शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

यंदाचा उन्हाळा वृद्धांसाठी ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 15:38 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.

ठळक मुद्देफैजपूरसह परिसरातील चित्रगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दुपटीने वाढ

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.यंदाच्या उन्हाळ्याने अक्षरश: लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच नाकीनऊ आणले आहेत. दररोज ४५ ते ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेल्या या असह्य तापमानाचा फटका सर्वाधिक सत्तरी पार केलेल्या वृद्धांना बसला आहे. या जीवघेण्या उन्हामुळे अनेक वृद्धांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे.गेल्या वर्षभरात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मृत्यूचे प्रमाण १९७ ते त्यात १०६ पुरुष व ९१ स्त्रियांचा समावेश होता, तर या वर्षीच्या जानेवारी १९ ते १५ जूनपर्यंत हा आकडा ११९ पर्यंत पोहोचलेला आहे. ज्यात पुरुष ५९ तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण ६० असे आहेमागील वर्षी उन्हाळ्यात मार्च ते जून या चार महिन्यात मृत्यू झालेल्यांची संख्या ५५ होती, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च ते १४ जून या साडे तीन महिन्यातच ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एप्रिल आणि जूनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. अद्याप जून महिन्याचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यात उन्हाची तीव्रता कमी होण्याचे संकेत दिसत नाहीत. दररोज पालिकेत दोन चार जणांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने चार महिन्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरी पार करते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.उन्हाळ्यात वृद्धांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, हाता-पायाला मुंग्या येणे व त्याचा परिणाम किडनीवर होऊन किडनीचे कार्य मंदावते व त्यामुळेच मृत्यूला सामोरे जावे लागते. त्याकरिता उन्हाळ्यात शक्यतोवर वृद्धांनी व मधुमेहाच्या रुग्णांनी बाहेर फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे व नियमित तपासण्या कराव्यात.-डॉ.अमितकुमार हिवराळे, फैजपूर

टॅग्स :SocialसामाजिकFaizpurफैजपूर