शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून आव्हाणेसह तीन गावांनी ‘गिरणा’वर उभारले बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:30 IST

पाणी टंचाईवर उपाय योजना

ठळक मुद्देवाळूचा उपसा केल्यास खबरदार; ग्रामस्थांचा निर्धार‘गिरणा’ची दुर्दशा थांबवण्याचा संकल्प

जळगाव : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. हिवाळ्यातच अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये प्रचंड पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटू लागले असून, त्यामुळे तालुक्यातील आव्हाणे, खेडी व फूपनगरीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून गिरणा नदीवर तीन बंधारे उभारून गिरणा नदीचे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे गिरणा नदीतून वाळूची चोरटी वाहतूक थांबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.सात गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटलागिरणा नदीच्या पाच किमीच्या अंतरामध्येतच तीन बंधारे तयार केल्याने नदीचे लाखो लीटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे भूजल पातळीतदेखील वाढ होणार असून, उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामाना करावा लागणार नाही. खेडी, आव्हाणे व फुपनगरी तीन गावांसह धरणगाव तालुक्यातील आव्हाणी, दोनगाव, भोकणी व जळगाव तालुक्यातील वडनगरी या गावांच्यादेखील पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. सात गावांमधील तब्बल २० हजारहून अधिक नागरिकांना यामुळे फायदा होणार आहे.‘देर आये, दुरुस्त आये’आव्हाणे, खेडी व फुपनगरी हे तीन गावातील गिरणा नदीपात्रातून दरवर्षी बेसुमार वाळू उपसा होतो. यामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. केळीसाठी प्रसिध्द असलेल्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात कूपनलिका आटतात. यामुळे केळीची लागवडदेखील कमी होत आहे. तसेच काही गावांमध्ये पिण्याचा पाण्याचादेखील प्रश्न निर्माण होऊ लागल्याने उशिरा का होईना ग्रामस्थांना गिरणानदीचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गिरणा धरणातून काही दिवसांपूर्वी सोडलेले गिरणेच्या आवर्तनाचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला व पंधरा दिवसाच्या तीनही गावांनी आपआपल्या गिरणाकाठावर मातीचा बंधारा तयार केला आहे.बंधारा तयार करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाने श्रमदान केले. तसेच भविष्यात देखील प्रशासन किंवा ग्राम पंचायतीची मदत न घेता गावाच्या हितासाठी एकत्र येवून काम करण्याचा निर्धार या तीनही गावातील नागरिकांनी केला आहे.प्रशासनाची मदत न घेता उभारले बंधारेगिरणानदी लगत गेल्या चार वर्षांपासून सात बलून बंधारे मंजूर झाले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतीही तयारी शासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या तीन गावांमधील शेतकऱ्यांनी प्रशासन व शासनाची कोणतीही मदत न घेता हे बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. दिवाळीत गिरणेचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे हे पाणी अडविण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.फुपनगरीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रथम आपल्या गावातील नदीपात्रात बंधारा बांधला. केवळ तीन दिवसात हा बंधारा बांधून तयार झाला. त्यानंतर खेडीच्या ग्रामस्थांनी बंधारा तयार केला. या दोन गावांनी बांधलेला बंधारा पाहून आव्हाणेतील शेतकºयांनीदेखील बैठक घेतली व बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला.प्रत्येक गावातील जे मोठे बागायतदार शेतकरी होते. त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेण्यात आले तर इतर शेतकºयांकडून अडीच हजार रुपये घेण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी स्वखुशीने १ ते ५ हजार रुपयांची मदत केली. तसेच काही शेतकºयांनी माती आणून देण्याचा प्रस्ताव दिला तर काहींनी बंधाºयाच्या बांधकामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले.‘गिरणा’ची दुर्दशा थांबवण्याचा संकल्पगिरणा नदीतून वाळू उपशामुळे गिरणा नदीला बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, वाळूचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भविष्यात या तिनही गावांनी आपल्या नदी पात्रातून वाळू उपसा होऊ न देण्याचा संकल्प केला आहे. तसेच यासाठी प्रशासनाची कोणतीही मदत न घेता ग्रामस्थच पुढाकार घेणार आहेत.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव