शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जळगाव येथे बांबू शेती कार्यशाळेकडे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:13 IST

शेतकरी ताटकळले

ठळक मुद्देपालकमंत्री, जलसंपदा मंत्री, सहकार राज्यमंत्रीही ‘दांडी’उत्पन्न वाढीसाठी सात कलमी योजना

जळगाव : शहरात आयोजित राज्यस्तरीय बांबू कार्यशाळेकडे राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी पाठ फिरविली. एवढेच नव्हे तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा जळगावात असताना देखील ते सुद्धा फिरकले नाही, त्यामुळे राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.राज्य बांबू विकास मंडळ, नागपूर व इंडियन फेडरेशन फॉर ग्रीन एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात राज्यस्तरीय बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यभरातील शेतकरी ताटकळलेदुपारी ४ वाजता कार्यशाळेचा समारोप होता. यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती. व्यासपीठावर एम.के. अण्णा पाटील, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्यासह काही अधिकारी वर्ग होता. वन मंत्री दहा मिनिटात येणार असल्याचे शेतकºयांना आयोजकांकडून वारंवार सांगण्यात येत होते.५ वाजता कार्यक्रमस्थळी फोन आला व मंत्री मुनगंटीवार हे भुसावळ येथून येथे जळगाव विमानतळावर गेल्याचे सांगण्यात आले. त्यांनी यावे म्हणून बांबू मिशनचे कार्यकारी समिती सदस्य माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील यांनी प्रयत्न केले मात्र त्यांनाही यश आले नाही. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे येणे अपेक्षित होते. मात्र यापैकी एकाही मंत्र्याने कार्यक्रमस्थळी साधी भेटही दिली नाही. चंद्रकांत पाटील यांच्या दौºयात मात्र या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार नव्हते. मुनगंटीवर हे राळेगणसिद्धीला जाणार असल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात ते नागपूरला रवाना झाल्याची माहिती मिळाली.उत्पन्न वाढीसाठी सात कलमी योजनाराज्यातील शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयाचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट कसे होईल यासाठी सात कलमी योजना तयार केली आहे. त्याची ज्योत या फैजपूर पावनभूमीत देशातील पहिल्या अटल महाकृषी कार्यशाळेच्या माध्यमातून पेटविण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून आयोजित अटल महाकृषी कार्यशाळा येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव