शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

धरणगावातील झपाटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तलावातून काढला एक हजार ट्रॉली गाळ अन् केले नाला खोलीकरणही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:36 IST

महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.

ठळक मुद्देसंडे स्पेशलजलदूत फाऊंडेशनच्या तेली तलावाच्या खोलीकरणासाठी सरसावले मदतीचे हात

धरणगाव, जि.जळगाव : महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ‘जलदूत फाऊंडेशन’च्या माध्यमातून घेतलेला पुढाकार गावाला विकासाची वाट दाखवेल अशी आशा आहे. समाजातील सुशिक्षित लोकांची निष्क्रियता चिंताजनक आहे. मात्र २००१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसमोर आदर्श उभा केला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्चर, मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह, शासकीय अधिकारी, शिक्षक, व्यापारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून जलदूत संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा साठा, वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन,तलाव खोलीकरण, तलावाला जोडणारे नाले खोलीकरण, गावातील जलस्त्रोताची कामे आदी करणे असे कार्यक्रम हाती घेतले आहेत. उन्हाळ्यात होणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य या उपक्रमातून दूर करता येईल ही त्यामागची त्यांची भावना आहे.हे काम केले जोमानेपहिल्या टप्प्यात १३ मेपासून येथील तेली तलावाचे काम या माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणीतून सुरू करून तेली तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे, नाल्याची सफाई करणे ही कामे करण्यात आली. त्यात जेसीबी, पोकलॅण्ड, ट्रॅक्टरच्या माध्यमातून ९९० ट्रॉली गाळ तलावातून काढण्यात आला, तर २ हजार ८०० घनमीटर एवढी त्याची वाढ झाली. त्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता २८ लाख २० हजार लीटरने वाढल्याचा अंदाज आहे. तसेच तलावाला जोडलेला नाला जवळजवळ १ हजार मीटरपर्यत ७ फूट खोल व १० फूट रुंद खोदून पावसाळ्यात थेट रेल्वे स्टेशनकडून चिंतामणी मोरीया गांधी मळ्यालगत असलेल्या नाल्यातून सरळ तलावात पाणी जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.मदतीचे आवाहनजलदूत फाऊंडेशनने सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमाला पी.आर.हायस्कूल व बालकवी विद्यालयाच्या त्यांच्या २००१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, इतर प्रतिष्ठित व्यक्ती, कॉलनीवासीयांनी आर्थिक मदत दिली आहे. मात्र संस्थेचा उद्देश साध्य करण्यासाठी जास्तीच्या आर्थिक मदतीची गरज असून संस्थेने दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे.दमदार पावसाची प्रतीक्षागेल्या चार वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने गावागावात पाणीटंचाई भासत आहे. नदी-नाले,तलाव, धरणं बोअरवेल्स कोरडीठाक पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य सर्वत्र झाले आहे. या वर्षी दमदार पाणी पडावा अन् गाळ काढून खोल केलेला तलाव ओसंडून वाहावा, अशी प्रतीक्षा सर्वांना लागून आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDharangaonधरणगाव