शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

"सध्याच्या राजकारणाचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील"

By सुनील पाटील | Updated: February 14, 2024 15:30 IST

आमदार सत्यजित तांबे : एक वर्षाच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा

जळगाव : सध्याची राजकीय परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. जे राजकारण सुरु आहे, त्याचे परिणाम माझ्या पीढीसह येणाऱ्या पीढीलाही भोगावे लागतील अशी चिंता व्यक्त करतानाच वैचारिक व प्रशासकीय स्थैर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट मत आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी त्यांनी एक वर्षाच्या कामगिरीचा आढावा सादर केला.

कॉग्रेसचे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय फोडाफाडीचे जे राजकारण सुरु आहे, त्यावर तांबे यांनी प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते, आपण अर्थ काढतो तशी नसतेच. शेवटी कोणी कोणाला पकडून आणत नाही. ज्यांना यायचे ते सर्व विचार करुनच स्वत:पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात येतात. हे प्रकार आताच होतात असे नाही. याआधी देखील देशात व महाराष्ट्रात असे प्रयोग झालेले आहेत, आता तात्काळ होताच इतकाच फरक आहे. जळगावातून डॉ.उल्हास पाटील कॉग्रेस सोडून गेले, जिल्ह्यात पक्षाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, या प्रश्नावर तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मी स्वत:च कॉग्रेस पक्षात नाही, त्यामुळे यावर बोलणे उचित नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत ३५० ते ४०० जागा येतील असा ठाम विश्वास भाजपला आहे, तर मग अशी फोडाफाडीची गरज का भासतेय या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणं टाळले. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फोडाफाडीच्या राजकारणावर जे मत व्यक्त केले, त्याचे मात्र त्यांनी समर्थन केले. सरकसकट सर्वच मुलींना मोफत शिक्षण हवे

आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क हे आता राज्य शासन भरणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करतानाच सरसकट सर्वच मुलींना मोफत शिक्षण मिळायला हवे असे मत तांबे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेCrime Newsगुन्हेगारी