शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जय महाराष्ट्र! मराठी अभियंत्याचं स्वप्न साकार; जळगावातील बॅटरी चार्जर, कंट्रोल पॅनल सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 11:59 IST

उद्योगामध्ये मोठी भरारी, कंपनीत नोकरीला असलेल्या अभियंत्याची यशोगाथा.

जळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन कंपनीत नोकरी करताना मोठे स्वप्न पाहत स्वतःचा उद्योग तर असावाच शिवाय इतरांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सुरू केलेल्या उद्योगाच्या माध्यमातून जळगावातील बॅटरी चार्जर व नियंत्रण पॅनेल सातासमुद्रापार पोहोचले आहे. ही यशोगाथा आहे जळगाव जिल्ह्यातील सुभाष पाटील यांची. मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

आव्हाने आपल्याला अधिक २ चांगले बनवण्यासाठी येतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यातूनच यश गाठता येते. या मंत्रातूनच जळगावात सुरू केलेल्या मास टेक कंपनीने झेप घेतली असून, कंपनीची उत्पादने आज विविध देशात पोहोचली आहेत.

Adani Group फूल 'फॉर्म'मध्ये, एका वर्षानंतर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; शेअर्समध्ये मोठी तेजी

एरंडोल येथील मूळ रहिवासी असलेले सुभाष पाटील यांनी मुंबई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मावस भावाच्या कंपनीत अभियंता म्हणून ते रुजू झाले, सुरुवातीपासूनच नव्याचा ध्यास असणारे पाटील हे कंपनीत काम करीत असताना नवनवीन तांत्रिक ज्ञानाचा उपयोग जिल्ह्यासाठी, देशासाठी केला, पाहिजे, असा विचार करायचे. मावस भावाच्या कंपनीत १० वर्षे काम केल्यानंतर त्यांनी १९९३ मध्ये मास-टेक कंट्रोल्स प्रा.लि. कंपनी सुरू केली. अल्पावधीत कंपनीने मोठी झेप घेतली व कंपनीतील बॅटरी चार्जर आणि नियंत्रण पॅनेलची उत्पादने जगभरात पसंतीस उतरु लागली.

भविष्यात विविध उत्पादने 

ईव्ही विभागाव्यतिरिक्त मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

आव्हाने आपल्याला अधिक २ चांगले बनवण्यासाठी येतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यातूनच यश गाठता येते. या मंत्रातूनच जळगावात सुरू केलेल्या मास टेक कंपनीने झेप घेतली असून, कंपनीची उत्पादने आज विविध देशात पोहोचली आहेत.

रोजगार वाढीने आधार

मास टेक कंपनीचे वैशिष्ट्ये म्हणजे भारतात सर्वप्रथम ईव्ही चार्जर कंपनीने तयार केले आहे. कंपनीने ईव्हीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर २०२३ साली देशातील नामांकित कंपनीने मास टेक कंपनीची ईव्ही ही कंपनी टेकओव्हर केली. यामुळे जळगावात अनेकांना रोजगार मिळाला आहे.

इतर देशांमध्ये भागीदारी व्यवसाय वाढीस मदत

मास टेक कंपनीने नुकतेच नॉर्वे येथील कंपनीसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले. या भागीदारी व्यवसायाला युरोपियन व इतर देशांमध्ये नवीन बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास आणि ग्राहक वाढविण्यास मदत होत आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार

कंपनीच्या सेवांचा दर्जा सतत सुधारण्यासाठी सुभाष पाटील हे देशासह विविध देशातील सेमिनारमध्ये सहभागी होऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकत असतात. तांत्रिक क्षेत्रातील विविध तज्ज्ञांना भेटण्याच्या संधीचा फायदा घेत आणि त्यांच्या अनुभवातून नवनवीन ज्ञानाचा साठा घेत कंपनीत त्याचा उपयोग करतात. यामुळे कंपनीने मोठी भरारी घेतली आहे.

टॅग्स :businessव्यवसाय