शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रेल्वेतून पडल्याने तीन जणांचा मृत्यू; रावेरमध्ये दोन वेगवेगळ्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 21:33 IST

बोगीच्या दरवाज्याजवळ बसले होते.

किरण चौधरी

रावेर (जि. जळगाव) : रेल्वेतून पडल्याने दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटना शनिवारी रावेर रेल्वे स्थानकानजीक घडल्या. यात खंडवा येथील बॅन्ड पथकातील दोन तरुणांचा समावेश आहे.

रावेर तहसील कार्यालयातील निवृत्त कर्मचारी रतन राजाराम भालेराव (६३) हे रावेरहून भुसावळकडे रेल्वेने येत होते. गाडीने रावेर रेल्वे स्थानक सोडताच ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११:३० वाजता घडली.

दुसऱ्या घटनेत खंडवा येथील बॅन्ड पथकातील आकाश किशोर वेद आणि मोनू बल्लन मुंडले हे दोन तरुण पुष्पक एक्स्प्रेसने भुसावळ येथे लग्न समारंभासाठी येत होते. हे दोघे जण बोगीच्या दरवाज्याजवळ बसले होते. रावेर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बोगद्याजवळ दोघे जण खाली पडले. यातच दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :Accidentअपघात