शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

तामसवाडी ग्रामस्थांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : वरखेडे-लोंढे धरणामुळे विस्थापित होणाऱ्या तामसवाडी गावठाण भागाच्या पुनर्वसनासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : वरखेडे-लोंढे धरणामुळे विस्थापित होणाऱ्या तामसवाडी गावठाण भागाच्या पुनर्वसनासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला हा प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनीही अगोदर विस्थापितांचे शंभर टक्के पुनर्वसन आणि नंतर प्रकल्प अशी भूमिका घेतली होती. तामसवाडी पुनर्वसन समितीच्या लढ्यालादेखील निधी मंजूर झाल्याने यश मिळाल्याचा सूर येथे उमटला आहे.

वरखेडे-लोढे प्रकल्पाची पायाभारणी २०१४ मध्ये तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांच्या कार्यकाळात झाली. यानंतर आमदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पाला निधी मिळवून दिला. केंद्रीय बळीराजा जलसंजीवनी योजनेत या प्रकल्पाचा समावेश झाल्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. यामुळे धरणाचे शंभर टक्के काम पूर्णत्वास गेले आहे.

वरखेडे-लोंढे प्रकल्पांतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनासाठी तब्बल २६ कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला होता. तामसवाडी पुनर्वसन समितीसोबत जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी बैठकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पुनर्वसनासाठी निधी मंजूर करण्याचा आग्रह धरला होता. निधी मंजूर झाल्याने पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तामसवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गिरणा नदीवर मध्यम स्वरूपाच्या वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली आहे. यामुळे ३५.३८ दलघमी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे परिसरातील ३१ गावांना लाभ होणार आहे. दरम्यान, तामसवाडी हे गाव प्रकल्पात जाणार नसल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले होते. मात्र प्रकल्प पूर्णत्वाकडे येत असताना तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी सातत्याने होत होती. पुनर्वसनाबाबत आधी अंशतः मान्यता मिळाली असल्याने आता निधी मंजुरीनंतर हा प्रश्न सुटणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

चौकट

नियामक मंडळाच्या मान्यतेची मोहर

२७ जानेवारी २०२० रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला. याच बैठकीत तामसवाडीच्या शंभर टक्के पुनर्वसनासाठी नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली होती. पुनर्वसनासाठी २५ कोटी ८९ लाख रुपये निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.

चौकट

शंभर टक्के होणार पुनर्वसन

तामसवाडी या गावाचे १०० टक्के पुनर्वसन होणार असून, यासाठी २५ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे.

१...वरखेडे - लोंढे धरणाच्या पहिल्या प्रशासकीय मान्यतेत तामसवाडी गावचा बुडीत क्षेत्रात समावेश नव्हता.

२...तामसवाडी गावापेक्षा उंचावर असणाऱ्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेत गावाला तीनही बाजूंनी पाण्याचा वेढा पडणार असल्याची बाब समोर आली. यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न प्रकर्षाने ऐरणीवर आला.

३...धरणाचे काम पूर्ण झाले असून, तामसवाडीचे पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी अडवणे शक्य नाही. त्यामुळे तातडीने पूनर्वसनची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.