शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

चाळीसगाव तालुक्यात तीन दिवसात गिरणा धरणातून पाण्याचे आर्वतन - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:05 IST

तालुक्यातील खरजाई व तरवाडे या गावाना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी

चाळीसगाव, जि. जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी चाळीसगाव तालुक्यातील खरजाई व तरवाडे या गावाना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी येत्या तीन दिवसात गिरणा धरणातून पाण्याचे आर्वतन सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने ३३०० कोटी रूपयांची भरपाई दिली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी या वेळी दिली. खरजाई, तरवाडे, ओझर या गावाची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गावाना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र विहीरीचे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भडगाव तालुक्यातील तांदलवाडी येथे भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रंशात सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आदी उपस्थित होते.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात ४ हजार क्विंटल हरभरा बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हडसन ता. पाचोरा येथील शेतकºयांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. सामनेर ता. पाचोरा येथे शेतकºयांशी संवाद साधला. त्यानंतर वडली ता. जळगाव येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या योजनांच्या ठिकाणी भारनियमन नको, अशी मागणी वडली ग्रमस्थांची पालकमंत्र्यांकडे केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव