शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

गोगडी धरणावरील कृषीपंप उचलण्यासाठी तहसीलदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:23 IST

दमदार पावसाची प्रतीक्षा : जलसाठे कोरडेठाक

पहूर, ता जामनेर, जि.जळगाव : आॅगस्ट महिना उजडला तरीही पहूरसह परिसरातील जलसाठे कोरडेठक आहेत. गोगडी धरणावरून कसबे व पेठ गावाचा सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.पण या धरणात मृत साठ्यापेक्षाही अल्प प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा पेठ व कसबे ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केला आहे. पण या साठ्यावर कृषीपंप बसविले आहे. त्यामुळे काही दिवसांतच भीषण पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी कसबे ग्रामपंचायतीने तहसीलदारांना निवेदन देऊन हे कृषीपंप उचलण्याचे साकडे घातले आहे.कसबे व पेठ गावाचा पाणीपुरवठा सध्या गोगडी धरणातून होत आहे. कसबे गावात बारा ते तेरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तर पेठ गावात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असून, दोन्ही गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. पेठ गावाला कायमस्वरूपी पिंपळगाव कमानी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरण आज कोरडे ठक आहे. त्यामुळे पेठ व कसबे गावात गोगडी धरणातून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. जुलै महिन्यात झालेल्या पाऊसामुळे अल्पसे पाणी गोगडित आले होते. पण ते पाणी मृत साठयापेक्षाही कमी असून हा साठा आरक्षित करण्यात आलेला आहे. मात्र या साठ्यावर काही जणांनी कृषी पंप बसवून रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्यासाठी उपसाकरीत आहेत. हे तत्काळ थांबून हे कृषी पंप उचलण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन कसेबेच्या सरंपच ज्योती शंकर घोंगडे यांनी तहसिलदारांना सोमवारी दिले आहे.तसेच पेठ ग्रामपंचायतने अशा अशायाचे निवेदन दयावे अशी अपेक्षा हि कसबे ग्रामपंचायतीसह सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडेपहूरसह परिसरात जुलै महिन्यात झालेल्या पाऊसाने पिकस्थिती चांगली आहे. पण अद्यापही दमदार पाऊस न झाल्यामुळे पिकांना आज पावसाची नितांत आवश्यकता भासत आहे. मक्याच्या पिकाच्या वाती होत असून, हातात आलेले उडीद, मुगाचे पिक पाण्याअभावी हातातून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य कपाशी पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी इकडून तिकडून पाण्याची व्यवस्था करीत आहे. पावसाअभावी शेतकरी वर्गही मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे, तर पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पेठ ग्रामपंचायतीच्यावतीने वाघूर नदीचे खोलीकरणकेल्यामुळे नदीपात्रात पाणी साठवण झाले आहे. त्यामुळे पेठ गावातील विहीर, कुपनलिका व बंद पडलेले हातपंप यांना पाणी आले आहे. तसेच वाघूर नदीतच कट्ट्याचे बांधकाम केल्याने त्याचा फायदाहीपेठ गावाला होत असल्यामुळे गावकºयांची तहान भागवत आहे.अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असून पाणी प्रश्न गंभीर आहे. गोगडी धरणात मृत साठ्याम्रुतसाठ्यापेक्षाहि अल्प प्रमाणात पाणी आहे. हा साठा आरक्षित आहे. पण या साठ्यावर बसविण्यात आलेले कृषी पंप तत्काळ उचलण्यासाठी तहसिदारांना सोमवारी निवेदन दिले आहे. जेणेकरुन गावाला पाणीपुरवठा सुरळीत करता येईल.-ज्योती शंकर घोंगडे, सरपंच, कसबे, ता.जामनेर 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJamnerजामनेर