शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

स्मृती शताब्दी वर्षातही बालकवींची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 13:22 IST

अनास्था

ठळक मुद्देजन्मस्थळासह स्मृतीस्थळावरही स्मारकाबाबत अडथळ््यांची शर्यतलौकीक वाढला, मात्र उपेक्षा कायम

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ - ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कवितांनी पिढ्यानपिढ्यांना भूरळ घातली, मात्र या कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे या महान कवीच्या स्मृती शताब्दी वर्षातही त्यांच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळाबाबत उपेक्षा कायम आहे.धरणागाव या जन्मगावी प्रस्तावित असलेले स्मारक मार्गी तर लागलेच नाही, शिवाय भादली (ता. जळगाव) रेल्वे स्टेशननजीक छोटेसे स्मृतीस्थळही रेल्वे वितारीकरणात विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.आपल्या अवघ्या २८ वर्षात मराठी साहित्यात ज्यांनी असामान्य शैली, सृजनशीलतेचा ठसा उमटविला. त्या बालकवी ठोंबरे यांच्या निधनास ५ मे २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाले. ५ मे २०१७ ते ५ मे २०१८ हे वर्ष त्यांचे स्मृतीशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. या वर्षातही स्मारकाच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच झाल्याने साहित्य प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.ज्या गावात त्यांचे रेल्वे अपघातात निधन झाले त्या जळगाव-भुसावळ दरम्यान भादली या छोट्या स्टेशनवर त्यांचे स्मृतीस्थळ आहे. एखाद्या व्यक्तीची आठवण नंतरच्या पिढीला असावी यासाठी स्मृतीस्थळ अथवा पुतळा उभारला जातो. मात्र दुर्दैव म्हणजे जन्मशताब्दी वर्षात भादली येथील स्मृतीस्थळ भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणात हटविण्याच्या हालाचाली सुरू आहेत. त्यामुळे साहित्यप्रेमी निराश झाले आहेत.लौकीक वाढला, मात्र उपेक्षा कायमबालकवींच्या कविता पाठ्यपुस्तकात शिकवण्यात येऊ लागल्या. परंतु ज्याठिकाणी बालकवींचा मृत्यू झाला त्या भादली येथे बालकवींच्या स्मृतींच्या कुठल्याच खाणा-खुणा दिसत नव्हत्या. १९९० मध्ये मध्य रेल्वेच्या पुढाकाराने छोटे स्मृतीस्थळ निर्माण झाले. या स्थळावरील धूळ त्यांच्या जन्मदिनी १३ आॅगस्टला आणि त्यांच्या स्मृतिदिनी ५ मे याच दिवशी दूर केली जाते.ज्या स्थळावर बालकवींचे हे स्मृतिस्थळ आहे त्या जागेवरून रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे. विस्तारीकरणात स्टेशन आणि हे स्मृतिस्थळं हे दोन्हीही हलविण्यात येत आहे. याबाबत हे स्मृतिस्थळ संरक्षीत करण्याची मागणी जैन उद्योग समुहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्याकडे केली आहे. हे स्थळही विस्तारीकरणात हलविले गेले तर १०० वर्षानंतर पुन्हा बालकवींचा मृत्यू होईल, असे किशोर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.धरणगाव येथेही स्मारक उभारण्याबाबत प्रस्तावित होते, मात्र तेही मार्गी लागत नसल्याने नाराजीचा सूर आहे. राज्याच्या कान्याकोपऱ्यात आपल्या काव्य पंक्तींनी भूरळ घालणाºया या कवीच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळी स्मारक आकाराला येऊन स्मृतीशताब्दी वर्षी तरी उपेक्षा दूर व्हावी, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असा विश्वास साहित्य प्रेमींनी व्यक्त केला आहे.असा ओढावला मृत्यूबालकवी ठोंबरे यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला हे दुर्दैव म्हणावे लागेल. ५ मे १९१८ रोजी भादली स्टेशनवर जात असताना केबिनपाशी पायवाट अरूंद असल्यामुळे ते रुळांच्या मध्यभागी चालू लागले. त्याचवेळी मागून आलेल्या रेल्वेने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.शंभर वषार्नंतर बालकवींचा दुसºयांदा मृत्यू होईलज्या स्थळावर बालकवींचे हे स्मृतिस्थळ आहे त्या जागेवरून रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे. विस्तारीकरणात स्टेशन आणि हे स्मृतिस्थळं हे दोन्हीही हलविण्यात येत आहे. याबाबत हे स्मृतिस्थळ संरक्षीत करण्याची मागणी जैन उद्योग समुहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्याकडे केली आहे. हे स्थळही विस्तारीकरणात हलविले गेले तर १०० वर्षानंतर पुन्हा बालकवींचा मृत्यू होईल, असे किशोर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.बालकवींचे जन्मस्थळ असलेल्या धरणगाव येथेही स्मारक उभारण्याबाबत प्रस्तावित होते, मात्र तेही मार्गी लागत नसल्याने नाराजीचा सूर आहे. इतक्या महान कवीबाबत मोठी आत्मीयता जळगाव जिल्हावासीयांना असून राज्याच्या कान्याकोपºयात आपल्या काव्य पंक्तींनी भूरळ घाळणाºया या कवीच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळी स्मारक आकाराला येऊन स्मृतीशताब्दी वर्षी तरी उपेक्षा दूर व्हावी, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असा विश्वास साहित्य प्रेमींनी व्यक्त केला आहे.असा ओढावला मृत्यूअत्यंत उच्च कोटीच्या कविता रचणारे बालकवी ठोंबरे यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला हे दुर्दैव म्हणावे लागेल. बालकवींचा मृत्यू म्हणजे आत्महत्या होती, असेही काही म्हटले जाते. ५ मे १९१८ रोजी भादली स्टेशनवर जाऊन गाडीत बसण्यासाठी बालकवी घरून निघाले. बालकवी लोहमार्गापाशी पोहचले आणि तारांच्या कुंपणातून आत शिरून रेल्वे रुळाला लागून असलेल्या पायवाटेने भादली स्थानकाकडे जात असताना केबिनपाशी पायवाट अरूंद असल्यामुळे ते रुळांच्या मधून चालू लागले. त्याचवेळी मागून भुसावळकडून येणाºया रेल्वेगाडीची शिट्टी त्यांना ऐकू आली. ज्या गडीने आपणास जावयाचे आहे तीच गाडी आली असावी असे वाटून ते पळू लागले. मेन लाईनमधून पळता पळता ते सांध्यापाशी आले. बाजूला काम करणाºयांनी त्यांना ओरडून बाजूला होण्यास सांगितले. गाडी मेन लाईनने पुढे जाईल असे वाटून ते रूळ सोडून सांध्यापाशी डाव्याबाजूच्या सायडिंग लाइनीत शिरले. किंचित पुढे जाऊन रूळांच्या बाहेर पडणार तोच मालगाडी त्याच सायडिंग रुळावर काढलेली होती. रुळांच्या बाहेर पडणार तोच जोडा रुळात अडकला आणि अनर्थ झाला. मागून आलेली गाडीचे इंजिन त्यांच्या अंगावरून गेले आणि क्षणार्थात बालकवींचा देह छिन्नविछिन्न झाला.

टॅग्स :Jalgaonजळगाव