शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास!

By admin | Updated: April 10, 2017 00:42 IST

पाटबंधारे विभाग : १०० गावांना फायदा!

धुळे : पाणीटंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून नदीपात्रात सोडलेले आवर्तन १३ दिवसांच्या प्रवासानंतर ९० कि.मी. अंतरावरील आपल्या इच्छित स्थळी पोहचले. त्यामुळे पाणी सोडण्यामागील उद्देश सफल करण्यात पाटबंधारे विभागाला बºयाच वर्षात यश लाभले.  शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, पढावद ही गावे पार करून पाणी भिलाणे दिगर गावाच्या के.टी.वेअर बंधाºयापर्यंत पोहचले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आवर्तनाचे पाणी गावाच्या बंधाºयापर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या बंधाºयापर्यंत पाणी पोहचले. तेथून पुढे तीन कि.मी. अंतरावर संगमावर पांझरा नदी तापी नदीला मिळते. या आवर्तनामुळे धुळे व शिंदखेडा  व अमळनेर तालुक्यातील मिळून १०० पेक्षा जास्त गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा झाला. यंदा आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून इतर विभागांशी समन्वय ठेवून नदीपात्रातील १९ बंधाºयांच्या फळ्या काढण्यात आल्या. त्यानंतरच आवर्तन सोडण्यात आले होते. २०० दलघफू एवढे पाणी सोडण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात १३ दिवसांत ३१० दलघफू एवढे पाणी सोडण्यात आले. त्यामुळेही आवर्तनास बळ मिळाल्याने ते वेगाने पुढे जात राहिले. त्यामुळे मार्गातील सर्व गावांना पाणी मिळाले. अक्कलपाडा प्रकल्पात आवर्तन सोडण्यापूर्वी ५५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक होता. त्यामुळे आता केवळ १५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा आवर्तनाच्या दोन दिवस आधी शिंदखेडा तालुक्यातील वाडीशेवाडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले होते. शुक्रवारी ते शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेच्या कुरुक्षेत्र विहिरीपर्यंत पोहचले होते.