शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘वाळू डेपों’साठी सोमवारपासून निविदांची प्रक्रिया, वाळू आरक्षित करण्यासाठी होणार कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 16:32 IST

५ शासकीय कामांना देणार प्राधान्य

कुंदन पाटील, जळगाव: हतनूर धरणातील आघ वक्राकार दरवाज्यांसह पाच महत्त्वकांक्षी विकास प्रकल्पांसाठी वाळू गट आरक्षित करावे लागणार आहेत. त्यानंतरच खासगी कामांसाठी वाळू पुरविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सरकारी आणि खासगी कामांसाठी वाळू उपलब्ध करण्यासाठी नियंत्रण समितीची कसरत होणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, वाळू डेपोंसाठी सोमवारपासून ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

नव्या वाळू धोरणानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २७ डेपोंसाठी जागेची निश्चीत केली आहे. २७ डेपोंची निश्चीती केली असताना पर्यावरण समितीने केवळ आठच घाटांवरुन वाळू उचल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात केऱ्हाळे, पातोंडी, दोधे (रावेर), तांदळी (अमळनेर), भोकर (जळगाव),  धावडे, बाभुळगाव १ आणि २ अशा वाळू घाटांचा समावेश आहे. उपलब्ध साठ्यातून शासकीय प्रकल्पांना वाळू पुरविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.त्यात हतनूर धरणावरच्या आठ वक्राकार दरवाजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भोकर पूल, निम्न तापी प्रकल्प, महाजनको प्रकल्प या पाच कामांसाठी वाळू आरक्षित करावी लागणार आहे. त्यामुळे मंजूर असलेल्या आठ पैकी ३ ते ४ वाळू घाट या कामांसाठी आरक्षित ठेवण्याची शक्यता आहे. उर्वरीत ४ ते ५ घाटांवरुन उचल झालेली वाळू खासगी कामांसाठी पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे हा साठा खासगी कामांना कितपत पुरेल, याविषयी शंकाच आहे. त्यामुळे वाळू नियंत्रण समितीकरवी सुवर्णमध्ये साधला जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर काही पर्यायदेखिल निश्चीत केले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव