शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट केस: मोठी कारवाई! हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक; उमरचे कॉल डिटेल्स ठरले महत्त्वाचे
2
Ditwah: 'दितवा' चक्रीवादळ कोणत्याहीक्षणी धडकणार; 'या' ३ राज्यांना रेड अलर्ट, ४७ उड्डाणे रद्द!
3
'रील'ची जीवघेणी नशा! वडिलांनी हटकले म्हणून BBA करणाऱ्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
4
सरकारी गॅरंटीसह दुप्पट फायदा! पोस्ट ऑफिसच्या 'या' FD स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास मिळेल बंपर रिटर्न!
5
रेल्वे अचानक दोन भागात विभागली, बंगळुरू स्पेशल एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला; आराजवळ कपलिंग तुटले
6
Sanchar Saathi: एका महिन्यात ५० हजारांहून अधिक हरवलेले मोबाईल परत; 'हे' सरकारी ॲप ठरले गेमचेंजर! 
7
महिला कॉन्स्टेबलने आयुष्य संपवले, मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहिले हे; धक्कादायक कारण आले समोर
8
बेस्ट, टाटालाता अदाणी देणार आता टक्कर; धारावीत वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धा
9
सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन एफआयआर दाखल
10
IND vs SA 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा उतरणार मैदानात! कुठं अन् कसा पाहता येईल सामना?
11
Mohan Bhagwat: वाद करणे हा भारताचा स्वभाव नाही, सहकार्य- एकत्र चालण्याची संस्कृती- भागवत
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना फायदा, मनासारखे घडेल; धनलाभ, ६ राशींना त्रासाचा, काळजी घ्या!
13
‘फक्त ६ जणच आलेत, बाकीचे कुठे आहेत’? राहुल गांधींचा सवाल, नेते म्हणाले आपले एवढेच आमदार जिंकलेत
14
सेहरा सजा के रखना! पूजा बिरारीच्या हातावर रंगली मेहंदी; सोहम बांदेकर म्हणतो, 'बापरे...'
15
भारत-रशियात लष्करी कराराची शक्यता; पुतीन भारत दौऱ्यावर, तज्ज्ञ काय म्हणतात ?
16
आजचे राशीभविष्य, ३० नोव्हेंबर २०२५: मेष-मिथुनसाठी उत्साह, कन्या-तूळ राशीला सुख-समृद्धी; वाचा तुमचे भविष्य
17
कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका
18
"धरमजी अमर आहेत...", दिल्लीहून परत येताच शत्रुघ्न सिन्हांनी घेतली देओल कुटुंबाची भेट
19
सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर
20
मुंबई-पुणे कॉरिडॉर : भारताच्या नव्या सेवा अर्थव्यवस्थेचा बूस्टर, नीती आयोगाचा अहवाल
Daily Top 2Weekly Top 5

त्या १८ कर्मचाऱ्यांची अखेर बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST

जळगाव : जिल्हा परिषदेच्या सेवेत एकाच विभागात पाच वर्षे सेवा झाल्यानंतरही १२ वरिष्ठ व ६ कनिष्ठ सहाय्यकांची बदली झालेली ...

जळगाव : जिल्हा परिषदेच्या सेवेत एकाच विभागात पाच वर्षे सेवा झाल्यानंतरही १२ वरिष्ठ व ६ कनिष्ठ सहाय्यकांची बदली झालेली नव्हती. अखेर सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी याबाबत आदेश देत या कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली केली आहे. बुधवारी तातडीने ही प्रक्रिया राबविण्यात आली.

मंगळवारी परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने या कर्मचाऱ्यांची फाईल सीईओंनी हाती घेतली. शासकीय नियमानुसार एका विभागात ५ वर्षे व एका टेबलवर ३ वर्षे सेवा दिल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांची बदली होते. मात्र, या १८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची अशी बदली झालेली नव्हती. शिवाय काही सदस्यांकडून याबाबत तक्रारीही झालेल्या होत्या. यात बांधकाम व शिक्षण विभाग प्रत्येकी ४, ग्रामपंचायत ३, कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा व महिला व बालकल्याण १ अशा बदल्या करण्यात आल्या असून ३० सप्टेंबर रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे.

रखडलेल्या पदोन्नत्या दिल्या

१८ परिचर कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून या पदोन्नत्या रखडल्या होत्या. या पदोन्नतीची प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात आली. दरम्यान, आरोग्य विभागात आता पुरेसे मनुष्यबळ असल्याने त्या ठिकाणच्या रखडलेल्या पदोन्नत्याही लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे.