शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

यंदाचा उन्हाळा वृद्धांसाठी ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 15:38 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.

ठळक मुद्देफैजपूरसह परिसरातील चित्रगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दुपटीने वाढ

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.यंदाच्या उन्हाळ्याने अक्षरश: लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच नाकीनऊ आणले आहेत. दररोज ४५ ते ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेल्या या असह्य तापमानाचा फटका सर्वाधिक सत्तरी पार केलेल्या वृद्धांना बसला आहे. या जीवघेण्या उन्हामुळे अनेक वृद्धांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे.गेल्या वर्षभरात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मृत्यूचे प्रमाण १९७ ते त्यात १०६ पुरुष व ९१ स्त्रियांचा समावेश होता, तर या वर्षीच्या जानेवारी १९ ते १५ जूनपर्यंत हा आकडा ११९ पर्यंत पोहोचलेला आहे. ज्यात पुरुष ५९ तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण ६० असे आहेमागील वर्षी उन्हाळ्यात मार्च ते जून या चार महिन्यात मृत्यू झालेल्यांची संख्या ५५ होती, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च ते १४ जून या साडे तीन महिन्यातच ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एप्रिल आणि जूनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. अद्याप जून महिन्याचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यात उन्हाची तीव्रता कमी होण्याचे संकेत दिसत नाहीत. दररोज पालिकेत दोन चार जणांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने चार महिन्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरी पार करते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.उन्हाळ्यात वृद्धांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, हाता-पायाला मुंग्या येणे व त्याचा परिणाम किडनीवर होऊन किडनीचे कार्य मंदावते व त्यामुळेच मृत्यूला सामोरे जावे लागते. त्याकरिता उन्हाळ्यात शक्यतोवर वृद्धांनी व मधुमेहाच्या रुग्णांनी बाहेर फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे व नियमित तपासण्या कराव्यात.-डॉ.अमितकुमार हिवराळे, फैजपूर

टॅग्स :SocialसामाजिकFaizpurफैजपूर