शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्यांचे कौतुक नाही, अन् कामचुकारांना धाक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 13:02 IST

हितेंद्र काळुंखेकौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.जिल्हा परिषदेत हे खराब चित्र पहायला मिळत आहे. ग्रामसेवकांना दिला जाणारा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुुरस्कार हा गेल्या तीन वर्षांपासून ...

हितेंद्र काळुंखेकौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.जिल्हा परिषदेत हे खराब चित्र पहायला मिळत आहे. ग्रामसेवकांना दिला जाणारा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुुरस्कार हा गेल्या तीन वर्षांपासून जाहीर झालेला नाही. यामुळे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असतानाही याची दखल घेण्यास संबंधित अधिकारी तयार नाही. ही एक प्रकारे मनमानीच म्हणावी लागेल.यामुळे ग्रामसेवकांमध्ये निराशाही निर्माण झाली आहे. ग्रामसेवक हा ग्रामीण भागातील विकासाच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहे. यापैकी काही ग्रामसेवक हे भ्रष्टाचार, गैरकारभार, अकार्यक्षमता आदीमुळे विकासाऐवजी गाव भकास करण्याचे काम करत असताना काही ग्रामसेवक हे खरोखर चांगले काम करणारेही आहेत. अशा ग्रामसेवकांच्या कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. यासाठी ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ सारखी योजना असतानाही ही योजनाच जळगाव जिल्हा परिषदेने गुंडाळल्यासारखी स्थिती आहे.याबाबत ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांच्याकडे हा प्रश्न केला असता डिसेंबर १७ च्या आत तिन्ही वर्षाचे पुरस्कार जाहीर केले जातील असे जाहीर केले होते. परंतु डिसेंबर उलटून साडेतीन महिने झाले तरीही काहीच हालचाली झाल्या नाहीत. दरम्यान गेल्या सर्वसाधारण सभेतही हा प्रश्न उपस्थित झाला असतानाही बोटे यांनी लवकरच पुरस्कार जाहीर करु, असे सांगितले परंतु महिना उलटला तरीही काहीच हालचाल झालेली दिसत नाही.एकीकडे चांगल्या ग्रामसेवकांना प्रोत्साहन दिले जात नसताना दुसरीकडे कामचुकार आणि भ्रष्ट ग्रामसेवकांवर कारवाईसाठीही सरपंच, ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना न्यायासाठी झगडावे लागत आहे. तरीही न्याय मिळत नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. अशा ग्रामसेवकांवरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र चांगल्यांचे कौतुक होत नाही, अन् कामचुकारांनाही धाक राहिला नाही...अशी स्थिती निर्माण झाली आहे, असेच एकूण स्थितीबद्दल म्हणात येईल. यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव