शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

जनावरांच्या बळींची संख्या तीनेशेपार! लम्पी’ची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 15:42 IST

दीडशे पशुधनांचा बळी एकट्या चाळीसगाव तालुक्यात

कुंदन पाटील

जळगाव : ‘लम्पी’ने जिल्हाभर पाय पसरविले असताना उपाययोजना म्हणून आठवडे बाजार बंद केले.लसीकरण मोहिमही पार पाडली. मात्र तरीही पशुधनांच्या बळींच्या संख्येचे ३०० चा आकडा पार केल्याने शेतकऱ्यांमध्ये दाराशी चिंतेचे ढग जमले आहेत.

गेल्यावर्षी ‘लम्पी’मुळे जामनेर, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्याला मोठा फटका बसला होता. यंदा मात्र एकट्या चाळीसगाव तालुक्यात १५० जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन चाळीसगावच्या दिमतीला धावले आहे. मात्र ऐन हंगामात पशुधनाची गरज पडत असल्याने शेतकरीही प्रशासनाच्या आवाहनाला दाद द्यायला तयार नाही. त्यामुळे निव्वळ दुर्लक्षपणामुळे जनावरांचे बळी जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

९१९ जनावरे बाधीत

२५ सप्टेंबर अखरेपर्यंत जिल्ह्यात ९१९ जनावरे लम्पीमुळे बाधीत झाले आहेत. त्यात पाचोरा तालुक्यात २०७, अमळनेरला ४१, एरंडोल १२८, चाळीसगाव १८९, भडगावमध्ये १४२ जनावरे बाधीत आहेत.रावेर व धरणगावमध्ये अनुक्रमे ६० व ४८ जनावरे बाधीत आहेत. धरणगाव तालुक्यात आतापर्यंत ४८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

चार तालुक्यात बळी नाही

बोदवड, मुक्ताईनगर, चोपडा, यावल तालुक्यात सुदैवाने एकाही पशुधनाचा बळी गेलेला नाही. या चार तालुक्यांपैकी यावल, मुक्ताईनगर व भुसावळमध्ये सस्यस्थितीला एकही जनावर बाधीत नाही.

४ हजारांवर बाधीत

लम्पीचा प्रादुर्भावानंतर जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ४१ जनावरे बाधीत झाली आहेत. त्यातील २७९७ जनावरे बरी झाली आहेत.तर ३०५ जनावरांचा बळी गेला आहे.

तालुकानिहाय पशुधनांचे बळी

जळगाव-०२पाचोरा-३७अमळनेर-१४यावल-००एरंडोल-२६भुसावळ-००चाळीसगाव-१५७जामनेर-०२भडगाव-३१चोपडा-०७रावेर-००धरणगाव-०९पारोळा-२०मुक्ताईनगर-००बोदवड-००शेतकऱ्यांनी काळजी घेणे, हाच महत्त्वाचा विषय आहे. मात्र हंगामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून नाईलाजास्तव दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे तरी गोठा स्वच्छसह उपचारासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन करतो.

-डॉ.शामकांत पाटील, उपायुक्त,पशुसंवर्धन विभाग.