शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘लव्ह बर्डस्‌’च्या डोक्यावर ‘कावळा’, प्रेमविवाहांचा दूर लोटला सोहळा! पितृपक्षात अवघ्या दोघांनीच उरकले ‘शुभमंगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 18:10 IST

पितृपक्षात शुभकार्य करु नये, हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे.

 कुंदन पाटील 

 जळगाव : पितृपक्षात शुभकार्य करु नये, हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे. या गैरसमजापासून प्रेमवीरही दूर नाहीत. म्हणूनच पितृपक्षात प्रेमविवाह करणाऱ्यांची संख्या अचानक घसरली आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयातील अक्षदांचा रंगही आता फिका पडायला लागला आहे. यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. १४ ऑक्टोबरला पितृपक्ष संपेल. पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालण्यासाठी प्राधान्य दिले जाते.श्राद्ध पक्ष १५ दिवसांचा असतो. श्राद्ध पक्ष भाद्र शुक्ल पौर्णिमेपासून अश्विन कृष्ण अमावस्यापर्यंत होतो. या १५ दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, असा समज समाजमनात असतो. पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी केल्यास किंवा शुभकार्य उरकल्यास पितरांची नाराजी ओढावली जाते, असा दावाही काही जण करतात. पितृ पक्षाच्या काळात खरेदी केलेल्या वस्तू पितरांना समर्पित मानल्या जातात. हाच धागा प्रेमवीरांच्या मनालाही शिवला आहे.

विवाहनोंदणी ओसरलीयंदाच्या वर्षभरात सप्टेंबर महिन्यांपर्यंत २०६ विवाहांची नोंदणी झाली.त्यात सर्वाधिक प्रेमविवाहांचा समावेश आहे. मात्र पितृपक्ष लागल्याने अनेकांनी प्रेमविवाहांच्या नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगावच्या दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील वऱ्हाडींनी शासकीय ‘वरमाला’ गुंडाळून ठेवल्या आहेत.

५१ हजारांची ‘दक्षिणा’दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील विवाहनोंदणीपोटी यंदा ५१ हजार ९९५ रुपयांची फी वसुल करण्यात आली आहे. पितृपक्षात भरण्याची रक्कम आटल्याने शासकीय तिजोरीतील ‘दक्षिणा’चा कप्पाही सध्या रिकामाच आहे.

गेल्या ९ महिन्यातील विवाहनोंदणीमहिना-विवाह नोंदणीजानेवारी-४७फेब्रुवारी-४०मार्च-२९एप्रिल-२६मे-२९जून-११जुलै-०१ऑगस्ट-००सप्टेंबर २३कोट

सध्या विवाहनोंदणीपूर्वीची प्रक्रिया व विवाहबद्ध होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अनेक जण पितृपक्षानंतर विवाहबद्ध होऊ, असे सांगताना दिसतात. -संजय ठाकरे, दुय्यम उपनिबंधक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न