शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काँग्रेसमध्ये कुठेही फूट नाही, डॉ.केतकी पाटीलही भाजपात जाणार नाहीत; प्रदीप पवार यांचे स्पष्टीकरण

By सुनील पाटील | Updated: August 30, 2023 17:58 IST

जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कॉग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे.

जळगाव : शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. काँग्रेसमध्ये फूट पडत नसल्याचे पाहून विरोधक पक्ष प्रवेश व फुटीच्या वावड्या उठवत आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या लोकसभेत भाजपच्या उमेदवार असतील अशा वावड्या उठविल्या जात आहेत, मात्र त्या कधीही काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत असा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बुधवारी केला.

जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कॉग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी प्रदीप पवार यांनी शनिवारी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली असता त्यात त्यांनी पक्षफुटीबाबत होत असलेल्या चर्चा व अफवांबाबत स्पष्टीकरण केले. काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा डेटा ऑनलाईन आहे. जो कोणी पक्षाचा कधी सदस्यच नाही. कोणी तरी कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो आणि तो काँग्रेसचा आहे, काँग्रेसमध्ये खिंडार पडले असे विरोधकांकडून भासविले जात असून दिशाभूल केला जात आहे. कॉग्रेसमध्ये कदापीही फूट पडणार नाही. डॉ.उल्हास पाटील कॉग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रस्थानी आहेत, त्यांनीही आपण व मुलगी कधीही कॉग्रेस सोडणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे तरी देखील काही जण वावड्या उठवत असल्याचे पवार म्हणाले.

आज इंडिया जितेगाचा आनंदोत्सव

भाजप विरोधी पक्षांनी इंडिया नावाने आघाडी उघडली आहे. लोकसभेत हीच आघाडी जिंकणार असल्याने त्याचा आनंदोत्सव गुरुवारी प्रत्येक तालुक्यात केला जाणार आहे. जळगाव शहरात कॉग्रेस भवनात हा जल्लोष होईल.

सोनिया व राहूल गांधींच्या स्वागताला २०० कार्यकर्ते जाणार

मुंबईत १ सप्टेबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यासाठी सोनिया गांधी, राहूल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे दुपारी एक वाजता मुंबईत दाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते कॉग्रेसचे मुख्यालय टिळक भवनापर्यंत मानवी साखळी तयार केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जळगावातून २०० कार्यकर्ते गुरुवारी रात्री मुंबईला रवाना होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव