- टी.बी.च्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी हे रुग्णालय सन १९६२ मध्ये बांधण्यात आले होते. मात्र, १९९० नंतर टी.बी.चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या रुग्णालयाचाही वापर कमी होवू लागला. १९९६ पासून हे रुग्णालय बंद असून, याठिकाणी ५२ क्वार्टर धुळखात पडले आहेत. सद्यस्थितीला रूग्णालयच्या बहुतांश क्वार्टरची दरवाजे, खिडक्या तुटलेल्या आहेत. जागो-जागी कचरा साचला आहे.
- नादुरूस्त वाहने पडून
महापालिकेच्या सर्व घंटागाड्या रूग्णालयाच्या आवारात थांबविल्या जातात. त्याचबरोबर भंगार व तुटलेल्या कचरा पेट्या सुध्दा याठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच ना दुरूस्त घंटागाड्या, ट्रॅक्टर तसेच कचरा गोळा करणारे मिनी ट्रक पडून आहेत. सध्या यासाठी जागेचा वापर होत आहे.
- वृक्षांची कत्तल
रूग्णालयाच्या मागील भागात दोन ते तीन वृक्षांची कत्तल केलेली लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले. हा भाग उजाड पडला असून जागो-जागी गवत उगवलं आहे. मागील भागातील भींत तुटलेली असल्यामुळे या आवारात कुणी ये-जा करू शकते़ मात्र, या आवारात तीन ते चार सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असल्याचे बघायला मिळाले.
- काय आहे भुमिका
मनपाची टी़बी़ रूग्णालयाची कोट्यावधी रूपयांची जागा उजाड पडून आहे. या रूग्णालयाच्या दुरूस्तीबाबत गांभीर्य घेतले गेले तर, भविष्यात हे रूग्णालय जळगावकरांसाठी फायदेशिर ठरू शकते, अशी लोकमतची भुमिका आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता क्वारंटाईन केलेल्यांसाठी या रुग्णालयात चांगली व्यवस्था करता आली असती, असा पयार्यही लोकमतने मनपा प्रशासनाला सुचविला होता.