शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

महिला सहाय्य कक्षाची यशस्वी शिष्टाई, ३५१ जोडप्यांची बहरली संसारवेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:30 IST

संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.

- सुनील पाटीलजळगाव : संशय, शंका, गैरसमज व कौटुंबिक कलह यामुळे संसारात मिठाचा खडा पडला अन् काडीमोडपर्यंत आलेल्या जिल्ह्यातील ३५१ जोडप्यांच्या मनातील संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.एकमेकांचे तोंड पाहणार नाही, तू माझ्या डोळ्यासमोर नकोच असे म्हणणारे जोडपे एकमेकाला मिठी मारून तोंड गोड करत घरी एकत्रितपणे परतले. दु:खी मनाने आलेल्या या दाम्पत्यांच्या डोळ्यातून जेव्हा आनंदाश्रू तरळायला लागले तेव्हा ‘खाकी’ तील या शिलेदारांनाही आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. दरम्यान, अखेरपर्यंत दोन्ही गटांची समजूत घालूनही यश न आलेल्या ३२८ प्रकरणात मात्र पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले.महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या ४९८ या कलमाचा अनेक प्रकरणात महिलांकडून गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्याआधी पोलिसांकडून अशा प्रकरणात दोन्हीकडील म्हणणे ऐकून घेत समजोता घडवून आणण्याचे निर्देश असल्याने प्रत्येक जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र महिला सहाय कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात महिला सहाय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.शिफारशीनंतर होतो गुन्हा दाखलजळगाव येथील महिला सहाय कक्षात सहायक फौजदार अन्नपूर्णा बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल वंदना आंबिकार, सविता परदेशी, वैशाली पाटील व शैला धनगर या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाकडे दाखल असलेल्या प्रकरणात पती-पत्नीसह दोन्हीकडील कुटुंबाना एकत्र बोलावण्यात येते. त्यांच्यात समजूत घालून गैरसमज दूर केले जातात. ज्या प्रकरणात तडजोड शक्यच नाही किंवा कोणी दोषी आढळत असेल तर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची शिफारस या कक्षाकडून केली जाते. त्यांच्या शिफारसीनंतरच गुन्हा दाखल होतो, मात्र या दोषी नसलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग टाळला जातो. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या नियंत्रणात या शाखेचे कामकाज चालते. पोलीस अधीक्षक दर महिन्याला आढावा घेतात.चिमुरड्यांमुळे आयुष्याला कलाटणीअनेक प्रकरणांमध्ये दाम्पत्याला मुलबाळ झालेले असताना त्यांचा त्याग करुन अनेक जण घटस्फोटाची तयारी ठेवतात. अशा प्रसंगात महिला सहाय कक्षातील पथकाकडून काही घटनांचे बोलके उदाहरणे दिली जातात. त्यातून होणारे चांगले व वाईट परिणाम दृष्यस्वरुपात बघावयास मिळाल्यामुळे काडीमोड घेणारे दाम्पत्य दोन पावले मागे येतात व तेथेच या दाम्पत्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते.वृद्ध आई, वडिलांची फरफट...न्यायासाठी आलेल्या पती-पत्नींची समजूत घालताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. किरकोळ कारणे व गैरसमजुतीतून वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पती-पत्नी तर वेगळे राहतातच, परंतु त्याचा फटका त्यांच्या निष्पाप बालकांनाही बसला आहे. काही प्रकरणात वृद्ध आई, वडिलांची फरफट झालेली आहे, असे निरागस चेहरे पाहून अंतकरण भरुन येते व त्यातून अश्रू आवरणे कठीण होते. मात्र अशा संवेदनशील प्रकरणात कुटुंब एकत्र आणण्यात यश येते तेव्हा आपोआपच आनंदाश्रू तरळतात, असे अनुभव या कक्षाच्या अन्नपूर्णा बनसोडे यांनी सांगितले.असे आहेत पती-पत्नीचे दाखल प्रकरणे (जानेवारी २०१७ ते जुलै २०१८)एकूण - १८३९समजोता - ३५१गुन्हे दाखल - ३२८न्यायालय - २९१अर्ज निकाली - ४२८प्रलंबित - ४४१समझोता करण्यासाठी आलेल्या प्रकरणांमध्ये ब-याच वेळा हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. सासू-सास-यांपासून वेगळे रहाणे, मुलीच्या आईचा नको तितका हस्तक्षेप यामुळे वादाचे प्रसंग घडल्याचे प्रकरणे अधिक आहेत. अनेक कुटुंबाच्या वादाला मोबाईल हे एक मोठे कारण आहे. त्यातून गैरसमज होऊन टोकाचे मतभेद झाले आहेत. प्रत्येक सासूने सुनेला मुलीसारखे तर सुनेने सासूला आई मानले तर बहुतांश वाद जागेवर मिटतील.-अन्नपूर्णा बनसोडे, सहायक फौजदार, महिला सहाय कक्ष

टॅग्स :Jalgaonजळगाव