शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आश्चर्यम्..! जळगाव कचरामुक्त शहर म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन स्टार देण्यात आले असून, कचरामुक्त शहर म्हणूनदेखील जळगाव शहराची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय पथकाने शहराचे सर्वेक्षण केले होते. एकीकडे शहरातील मुख्य भागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. मनपाकडे दररोज विविध भागांमधून कचऱ्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित झाल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२१ अंतर्गत देशभरातील शहरांचे घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विलगीकरण, कचऱ्याचे संकलन व हगणदारीमुक्तीची स्थिती या आधारावर सहा हजार गुणांच्या सर्वेक्षणाची मोहीम केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे. याआधीच जळगाव शहर हगणदारीमुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. २०२० मध्येदेखील जळगाव शहराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन स्टार मिळवले होते. आता यावर्षीदेखील जळगाव शहराला तीन स्टारच मिळाले आहेत.

या आधारांवर करण्यात आली निवड

१. फेब्रुवारी महिन्यात शहरातील कचऱ्याच्या स्थितीवर सर्वेक्षण करण्यात आले.

२. जळगाव शहरातील एकूण जमा होणारा कचरा, घरांमधून संकलन होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण.

३. दैनंदिन संकलनातून ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण व एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावरील प्रक्रिया

४. शहरातील पाण्याच्या स्त्रोतांमधील स्वच्छता.

५. एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावर ७० टक्के प्रक्रिया होणे गरजेचे होते.

ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

एकीकडे शासनाने जळगाव शहराची कचरामुक्त शहर म्हणून घोषणा केली असताना, दुसरीकडे शहरातील कचऱ्याची स्थिती मात्र भयावह आहे. शहरातील चौकाचौकात, गल्ली-बोळांमध्ये, रस्त्या-रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तसेच अनेक भागात तर तीन-तीन दिवस कचरा उचलला जात नाही, असे असतानादेखील जळगाव शहराला कचरामुक्त शहराचा दर्जा देण्यात आल्याने, शासनाच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महासभेनेच करून दिला होता ठराव

महापालिकेच्या महासभांमध्ये अनेक नगरसेवक शहरातील कचऱ्याचा समस्या या प्रशासनाकडे मांडत असतात. मात्र, डिसेंबर २०२० मध्ये शासनाकडे कचरामुक्त शहराबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यासाठी महासभेतच जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित करण्याचा ठराव करण्यात आला होता. एकीकडे कचऱ्याची समस्याही मांडायची आणि दुसरीकडे कचरामुक्त शहराचा ठराव मांडायचा, पदाधिकाऱ्यांच्या अशा दुहेरी भूमिकेमुळे शहरातील समस्या मार्गी लागताना दिसून येत नाही.

कोट...

जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. शहराला तीन स्टार मिळाले आहेत. यामध्ये मनपा कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची होती. शहराला यामुळे फायदा होणार असून, मनपाला शासनाकडून १५व्या वित्त आयोगातून चांगला निधी प्राप्त होईल. तसेच शहराला प्रोत्साहनपर निधीदेखील मिळणार आहे.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा