शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘लव्ह बर्डस्‌’च्या डोक्यावर ‘कावळा’, प्रेमविवाहांचा दूर लोटला सोहळा! पितृपक्षात अवघ्या दोघांनीच उरकले ‘शुभमंगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 18:10 IST

पितृपक्षात शुभकार्य करु नये, हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे.

 कुंदन पाटील 

 जळगाव : पितृपक्षात शुभकार्य करु नये, हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे. या गैरसमजापासून प्रेमवीरही दूर नाहीत. म्हणूनच पितृपक्षात प्रेमविवाह करणाऱ्यांची संख्या अचानक घसरली आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयातील अक्षदांचा रंगही आता फिका पडायला लागला आहे. यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. १४ ऑक्टोबरला पितृपक्ष संपेल. पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालण्यासाठी प्राधान्य दिले जाते.श्राद्ध पक्ष १५ दिवसांचा असतो. श्राद्ध पक्ष भाद्र शुक्ल पौर्णिमेपासून अश्विन कृष्ण अमावस्यापर्यंत होतो. या १५ दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, असा समज समाजमनात असतो. पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी केल्यास किंवा शुभकार्य उरकल्यास पितरांची नाराजी ओढावली जाते, असा दावाही काही जण करतात. पितृ पक्षाच्या काळात खरेदी केलेल्या वस्तू पितरांना समर्पित मानल्या जातात. हाच धागा प्रेमवीरांच्या मनालाही शिवला आहे.

विवाहनोंदणी ओसरलीयंदाच्या वर्षभरात सप्टेंबर महिन्यांपर्यंत २०६ विवाहांची नोंदणी झाली.त्यात सर्वाधिक प्रेमविवाहांचा समावेश आहे. मात्र पितृपक्ष लागल्याने अनेकांनी प्रेमविवाहांच्या नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगावच्या दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील वऱ्हाडींनी शासकीय ‘वरमाला’ गुंडाळून ठेवल्या आहेत.

५१ हजारांची ‘दक्षिणा’दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील विवाहनोंदणीपोटी यंदा ५१ हजार ९९५ रुपयांची फी वसुल करण्यात आली आहे. पितृपक्षात भरण्याची रक्कम आटल्याने शासकीय तिजोरीतील ‘दक्षिणा’चा कप्पाही सध्या रिकामाच आहे.

गेल्या ९ महिन्यातील विवाहनोंदणीमहिना-विवाह नोंदणीजानेवारी-४७फेब्रुवारी-४०मार्च-२९एप्रिल-२६मे-२९जून-११जुलै-०१ऑगस्ट-००सप्टेंबर २३कोट

सध्या विवाहनोंदणीपूर्वीची प्रक्रिया व विवाहबद्ध होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अनेक जण पितृपक्षानंतर विवाहबद्ध होऊ, असे सांगताना दिसतात. -संजय ठाकरे, दुय्यम उपनिबंधक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न