शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

रावेर तालुक्यात पाण्याअभावी केळीची खोडे उपटून फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:27 IST

उटखेडा, ता. रावेर , जि.जळगाव : पाणी उपलब्ध नसल्याने केळीची खोडे उपटून केळी बागा कापून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली ...

ठळक मुद्देकेळी उत्पादक शेतकरी अडचणीतपाऊस कमी झाल्याने उद्भवली परिस्थिती

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : पाणी उपलब्ध नसल्याने केळीची खोडे उपटून केळी बागा कापून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.उटखेडासह परिसरात पूर्वी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असायचे. मोठ्या प्रमाणात केळीचे लागवड केली जात असे. पण तीन-चार वर्षापासून पावसाळा कमी प्रमाणात झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विहीर, बोअर, नद्या कोरडे राहिल्या. यामुळे उटखेडा परिसरातील बागायती शेती संकटात सापडला आहे.गेल्या १० महिन्यांपासून लेकराप्रमाणे सांभाळलेली केळी पाण्याअभावी कापण्यात आली आहे. शेतकºयांच्या डोळयातही दुष्काळाने पाणी आणले असून शेतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. केळी हे पीक संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यात व परिसरात पाणी मुबलक असाल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात असे. पण या वर्षात पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने केळी बागा धोक्यात आल्या आहेत.१० महिने सांभाळून दोन महिने शिल्लक राहिले असता पाण्याअभावी केळी कापून टाकण्यात येत आहे. केळी तिसवली होती. १० ते १२ पर्यंत केळीच्या फण्या टाकल्या होत्या. केळीसाठी भरपूर प्रमाणात खर्च करण्यात आला. केळीचे रोप, ठिबक, खत, फवारणी इत्यादींचा खर्च करण्यात आला होता. शेतकºयांनी स्वत: धडपड करून केळीच्या बागा जगविण्याचा प्रयत्न केला. पण आता खिशातलेही पैसे खर्च करून शेतकरी मोकळा झाला आहे. केळीच्या बागा कापताना काळजावर वार केल्याच्या वेदना झाल्या, अशा भावना शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर