शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जनावरांच्या बळींची संख्या तीनेशेपार! लम्पी’ची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 15:42 IST

दीडशे पशुधनांचा बळी एकट्या चाळीसगाव तालुक्यात

कुंदन पाटील

जळगाव : ‘लम्पी’ने जिल्हाभर पाय पसरविले असताना उपाययोजना म्हणून आठवडे बाजार बंद केले.लसीकरण मोहिमही पार पाडली. मात्र तरीही पशुधनांच्या बळींच्या संख्येचे ३०० चा आकडा पार केल्याने शेतकऱ्यांमध्ये दाराशी चिंतेचे ढग जमले आहेत.

गेल्यावर्षी ‘लम्पी’मुळे जामनेर, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्याला मोठा फटका बसला होता. यंदा मात्र एकट्या चाळीसगाव तालुक्यात १५० जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन चाळीसगावच्या दिमतीला धावले आहे. मात्र ऐन हंगामात पशुधनाची गरज पडत असल्याने शेतकरीही प्रशासनाच्या आवाहनाला दाद द्यायला तयार नाही. त्यामुळे निव्वळ दुर्लक्षपणामुळे जनावरांचे बळी जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

९१९ जनावरे बाधीत

२५ सप्टेंबर अखरेपर्यंत जिल्ह्यात ९१९ जनावरे लम्पीमुळे बाधीत झाले आहेत. त्यात पाचोरा तालुक्यात २०७, अमळनेरला ४१, एरंडोल १२८, चाळीसगाव १८९, भडगावमध्ये १४२ जनावरे बाधीत आहेत.रावेर व धरणगावमध्ये अनुक्रमे ६० व ४८ जनावरे बाधीत आहेत. धरणगाव तालुक्यात आतापर्यंत ४८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

चार तालुक्यात बळी नाही

बोदवड, मुक्ताईनगर, चोपडा, यावल तालुक्यात सुदैवाने एकाही पशुधनाचा बळी गेलेला नाही. या चार तालुक्यांपैकी यावल, मुक्ताईनगर व भुसावळमध्ये सस्यस्थितीला एकही जनावर बाधीत नाही.

४ हजारांवर बाधीत

लम्पीचा प्रादुर्भावानंतर जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ४१ जनावरे बाधीत झाली आहेत. त्यातील २७९७ जनावरे बरी झाली आहेत.तर ३०५ जनावरांचा बळी गेला आहे.

तालुकानिहाय पशुधनांचे बळी

जळगाव-०२पाचोरा-३७अमळनेर-१४यावल-००एरंडोल-२६भुसावळ-००चाळीसगाव-१५७जामनेर-०२भडगाव-३१चोपडा-०७रावेर-००धरणगाव-०९पारोळा-२०मुक्ताईनगर-००बोदवड-००शेतकऱ्यांनी काळजी घेणे, हाच महत्त्वाचा विषय आहे. मात्र हंगामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून नाईलाजास्तव दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे तरी गोठा स्वच्छसह उपचारासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन करतो.

-डॉ.शामकांत पाटील, उपायुक्त,पशुसंवर्धन विभाग.