शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

डोळयात मिरचीची पूड फेकून रस्तालूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 19:21 IST

तीन युवकांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दिव्यांग व्यावसायिकाला २० हजारात लुटल्याची घटना कमानी तांडा ते जांभूळ गावाच्या दरम्यान रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपहूर नजीकची घटनातीन जणांना अटक, समयसूचकतेमुळे दिव्यांग इसमाचे वाचले प्राण

मनोज जोशीपहूर ता. जामनेर : तीन युवकांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दिव्यांग व्यावसायिकाला २० हजारात लुटल्याची घटना कमानी तांडा ते जांभूळ गावाच्या दरम्यान रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. रस्ता लुटीसाठी वापरलेला बनावट कट्टा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोपाल सुखदेव भिवसने उर्फ चड्डी बाळू, अनिकेत कडूबा चौथे उर्फ दाऊद (रा. पहूर कसबे) आणि चेतन प्रकाश जाधव यांचा समावेश आहे. यातील सुखदेव याचे राजेद्र यांच्या दुकानात येणे जाण्याचा नेहमी संपर्क असून रविवारी पाळत ठेवून होता.मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र धोंडू पाटील या दिव्यांगाचे पहूर येथे कृषी निविष्ठा दुकान आहे. दररोज जांभूळ ते पहूर दुचाकीवरून ते ये_जा करतात. रविवारी रात्री ९ वाजेच्या राजेंद्र पाटील हे २० हजाराची रोकड घेऊन अविनाश संजय पवार या साथीदरासह घराकडे निघाले.कमानी तांडा व जांभुळ गावाच्या दरम्यान दुचाकीवरून तीन युवक मागावून आले आणि त्यांनी राजेद्र यांच्या डोळयात मिरचीची पूड फेकली. डोळयात पूड गेल्याने राजेद्र हे दुचाकीसह खाली पडले. ही संधी साधत या तीनही जणांनी त्यांच्याकडील पैसे काढून घेतले आणि जांभूळच्या दिशेने पळ काढला. परिस्थितीचे भान राखून राजेद्र पाटील हे जांभूळकडे न जाता ते कमानी तांडयाकडे परतले. यामुळे त्यांचा आणि सोबतच्या साथीदाराचा जीव वाचला कारण मारेकरी पुढे जाऊन दबा धरुन बसण्याची शक्यता होती.इकडे राजेद्र हे कमानी तांड्यात पोहोचले. तेथील युवकांना आपबीती सांगितली. पिंपळगाव बुद्रुक येथे रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.याचवेळी तीन जण पिंपळगावकडे येत असल्याची येत असल्याची माहिती काही युवकांना मिळाली. त्यांनी रस्त्यावर टायर टाकून दुचाकीस्वारांना अडविले आणि या तीनही जणांना चांगलाच चोप दिला आणि रात्री १२.३० वाजता या तीनही जणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनास्थळी बनावट गावठी कट्टाही आढळून आला.पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे यांनी सोमवारी घटनास्थळी जात माहिती घेतली. राजेद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तीन युवकांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.दुचाकी, बनावट कट्टा, एक हजार रोख जप्त केले आहे. सोमवारी जामनेर न्यायालयात हजर केले असता तीनही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर