शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

जळगावात वीज तार तुटून तीन बसेस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 17:25 IST

उच्च दाब क्षमतेच्या मुख्य वीज वाहिनीच्या खालूनचे गेलेली दुसरी वीज वाहिनीची तार तुटून ती खासगी बसवर पडल्याने वीज प्रवाहाने आगी लागून एकापाठोपाठ तीन बसेस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ घडली.तीन्ही बसेसमध्ये वीज प्रवाह उतरल्याने आगीचे लोळ उठत होते.

ठळक मुद्देमहामार्गावरील घटना २५ लाखाचे नुकसानमहामार्ग झाला ठप्प

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१  : उच्च दाब क्षमतेच्या मुख्य वीज वाहिनीच्या खालूनचे गेलेली दुसरी वीज वाहिनीची तार तुटून ती खासगी बसवर पडल्याने वीज प्रवाहाने आगी लागून एकापाठोपाठ तीन बसेस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ घडली.तीन्ही बसेसमध्ये वीज प्रवाह उतरल्याने आगीचे लोळ उठत होते.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव येथील विलास एन.देशपांडे यांच्या मालकीचे नशिराबाद शिवारात महामार्गावर दूरदर्शन टॉवरच्या समोर जगदंबा मोटर रिपेअरींग नावाचे गॅरेज आहे. त्याशिवाय प्रसन्न ट्रॅव्हर्ल्स म्हणूनही त्यांचा व्यवसाय आहे. या ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन बसेस (क्र.एम.एच.४३ एच.२०१ व एम.एच.०४ जी.५४४६) या गॅरेजवर बाहेर लावण्यात आलेल्या होत्या. जैन इरिगेशन कंपनीचीही एक बस दुरुस्तीसाठी आलेली होती. या तिन्ही बसेल शेजारीच होत्या. रविवारी दुपारी एक वाजता बसेसच्या वरुन गेलेल्या वीज वाहिनीची तार अचानक तुटली व ती जैन कंपनीच्या बसवर पडली. क्षणातच धूर निघून या बसने पेट घेतला. सीट, टायर आदी जळून खाक झाले. त्यानंतर ही आग शेजारच्या दोन्ही बसला लागली. अचानक झालेल्या आगीने महामार्ग ठप्प झाला होता.

पाच बंबाद्वारे विझविली आगआगीची माहिती मिळाल्यानंतर बसेसचे मालक विलास देशपांडे व त्यांचा मुलगा अभीजीत यांनी घटनास्थळ गाठून तातडीने मनपाच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अर्धा तासाच दोन बंब दाखल झाले. त्यानंतर जैन कंपनीचाही बंब दाखल झाला. दरम्यान, फोनकरुनही बंब उशिरा आल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. रविवारी महामार्गावर वाहतूक कमी होती, तरीही बंब उशिरा आले.वेळेवर बंब पोहचले असते तर कदाचित बसेसचे इतके नुकसान झाले नसते, असे देशपांडे यांचे म्हणणे आहे. या घटनेत २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही बसेस विना वापराच्या म्हणून या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. प्रासंगिक कराराने बसेस भाड्याने दिल्या जातात. स्वत:ची जागी असल्यानेच हा ठिकाणी लावण्यात आल्या होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा