शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आडगावातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी विकल्या दहा बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:05 IST

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून चारा पाण्याअभावी गावातील शेतकºयांनी दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देबैलजोड्यांची विक्री करतांना शेतकºयांच्या जिवाची झाली घालमेलअनेक शेतकरी पशुधन विकण्याच्या मनस्थितीत

आडगाव ता.चाळीसगाव : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरूवातीपासूनच दगा दिल्याने परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:च्याच जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पशुंना जगवायचे कसे याचा पेच पडला आहे. त्यामुळे गुरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात असून आडगाव येथील शेतकºयांनी एकाच दिवशी तब्बल दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे. अजून काही शेतकरी बैल जोडी व इतर गुरे विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. जिवाच्या मैतराला विकतांना शेतकºयांच्या जीवाचे अक्षरश: पाणी पाणी झाले होते.आडगांवसह संपूर्ण मन्याड परिसरात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस गडद होत चालल्याने पिके तर वाया गेलीच आहेत, आता तर मुक्या जनावरांना जगवायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. आडगांवसह परीसरातील बहुतेक गावांतील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बैलजोडी, शेळ्या पाळतो. शेतात मुबलक पाणी व चारा उपलब्ध राहत असल्याने गुरे पाळणे सोयीस्कर होते. परंतु गेल्या दोन/तीन वर्षापासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेल्याने चारा व पाण्याचा प्रश्न गहन होत गेला आहे. थोड्या फार पाण्यावर चारा वगैरे टाकून आतापर्यंत शेतकºयांनी काटकसरीने पूरविले. या वर्षी खरीपात टाकलेला चारा व गवत पाण्याअभावी जळून गेल्याने या शिवाय परीसरात हीच परिस्थिती राहील्याने आतापासूनच चारा कुठून विकत आणावा ? महागडा चारा किती गुरांना पूरवावा, याचा ताळमेळ बसत नसल्याने मोठ्या हताश मनाने शेतकºयांनी मुक्या जनावरांना पाणी व चाºयाअभावी अर्धपोटी राहू देण्यापेक्षा त्यांना विकलेले बरे असा निर्णय घेत एकाच दिवशी दहा बैलजोड्या विकल्या. अजूनही काही शेतकरी पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. तर काही जण साखर कारखान्यांचा हंगाम संपेपर्यंत चारा पाणीसाठी मुकादमाच्या हवाली करणार आहेत. वर्षभर शेतात राबणाºया सर्जा- राजाला विकतांना किंवा साखर कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करण्यासाठी मुकादमाच्या हवाली करतांना शेतकºयाच्या जिवाची घालमेल होत आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळ