शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

तापी काठ परिसर करणार मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST

तापी वाचली तरच आपण सर्व शेतकरी वाचू. दिवसेंदिवस आपल्या भागात कमीअधिक प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे सर्वाना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी ...

तापी वाचली तरच आपण सर्व शेतकरी वाचू. दिवसेंदिवस आपल्या भागात कमीअधिक प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे सर्वाना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी तापी नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते, असे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

गेली ३० वर्षे पाडळसरे तापी निम्न प्रकल्प हजारो कोटी रुपये खर्च करून आजतागायत पूर्ण झालेला नाही. त्या प्रकल्पाचे कामे अजूनही अपूर्ण आहे. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आजपर्यंत कोणताही राजकीय पुढारी खंबीरपणे उभा राहिला नाही. त्या प्रकल्पाचे नाव वापरून निवडून आलेले नेतेमंडळी सामान्य जनतेला पाणी प्रश्नावर वाऱ्यावर सोडतात. या सर्वांचा निषेध करून तापी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्यात यावा, असा निर्णय तापी परिसर शेतकरी आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. तसेच तापी नदीत कायमस्वरूपी पाणी राहावे आणि त्यासाठी सरकारने धरण वा बॅरेज लवकरात लवकर बांधण्यासाठी आग्रह धरावा. जोपर्यंत कायमस्वरूपी पाण्याची सोय होत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा तसेच तापी वाचवा- शेतकरी वाचवा या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन या शेतकऱ्यांनी केले आहे.

बारमाही पाणी असणाऱ्या तापीमाईत आता फक्त ३ ते ४ महिनेच पाणी शिल्लक राहत असताना त्यावर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना अवलंबून आहेत. त्यामुळे सर्व तापी काठ परिसरात भर उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासत असून बागायत क्षेत्र कमी होत चालले आहे. आपल्या परिसरात शेती हाच प्रमुख व्यवसाय असताना नदीपात्रात पाणीच शिल्लक राहिले नाही तर सर्व शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका बंद पडतील आणि त्यामुळे शेती विकून रोजगारासाठी शहराकडे जावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आंदोलन कठोरे

चोपडा येथील सामान्य शेतकऱ्यांनी तापी वाचवा-शेतकरी वाचवा या उद्देशाने आंदोलन सुरू केले आहे. यात कोणतीही राजकीय संघटना, शेतकरी संघटना यांचा सहभाग नाही. त्यामुळे सर्व शेतकरी, ग्रामस्थ, नाविक व मच्छीमार बांधव यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.