शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

तलाठी भरती : आक्षेपांवर त्रिस्तरीय सुनावणी घेणार, जिल्हाधिकाऱ्यांनी केली जबाबदारी निश्चीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 15:16 IST

जिल्ह्यातील २४१ जागांसाठी गेल्यावर्षी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील १० जागा ‘पेसा’ क्षेत्रातील १० जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

कुंदन पाटील

जळगाव : जिल्हा प्रशासनातील तलाठीपदाच्या २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार २३१ जणांसह प्रतिक्षायादी जाहीर केली असताना दाखल होणाऱ्या तक्रारी, आक्षेपांवर सुनावणी करण्यासाठी तीन यंत्रणांकडे जबाबदारी सोपविली आहे.

जिल्ह्यातील २४१ जागांसाठी गेल्यावर्षी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील १० जागा ‘पेसा’ क्षेत्रातील १० जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.तसेच धाराशिव येथील परीक्षा केंद्रावरच्या गैरप्रकारामुळे २३१ पैकी अन्य तिघांचाही निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यस्तरीय निवड समितीकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत १३ जागांचा निकाल राखीव ठेवला जाणार आहे.

अशी होणार सुनावणी

उमेदवारांच्या यादीवर, भरती प्रक्रियेवर आक्षेप किंवा तक्रारी आल्यास पहिली सुनावणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्याकडे होणार आहे. सुनावणीनंतरही तक्रारदाराचे समाधान न झाल्यास त्याला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करता येईल. त्याठिकाणी दुसरी सुनावणी होईल. त्यातूनही समाधान न झाल्यास जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अंतिम सुनावणी घेणार आहेत.या तीनही सुनावणीदरम्यान महसुल विभागाचे तहसीलदार सादरकर्ता अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील.