शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महिला सहाय्य कक्षाची यशस्वी शिष्टाई, ३५१ जोडप्यांची बहरली संसारवेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:30 IST

संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.

- सुनील पाटीलजळगाव : संशय, शंका, गैरसमज व कौटुंबिक कलह यामुळे संसारात मिठाचा खडा पडला अन् काडीमोडपर्यंत आलेल्या जिल्ह्यातील ३५१ जोडप्यांच्या मनातील संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.एकमेकांचे तोंड पाहणार नाही, तू माझ्या डोळ्यासमोर नकोच असे म्हणणारे जोडपे एकमेकाला मिठी मारून तोंड गोड करत घरी एकत्रितपणे परतले. दु:खी मनाने आलेल्या या दाम्पत्यांच्या डोळ्यातून जेव्हा आनंदाश्रू तरळायला लागले तेव्हा ‘खाकी’ तील या शिलेदारांनाही आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. दरम्यान, अखेरपर्यंत दोन्ही गटांची समजूत घालूनही यश न आलेल्या ३२८ प्रकरणात मात्र पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले.महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या ४९८ या कलमाचा अनेक प्रकरणात महिलांकडून गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्याआधी पोलिसांकडून अशा प्रकरणात दोन्हीकडील म्हणणे ऐकून घेत समजोता घडवून आणण्याचे निर्देश असल्याने प्रत्येक जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र महिला सहाय कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात महिला सहाय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.शिफारशीनंतर होतो गुन्हा दाखलजळगाव येथील महिला सहाय कक्षात सहायक फौजदार अन्नपूर्णा बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल वंदना आंबिकार, सविता परदेशी, वैशाली पाटील व शैला धनगर या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाकडे दाखल असलेल्या प्रकरणात पती-पत्नीसह दोन्हीकडील कुटुंबाना एकत्र बोलावण्यात येते. त्यांच्यात समजूत घालून गैरसमज दूर केले जातात. ज्या प्रकरणात तडजोड शक्यच नाही किंवा कोणी दोषी आढळत असेल तर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची शिफारस या कक्षाकडून केली जाते. त्यांच्या शिफारसीनंतरच गुन्हा दाखल होतो, मात्र या दोषी नसलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग टाळला जातो. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या नियंत्रणात या शाखेचे कामकाज चालते. पोलीस अधीक्षक दर महिन्याला आढावा घेतात.चिमुरड्यांमुळे आयुष्याला कलाटणीअनेक प्रकरणांमध्ये दाम्पत्याला मुलबाळ झालेले असताना त्यांचा त्याग करुन अनेक जण घटस्फोटाची तयारी ठेवतात. अशा प्रसंगात महिला सहाय कक्षातील पथकाकडून काही घटनांचे बोलके उदाहरणे दिली जातात. त्यातून होणारे चांगले व वाईट परिणाम दृष्यस्वरुपात बघावयास मिळाल्यामुळे काडीमोड घेणारे दाम्पत्य दोन पावले मागे येतात व तेथेच या दाम्पत्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते.वृद्ध आई, वडिलांची फरफट...न्यायासाठी आलेल्या पती-पत्नींची समजूत घालताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. किरकोळ कारणे व गैरसमजुतीतून वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पती-पत्नी तर वेगळे राहतातच, परंतु त्याचा फटका त्यांच्या निष्पाप बालकांनाही बसला आहे. काही प्रकरणात वृद्ध आई, वडिलांची फरफट झालेली आहे, असे निरागस चेहरे पाहून अंतकरण भरुन येते व त्यातून अश्रू आवरणे कठीण होते. मात्र अशा संवेदनशील प्रकरणात कुटुंब एकत्र आणण्यात यश येते तेव्हा आपोआपच आनंदाश्रू तरळतात, असे अनुभव या कक्षाच्या अन्नपूर्णा बनसोडे यांनी सांगितले.असे आहेत पती-पत्नीचे दाखल प्रकरणे (जानेवारी २०१७ ते जुलै २०१८)एकूण - १८३९समजोता - ३५१गुन्हे दाखल - ३२८न्यायालय - २९१अर्ज निकाली - ४२८प्रलंबित - ४४१समझोता करण्यासाठी आलेल्या प्रकरणांमध्ये ब-याच वेळा हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. सासू-सास-यांपासून वेगळे रहाणे, मुलीच्या आईचा नको तितका हस्तक्षेप यामुळे वादाचे प्रसंग घडल्याचे प्रकरणे अधिक आहेत. अनेक कुटुंबाच्या वादाला मोबाईल हे एक मोठे कारण आहे. त्यातून गैरसमज होऊन टोकाचे मतभेद झाले आहेत. प्रत्येक सासूने सुनेला मुलीसारखे तर सुनेने सासूला आई मानले तर बहुतांश वाद जागेवर मिटतील.-अन्नपूर्णा बनसोडे, सहायक फौजदार, महिला सहाय कक्ष

टॅग्स :Jalgaonजळगाव