शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

दहावीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण; प्रतीक्षा निकालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जळगाव जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांनी पूर्ण केली आहे. ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जळगाव जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांनी पूर्ण केली आहे. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, या शासन परिपत्रकाचे नीट वाचन न केल्यामुळे बऱ्याच शाळांच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. अशा शाळांना तात्काळ त्रुटी दुरुस्त करून मूल्यांकन सादर करण्याच्या सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, शालेय शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांचे नववीतील गुण आणि वर्षभरातील कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या मूल्यांकनावरून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांना परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करायचा होता. यासाठी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे, यासाठी एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र, बऱ्याच शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत, तसेच ८० गुणांचे मूल्यांकन करायचे असते, त्यांनी १०० गुणांचे मूल्यांकन करून बोर्डाकडे निकाल सादर केला. त्यामुळे बोर्डाने यात त्रुटी काढल्याने जिल्ह्यातील काही शाळांना पुन्हा मूल्यांकन करून ते सादर करण्यास सांगितले आहे.

दहावीचे ५८ हजार परीक्षार्थी

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते, तसेही दहावीची परीक्षा ही १३७ केंद्रांवर पार पडणार होती, तर १८ परीरक्षकांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली, तसेच दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे.

---------------------मुख्याध्यापक म्हणतात...

शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना बोर्डाने दिलेल्या परिपत्रकाचे सविस्तर वाचन करून निकाल तयार केला. तो बाेर्डाकडे सादरसुद्धा केला असून, त्यात बोर्डाने कुठल्याही त्रुटी काढल्या नाहीत. परिपत्रकानुसार निकाल सादर केला आहे.

- चारुलता पाटील, मुख्याध्यापक

------------------------------दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया दहा ते बारा ----- पूर्ण केली आहे. कुठलीही अडचण येणार नाही. शासनाने सुचविलेली मूल्यमापनाची पद्धती अत्यंत चांगली आहे. दरवर्षी जसा निकाल असतो, त्याप्रमाणे निकाल लागेल. यंदा नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असेल.

- ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक

मूल्यांकनातील त्रुटी

-निकाल कसा तयार करायचा याच्या परिपत्रकाचे काही शाळेच्या शिक्षकांनी परिपूर्ण वाचन केले नाही, त्यामुळे त्यात त्रुटी आल्या.

-निकाल कसा तयार करायचा यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या.

-निकाल तयार करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच मूल्यांकन योग्य न झाल्याने बोर्डाने त्यात त्रुटी काढल्या आहेत.

------------------------------दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्यांना त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यांना बोर्डाकडून पत्र पाठविण्यात आले आहे, तसेच त्रुटी दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- बी.जे. पाटील, शिक्षणाधिकारी