शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास!

By admin | Updated: April 10, 2017 00:42 IST

पाटबंधारे विभाग : १०० गावांना फायदा!

धुळे : पाणीटंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून नदीपात्रात सोडलेले आवर्तन १३ दिवसांच्या प्रवासानंतर ९० कि.मी. अंतरावरील आपल्या इच्छित स्थळी पोहचले. त्यामुळे पाणी सोडण्यामागील उद्देश सफल करण्यात पाटबंधारे विभागाला बºयाच वर्षात यश लाभले.  शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, पढावद ही गावे पार करून पाणी भिलाणे दिगर गावाच्या के.टी.वेअर बंधाºयापर्यंत पोहचले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आवर्तनाचे पाणी गावाच्या बंधाºयापर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या बंधाºयापर्यंत पाणी पोहचले. तेथून पुढे तीन कि.मी. अंतरावर संगमावर पांझरा नदी तापी नदीला मिळते. या आवर्तनामुळे धुळे व शिंदखेडा  व अमळनेर तालुक्यातील मिळून १०० पेक्षा जास्त गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा झाला. यंदा आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून इतर विभागांशी समन्वय ठेवून नदीपात्रातील १९ बंधाºयांच्या फळ्या काढण्यात आल्या. त्यानंतरच आवर्तन सोडण्यात आले होते. २०० दलघफू एवढे पाणी सोडण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात १३ दिवसांत ३१० दलघफू एवढे पाणी सोडण्यात आले. त्यामुळेही आवर्तनास बळ मिळाल्याने ते वेगाने पुढे जात राहिले. त्यामुळे मार्गातील सर्व गावांना पाणी मिळाले. अक्कलपाडा प्रकल्पात आवर्तन सोडण्यापूर्वी ५५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक होता. त्यामुळे आता केवळ १५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा आवर्तनाच्या दोन दिवस आधी शिंदखेडा तालुक्यातील वाडीशेवाडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले होते. शुक्रवारी ते शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेच्या कुरुक्षेत्र विहिरीपर्यंत पोहचले होते.