शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

केबल तुटल्यामुळे ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST

जळगाव : अमृत योजना आणि भुयारी गटारींच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात येत असल्यामुळे गेल्या काही महिन्यात वारंवार बीएसएनएलची केबल तुटल्याचे ...

जळगाव : अमृत योजना आणि भुयारी गटारींच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात येत असल्यामुळे गेल्या काही महिन्यात वारंवार बीएसएनएलची केबल तुटल्याचे प्रकार घडले. त्यात आता नवीन बस स्थानकासमोर केबल तुटल्यामुळे ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा गेल्या आठवडाभरापासून खंडित झाली आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असून, तक्रार करूनही दखल घेत नसल्यामुळे ग्राहकांमधून बीएसएनएलच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील नवीन बस स्थानकासमोर मनपातर्फे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. या कामासाठी गेल्या आठवड्यात जेसीबीतर्फे खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना जमिनीमधून टाकण्यात आलेली बीएसएनएलची ‘८०० टेअर’ची केबल तुटली आहे. ही केबल तुटल्यामुळे या परिसरातील घरगुती ४०० दूरध्वनी बंद पडले आहेत. यामुळे आठवडाभरापासून नागरिकांचे घरगुती फोन बंद असून, त्यात शासकीय कार्यालयांचेही दूरध्वनी बंद आहेत. त्यामुळे एकीकडे घरगुती नागरिकांची गैरसोय होत असताना, दुसरीकडे शासकीय कार्यालयामध्ये दूरध्वनीवर फोन करणाऱ्या नागरिकांचींही गैरसोय होत आहे. तर आठवडाभरानंतरही बीएसएनएल प्रशासनातर्फे ही तुटलेली केबल जोडण्यात आलेली नाही. केबल जोडून दूरध्वनी सेवा तत्काळ सुरू करण्याबाबत नागरिकांतर्फे अनेकवेळा बीएसएनएल कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आठवडाभरानंतरही केबल जोडून, दूरध्वनी सेवा सुरू न झाल्यामुळे नागरिकांतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

केबल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

केबल जोडणीच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने बीएसएनएल तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधला असता, त्यांनी मक्तेदारामार्फत केबल जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, सर्व भागातील दूरध्वनी सेवा दोन दिवसात सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.