शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा उन्हाळा वृद्धांसाठी ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 15:38 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.

ठळक मुद्देफैजपूरसह परिसरातील चित्रगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दुपटीने वाढ

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.यंदाच्या उन्हाळ्याने अक्षरश: लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच नाकीनऊ आणले आहेत. दररोज ४५ ते ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेल्या या असह्य तापमानाचा फटका सर्वाधिक सत्तरी पार केलेल्या वृद्धांना बसला आहे. या जीवघेण्या उन्हामुळे अनेक वृद्धांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे.गेल्या वर्षभरात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मृत्यूचे प्रमाण १९७ ते त्यात १०६ पुरुष व ९१ स्त्रियांचा समावेश होता, तर या वर्षीच्या जानेवारी १९ ते १५ जूनपर्यंत हा आकडा ११९ पर्यंत पोहोचलेला आहे. ज्यात पुरुष ५९ तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण ६० असे आहेमागील वर्षी उन्हाळ्यात मार्च ते जून या चार महिन्यात मृत्यू झालेल्यांची संख्या ५५ होती, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च ते १४ जून या साडे तीन महिन्यातच ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एप्रिल आणि जूनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. अद्याप जून महिन्याचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यात उन्हाची तीव्रता कमी होण्याचे संकेत दिसत नाहीत. दररोज पालिकेत दोन चार जणांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने चार महिन्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरी पार करते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.उन्हाळ्यात वृद्धांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, हाता-पायाला मुंग्या येणे व त्याचा परिणाम किडनीवर होऊन किडनीचे कार्य मंदावते व त्यामुळेच मृत्यूला सामोरे जावे लागते. त्याकरिता उन्हाळ्यात शक्यतोवर वृद्धांनी व मधुमेहाच्या रुग्णांनी बाहेर फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे व नियमित तपासण्या कराव्यात.-डॉ.अमितकुमार हिवराळे, फैजपूर

टॅग्स :SocialसामाजिकFaizpurफैजपूर