शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम्..! जळगाव कचरामुक्त शहर म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन स्टार देण्यात आले असून, कचरामुक्त शहर म्हणूनदेखील जळगाव शहराची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय पथकाने शहराचे सर्वेक्षण केले होते. एकीकडे शहरातील मुख्य भागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. मनपाकडे दररोज विविध भागांमधून कचऱ्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित झाल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२१ अंतर्गत देशभरातील शहरांचे घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विलगीकरण, कचऱ्याचे संकलन व हगणदारीमुक्तीची स्थिती या आधारावर सहा हजार गुणांच्या सर्वेक्षणाची मोहीम केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे. याआधीच जळगाव शहर हगणदारीमुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. २०२० मध्येदेखील जळगाव शहराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन स्टार मिळवले होते. आता यावर्षीदेखील जळगाव शहराला तीन स्टारच मिळाले आहेत.

या आधारांवर करण्यात आली निवड

१. फेब्रुवारी महिन्यात शहरातील कचऱ्याच्या स्थितीवर सर्वेक्षण करण्यात आले.

२. जळगाव शहरातील एकूण जमा होणारा कचरा, घरांमधून संकलन होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण.

३. दैनंदिन संकलनातून ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण व एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावरील प्रक्रिया

४. शहरातील पाण्याच्या स्त्रोतांमधील स्वच्छता.

५. एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावर ७० टक्के प्रक्रिया होणे गरजेचे होते.

ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

एकीकडे शासनाने जळगाव शहराची कचरामुक्त शहर म्हणून घोषणा केली असताना, दुसरीकडे शहरातील कचऱ्याची स्थिती मात्र भयावह आहे. शहरातील चौकाचौकात, गल्ली-बोळांमध्ये, रस्त्या-रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तसेच अनेक भागात तर तीन-तीन दिवस कचरा उचलला जात नाही, असे असतानादेखील जळगाव शहराला कचरामुक्त शहराचा दर्जा देण्यात आल्याने, शासनाच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महासभेनेच करून दिला होता ठराव

महापालिकेच्या महासभांमध्ये अनेक नगरसेवक शहरातील कचऱ्याचा समस्या या प्रशासनाकडे मांडत असतात. मात्र, डिसेंबर २०२० मध्ये शासनाकडे कचरामुक्त शहराबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यासाठी महासभेतच जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित करण्याचा ठराव करण्यात आला होता. एकीकडे कचऱ्याची समस्याही मांडायची आणि दुसरीकडे कचरामुक्त शहराचा ठराव मांडायचा, पदाधिकाऱ्यांच्या अशा दुहेरी भूमिकेमुळे शहरातील समस्या मार्गी लागताना दिसून येत नाही.

कोट...

जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. शहराला तीन स्टार मिळाले आहेत. यामध्ये मनपा कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची होती. शहराला यामुळे फायदा होणार असून, मनपाला शासनाकडून १५व्या वित्त आयोगातून चांगला निधी प्राप्त होईल. तसेच शहराला प्रोत्साहनपर निधीदेखील मिळणार आहे.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा