शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोगडी धरणावरील कृषीपंप उचलण्यासाठी तहसीलदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:23 IST

दमदार पावसाची प्रतीक्षा : जलसाठे कोरडेठाक

पहूर, ता जामनेर, जि.जळगाव : आॅगस्ट महिना उजडला तरीही पहूरसह परिसरातील जलसाठे कोरडेठक आहेत. गोगडी धरणावरून कसबे व पेठ गावाचा सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.पण या धरणात मृत साठ्यापेक्षाही अल्प प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा पेठ व कसबे ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केला आहे. पण या साठ्यावर कृषीपंप बसविले आहे. त्यामुळे काही दिवसांतच भीषण पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी कसबे ग्रामपंचायतीने तहसीलदारांना निवेदन देऊन हे कृषीपंप उचलण्याचे साकडे घातले आहे.कसबे व पेठ गावाचा पाणीपुरवठा सध्या गोगडी धरणातून होत आहे. कसबे गावात बारा ते तेरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तर पेठ गावात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असून, दोन्ही गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. पेठ गावाला कायमस्वरूपी पिंपळगाव कमानी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरण आज कोरडे ठक आहे. त्यामुळे पेठ व कसबे गावात गोगडी धरणातून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. जुलै महिन्यात झालेल्या पाऊसामुळे अल्पसे पाणी गोगडित आले होते. पण ते पाणी मृत साठयापेक्षाही कमी असून हा साठा आरक्षित करण्यात आलेला आहे. मात्र या साठ्यावर काही जणांनी कृषी पंप बसवून रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्यासाठी उपसाकरीत आहेत. हे तत्काळ थांबून हे कृषी पंप उचलण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन कसेबेच्या सरंपच ज्योती शंकर घोंगडे यांनी तहसिलदारांना सोमवारी दिले आहे.तसेच पेठ ग्रामपंचायतने अशा अशायाचे निवेदन दयावे अशी अपेक्षा हि कसबे ग्रामपंचायतीसह सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडेपहूरसह परिसरात जुलै महिन्यात झालेल्या पाऊसाने पिकस्थिती चांगली आहे. पण अद्यापही दमदार पाऊस न झाल्यामुळे पिकांना आज पावसाची नितांत आवश्यकता भासत आहे. मक्याच्या पिकाच्या वाती होत असून, हातात आलेले उडीद, मुगाचे पिक पाण्याअभावी हातातून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य कपाशी पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी इकडून तिकडून पाण्याची व्यवस्था करीत आहे. पावसाअभावी शेतकरी वर्गही मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे, तर पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पेठ ग्रामपंचायतीच्यावतीने वाघूर नदीचे खोलीकरणकेल्यामुळे नदीपात्रात पाणी साठवण झाले आहे. त्यामुळे पेठ गावातील विहीर, कुपनलिका व बंद पडलेले हातपंप यांना पाणी आले आहे. तसेच वाघूर नदीतच कट्ट्याचे बांधकाम केल्याने त्याचा फायदाहीपेठ गावाला होत असल्यामुळे गावकºयांची तहान भागवत आहे.अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असून पाणी प्रश्न गंभीर आहे. गोगडी धरणात मृत साठ्याम्रुतसाठ्यापेक्षाहि अल्प प्रमाणात पाणी आहे. हा साठा आरक्षित आहे. पण या साठ्यावर बसविण्यात आलेले कृषी पंप तत्काळ उचलण्यासाठी तहसिदारांना सोमवारी निवेदन दिले आहे. जेणेकरुन गावाला पाणीपुरवठा सुरळीत करता येईल.-ज्योती शंकर घोंगडे, सरपंच, कसबे, ता.जामनेर 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJamnerजामनेर