शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

रावेर तालुक्यात पाण्याअभावी केळीची खोडे उपटून फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:27 IST

उटखेडा, ता. रावेर , जि.जळगाव : पाणी उपलब्ध नसल्याने केळीची खोडे उपटून केळी बागा कापून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली ...

ठळक मुद्देकेळी उत्पादक शेतकरी अडचणीतपाऊस कमी झाल्याने उद्भवली परिस्थिती

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : पाणी उपलब्ध नसल्याने केळीची खोडे उपटून केळी बागा कापून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.उटखेडासह परिसरात पूर्वी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असायचे. मोठ्या प्रमाणात केळीचे लागवड केली जात असे. पण तीन-चार वर्षापासून पावसाळा कमी प्रमाणात झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विहीर, बोअर, नद्या कोरडे राहिल्या. यामुळे उटखेडा परिसरातील बागायती शेती संकटात सापडला आहे.गेल्या १० महिन्यांपासून लेकराप्रमाणे सांभाळलेली केळी पाण्याअभावी कापण्यात आली आहे. शेतकºयांच्या डोळयातही दुष्काळाने पाणी आणले असून शेतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. केळी हे पीक संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यात व परिसरात पाणी मुबलक असाल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात असे. पण या वर्षात पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने केळी बागा धोक्यात आल्या आहेत.१० महिने सांभाळून दोन महिने शिल्लक राहिले असता पाण्याअभावी केळी कापून टाकण्यात येत आहे. केळी तिसवली होती. १० ते १२ पर्यंत केळीच्या फण्या टाकल्या होत्या. केळीसाठी भरपूर प्रमाणात खर्च करण्यात आला. केळीचे रोप, ठिबक, खत, फवारणी इत्यादींचा खर्च करण्यात आला होता. शेतकºयांनी स्वत: धडपड करून केळीच्या बागा जगविण्याचा प्रयत्न केला. पण आता खिशातलेही पैसे खर्च करून शेतकरी मोकळा झाला आहे. केळीच्या बागा कापताना काळजावर वार केल्याच्या वेदना झाल्या, अशा भावना शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर