शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

जळगाव जिल्ह्यात कोरोनावर यशस्वी मात, किती जण झाले बरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:28 PM

दिलासादायक चित्र

जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे २०० च्या टप्प्यात सातत्याने वाढत असतानाही बरे होणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात वाढले आहे़ या कालावधीत ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्ण उपचार घेत असून ५९ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक होत आहे़ काही दिवसांपूर्वी एका ९० वर्षीय वृद्धांनीही कोरोनावर यशस्वी मात केली होती़ त्यामुळे कोरोना हा बरा होणारा आजार असून लवकर रुग्णालयात गेल्यास यातून रुग्ण बाहेर पडू शकतो, अशी जिल्हाभरात ३३८३ उदाहरणे आहेत़मृत्यूदर साडेपाच टक्क्यांवरजिल्ह्याचा मृत्यूदर हा थेट १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता़ मध्यंतरीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या व रुग्णसंख्या समोर येत गेल्याने हा मृत्यूदर ५.६ टक्क्यांवर आला आहे़ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे़७५ टक्के निगेटिव्हज्या चाचण्या रोज होत आहेत़ त्यापैकी जवळपास ७५ टक्के अहवाल हे निगेटीव्ह येत आहेत, त्यामुळे हे देखील एक दिलासादायक चित्र आहे़७० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणेज्यांना लक्षणे नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते़ सद्यस्थितीत उपचार घेणाºया रुग्णांपैकी १४२४ म्हणजेच ७० टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. तर त्या खालोखाल १२७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत तर ४६९ रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे़ २२० रुग्ण अत्यवस्थ आहेत़लवकर चाचणी, लवकर निदान व लवकर उपचार यामुळे आता पुढील गंभीर बाबी टाळता येत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत गेलेले आहे़ यामुळे मृत्यूचे प्रमाणही घटले आहे़ शिवाय लवकर हे लोक आयसोलेट झाल्याने पुढील वाढणारा संसर्गही आटोक्यात आला येणार आहे़ रोज चाचण्यांचे प्रमाण वाढले आहेत़ त्यात जास्त अहवाल निगेटीव्ह असून काही पॉझिटीव्ह येत आहेत, मात्र, लवकर निदान होत असल्याने पुढील संसर्ग टळत आहे़- डॉ़ एऩ एस़ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव