शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

स्मृती शताब्दी वर्षातही बालकवींची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 13:22 IST

अनास्था

ठळक मुद्देजन्मस्थळासह स्मृतीस्थळावरही स्मारकाबाबत अडथळ््यांची शर्यतलौकीक वाढला, मात्र उपेक्षा कायम

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ - ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कवितांनी पिढ्यानपिढ्यांना भूरळ घातली, मात्र या कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे या महान कवीच्या स्मृती शताब्दी वर्षातही त्यांच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळाबाबत उपेक्षा कायम आहे.धरणागाव या जन्मगावी प्रस्तावित असलेले स्मारक मार्गी तर लागलेच नाही, शिवाय भादली (ता. जळगाव) रेल्वे स्टेशननजीक छोटेसे स्मृतीस्थळही रेल्वे वितारीकरणात विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.आपल्या अवघ्या २८ वर्षात मराठी साहित्यात ज्यांनी असामान्य शैली, सृजनशीलतेचा ठसा उमटविला. त्या बालकवी ठोंबरे यांच्या निधनास ५ मे २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाले. ५ मे २०१७ ते ५ मे २०१८ हे वर्ष त्यांचे स्मृतीशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. या वर्षातही स्मारकाच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच झाल्याने साहित्य प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.ज्या गावात त्यांचे रेल्वे अपघातात निधन झाले त्या जळगाव-भुसावळ दरम्यान भादली या छोट्या स्टेशनवर त्यांचे स्मृतीस्थळ आहे. एखाद्या व्यक्तीची आठवण नंतरच्या पिढीला असावी यासाठी स्मृतीस्थळ अथवा पुतळा उभारला जातो. मात्र दुर्दैव म्हणजे जन्मशताब्दी वर्षात भादली येथील स्मृतीस्थळ भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणात हटविण्याच्या हालाचाली सुरू आहेत. त्यामुळे साहित्यप्रेमी निराश झाले आहेत.लौकीक वाढला, मात्र उपेक्षा कायमबालकवींच्या कविता पाठ्यपुस्तकात शिकवण्यात येऊ लागल्या. परंतु ज्याठिकाणी बालकवींचा मृत्यू झाला त्या भादली येथे बालकवींच्या स्मृतींच्या कुठल्याच खाणा-खुणा दिसत नव्हत्या. १९९० मध्ये मध्य रेल्वेच्या पुढाकाराने छोटे स्मृतीस्थळ निर्माण झाले. या स्थळावरील धूळ त्यांच्या जन्मदिनी १३ आॅगस्टला आणि त्यांच्या स्मृतिदिनी ५ मे याच दिवशी दूर केली जाते.ज्या स्थळावर बालकवींचे हे स्मृतिस्थळ आहे त्या जागेवरून रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे. विस्तारीकरणात स्टेशन आणि हे स्मृतिस्थळं हे दोन्हीही हलविण्यात येत आहे. याबाबत हे स्मृतिस्थळ संरक्षीत करण्याची मागणी जैन उद्योग समुहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्याकडे केली आहे. हे स्थळही विस्तारीकरणात हलविले गेले तर १०० वर्षानंतर पुन्हा बालकवींचा मृत्यू होईल, असे किशोर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.धरणगाव येथेही स्मारक उभारण्याबाबत प्रस्तावित होते, मात्र तेही मार्गी लागत नसल्याने नाराजीचा सूर आहे. राज्याच्या कान्याकोपऱ्यात आपल्या काव्य पंक्तींनी भूरळ घालणाºया या कवीच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळी स्मारक आकाराला येऊन स्मृतीशताब्दी वर्षी तरी उपेक्षा दूर व्हावी, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असा विश्वास साहित्य प्रेमींनी व्यक्त केला आहे.असा ओढावला मृत्यूबालकवी ठोंबरे यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला हे दुर्दैव म्हणावे लागेल. ५ मे १९१८ रोजी भादली स्टेशनवर जात असताना केबिनपाशी पायवाट अरूंद असल्यामुळे ते रुळांच्या मध्यभागी चालू लागले. त्याचवेळी मागून आलेल्या रेल्वेने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.शंभर वषार्नंतर बालकवींचा दुसºयांदा मृत्यू होईलज्या स्थळावर बालकवींचे हे स्मृतिस्थळ आहे त्या जागेवरून रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे. विस्तारीकरणात स्टेशन आणि हे स्मृतिस्थळं हे दोन्हीही हलविण्यात येत आहे. याबाबत हे स्मृतिस्थळ संरक्षीत करण्याची मागणी जैन उद्योग समुहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्याकडे केली आहे. हे स्थळही विस्तारीकरणात हलविले गेले तर १०० वर्षानंतर पुन्हा बालकवींचा मृत्यू होईल, असे किशोर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.बालकवींचे जन्मस्थळ असलेल्या धरणगाव येथेही स्मारक उभारण्याबाबत प्रस्तावित होते, मात्र तेही मार्गी लागत नसल्याने नाराजीचा सूर आहे. इतक्या महान कवीबाबत मोठी आत्मीयता जळगाव जिल्हावासीयांना असून राज्याच्या कान्याकोपºयात आपल्या काव्य पंक्तींनी भूरळ घाळणाºया या कवीच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळी स्मारक आकाराला येऊन स्मृतीशताब्दी वर्षी तरी उपेक्षा दूर व्हावी, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असा विश्वास साहित्य प्रेमींनी व्यक्त केला आहे.असा ओढावला मृत्यूअत्यंत उच्च कोटीच्या कविता रचणारे बालकवी ठोंबरे यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला हे दुर्दैव म्हणावे लागेल. बालकवींचा मृत्यू म्हणजे आत्महत्या होती, असेही काही म्हटले जाते. ५ मे १९१८ रोजी भादली स्टेशनवर जाऊन गाडीत बसण्यासाठी बालकवी घरून निघाले. बालकवी लोहमार्गापाशी पोहचले आणि तारांच्या कुंपणातून आत शिरून रेल्वे रुळाला लागून असलेल्या पायवाटेने भादली स्थानकाकडे जात असताना केबिनपाशी पायवाट अरूंद असल्यामुळे ते रुळांच्या मधून चालू लागले. त्याचवेळी मागून भुसावळकडून येणाºया रेल्वेगाडीची शिट्टी त्यांना ऐकू आली. ज्या गडीने आपणास जावयाचे आहे तीच गाडी आली असावी असे वाटून ते पळू लागले. मेन लाईनमधून पळता पळता ते सांध्यापाशी आले. बाजूला काम करणाºयांनी त्यांना ओरडून बाजूला होण्यास सांगितले. गाडी मेन लाईनने पुढे जाईल असे वाटून ते रूळ सोडून सांध्यापाशी डाव्याबाजूच्या सायडिंग लाइनीत शिरले. किंचित पुढे जाऊन रूळांच्या बाहेर पडणार तोच मालगाडी त्याच सायडिंग रुळावर काढलेली होती. रुळांच्या बाहेर पडणार तोच जोडा रुळात अडकला आणि अनर्थ झाला. मागून आलेली गाडीचे इंजिन त्यांच्या अंगावरून गेले आणि क्षणार्थात बालकवींचा देह छिन्नविछिन्न झाला.

टॅग्स :Jalgaonजळगाव