शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

धरणगावातील झपाटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तलावातून काढला एक हजार ट्रॉली गाळ अन् केले नाला खोलीकरणही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:36 IST

महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.

ठळक मुद्देसंडे स्पेशलजलदूत फाऊंडेशनच्या तेली तलावाच्या खोलीकरणासाठी सरसावले मदतीचे हात

धरणगाव, जि.जळगाव : महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ‘जलदूत फाऊंडेशन’च्या माध्यमातून घेतलेला पुढाकार गावाला विकासाची वाट दाखवेल अशी आशा आहे. समाजातील सुशिक्षित लोकांची निष्क्रियता चिंताजनक आहे. मात्र २००१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसमोर आदर्श उभा केला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्चर, मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह, शासकीय अधिकारी, शिक्षक, व्यापारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून जलदूत संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा साठा, वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन,तलाव खोलीकरण, तलावाला जोडणारे नाले खोलीकरण, गावातील जलस्त्रोताची कामे आदी करणे असे कार्यक्रम हाती घेतले आहेत. उन्हाळ्यात होणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य या उपक्रमातून दूर करता येईल ही त्यामागची त्यांची भावना आहे.हे काम केले जोमानेपहिल्या टप्प्यात १३ मेपासून येथील तेली तलावाचे काम या माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणीतून सुरू करून तेली तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे, नाल्याची सफाई करणे ही कामे करण्यात आली. त्यात जेसीबी, पोकलॅण्ड, ट्रॅक्टरच्या माध्यमातून ९९० ट्रॉली गाळ तलावातून काढण्यात आला, तर २ हजार ८०० घनमीटर एवढी त्याची वाढ झाली. त्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता २८ लाख २० हजार लीटरने वाढल्याचा अंदाज आहे. तसेच तलावाला जोडलेला नाला जवळजवळ १ हजार मीटरपर्यत ७ फूट खोल व १० फूट रुंद खोदून पावसाळ्यात थेट रेल्वे स्टेशनकडून चिंतामणी मोरीया गांधी मळ्यालगत असलेल्या नाल्यातून सरळ तलावात पाणी जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.मदतीचे आवाहनजलदूत फाऊंडेशनने सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमाला पी.आर.हायस्कूल व बालकवी विद्यालयाच्या त्यांच्या २००१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, इतर प्रतिष्ठित व्यक्ती, कॉलनीवासीयांनी आर्थिक मदत दिली आहे. मात्र संस्थेचा उद्देश साध्य करण्यासाठी जास्तीच्या आर्थिक मदतीची गरज असून संस्थेने दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे.दमदार पावसाची प्रतीक्षागेल्या चार वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने गावागावात पाणीटंचाई भासत आहे. नदी-नाले,तलाव, धरणं बोअरवेल्स कोरडीठाक पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य सर्वत्र झाले आहे. या वर्षी दमदार पाणी पडावा अन् गाळ काढून खोल केलेला तलाव ओसंडून वाहावा, अशी प्रतीक्षा सर्वांना लागून आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDharangaonधरणगाव