क्र.२ वरून संगणकीकृत फेरफार घेतला आहे की नाही? याची तलाठी यांनी तपासणी करणे. २१ ते ३० सप्टेंबर दरम्यान तपासणीअंती घेण्यात न आलेल्या सूची क्र.२ ची आकडेवारी संकलीत करून संगणकीकृत फेरफार घेऊन नियमानुसार कार्यवाही करणे, ३१ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी यांनी सदर फेरफारांवर निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करणे, ३ नोव्हेंबर रोजी तहसिलदार यांनी तलाठी यांच्याकडून सदर फेरफारची माहिती संकलित करून जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करणे.अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेशया कार्यक्रमाची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून जानेवारी २०१८ पासूनच्या एकाही खरेदी-विक्री व्यवहाराची संगणकीकृत फेरफार नोंद घेण्याचे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ही कार्यवाही ठरवून दिलेल्या मुदतीत पार पाडून मोहीम यशस्वी करण्याचे व त्याबाबत अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.फेरफार कक्ष होणार बंदजमाबंदी आयुक्तांनी १ जुलै २०१८ रोजी दिलेल्या आदेशनुसार तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होणार असून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणीकृत झालेल्या दस्ताची माहिती थेट तलाठी लॉगइन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यापूर्वी संगणकीकृत सातबारा अद्यावत व अचूक असणे आव श्यक असल्याने जानेवारी २०१८ पासून झालेल्या सर्व खरेदी विक्री व्यवहारांच्या फेरफार नोंदी त्यावर आहेत की नाही? हे तपासून त्याची पूर्तता करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.नागरिकांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाहीखरेदी-विक्री व्यवहार केल्यानंतर त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी पूर्वी नागरिकांना तलाठ्याकडे फेºया माराव्या लागत असत. मात्र आता तो त्रास वाचणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहार झाल्यानंतर त्याची नोंद थेट तलाठ्याच्या संगणकीय लॉगइनवर जाईल. तलाठी ती नोंद तपासून इतर हक्की नोंद असल्यास संबंधीतांना नोटीस बजावेल. अन्यथा फेरफार नोंद सातबारावर घेऊन सातबारा अद्यावत करेल. पंधरा दिवसांनी संबंधीत अद्यावत नोंदीसह सातबारा संबंधीतांना आॅनलाईनवरूनही मिळू शकेल. त्यामुळे अडवणुकीचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा आहे.दुय्यम निबंधकांची जबाबदारी वाढणारया सुधारीत प्रणालीत खरेदी-विक्री करणाºयांची ओळख पटविण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकांवर येणार आहे.