शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

परमात्म्याच्या ज्ञानातूनच मानवतेची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:23 IST

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर ...

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर क्रोध करणे, मनामध्ये व्देष निर्माण करणे याने मनुष्याचे नुकसान आहे. जसे की, एखादा खेळ खेळण्यासाठी आधी सराव करणे गरजेचे आहे. तरच खेळ चांगल्या तºहेने खेळू शकू. तव्दतच गुरमत आपल्या जीवनाचा भाग बनेल. तेव्हाच याला व्यवहारात येणारी अध्यात्मिकता म्हणू शकतो.आपणा सर्वांच्या जीवनाचे उद्दीष्ट जाणून घेण्याच्या या उत्साहाला पाहून प्रसन्नता होत आहे. जेव्हा समाजाकडे पाहतो, तेव्हा हीच प्रार्थना येते की, हे प्रभू, मनुष्याचे तन तर दिले आहे; परंतु जीवनदेखील मनुष्यासारखे होऊ देत. ज्याप्रमाणे ऋतु बदलत असतात, त्याचप्रमाणे जीवनात सुख-दु:ख येतात; परंतु जे परमात्म्याच्या नावात रंगलेले आहेत, ते निरंकाराच्या जाणिवेत जीवन जगून सदैव कृतज्ञतेचा भाव व्यतित करतात. असे गुरसिख एखादे संकट किवा दु:खसुध्दा ईश्वराची इच्छा समजतात. हा जो निरंकार कणाकणात सामावलेला आहे, याला सहजरुपात प्राप्त करतात. कारण ते निरंकाराशी जुडून राहतात. ज्याप्रमाणे तबला, ढोलकी इतर वाद्ये दिसण्यामध्ये वेगळी असतात; परंतु जे स्वर निघतात, ते एकसारखेच असतात. याचप्रमाणे संतदेखील विविध रुपात भक्ती करतात; परंतु भाव एक त्याचाच असतो.आपल्या दैनंदिन जीवनातील जबाबदारीचे आपण रोजच पालन करतो. यासोबतच जर अध्यात्माला आपल्या जीवनाचा आधार बनवले, तर मुक्ती प्राप्त होईल. तिथेच सहज अवस्थेचीही प्राप्ती होईल. आजच्या तांत्रिक युगात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला वस्तूंचा सदुपयोग कशाप्रकारे करावा, हेदेखील दर्शविते. आपण वस्तूंचा उपयोग चांगल्या कामासाठीच करावा ना की, कोणाला दु:ख किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी असावा.सुरीचा उपयोग डॉक्टर आणि खुनी दोघेही करतात. एक कोणाला तरी जीवनदान देतो आणि दुसरा कोणाचे तरी जीवन समाप्त करतो.- सद््््गुरु सुदीक्षाजी(संकलन - राजकुमार वाणी)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव