शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जय महाराष्ट्र! मराठी अभियंत्याचं स्वप्न साकार; जळगावातील बॅटरी चार्जर, कंट्रोल पॅनल सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 11:59 IST

उद्योगामध्ये मोठी भरारी, कंपनीत नोकरीला असलेल्या अभियंत्याची यशोगाथा.

जळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन कंपनीत नोकरी करताना मोठे स्वप्न पाहत स्वतःचा उद्योग तर असावाच शिवाय इतरांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सुरू केलेल्या उद्योगाच्या माध्यमातून जळगावातील बॅटरी चार्जर व नियंत्रण पॅनेल सातासमुद्रापार पोहोचले आहे. ही यशोगाथा आहे जळगाव जिल्ह्यातील सुभाष पाटील यांची. मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

आव्हाने आपल्याला अधिक २ चांगले बनवण्यासाठी येतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यातूनच यश गाठता येते. या मंत्रातूनच जळगावात सुरू केलेल्या मास टेक कंपनीने झेप घेतली असून, कंपनीची उत्पादने आज विविध देशात पोहोचली आहेत.

Adani Group फूल 'फॉर्म'मध्ये, एका वर्षानंतर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; शेअर्समध्ये मोठी तेजी

एरंडोल येथील मूळ रहिवासी असलेले सुभाष पाटील यांनी मुंबई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मावस भावाच्या कंपनीत अभियंता म्हणून ते रुजू झाले, सुरुवातीपासूनच नव्याचा ध्यास असणारे पाटील हे कंपनीत काम करीत असताना नवनवीन तांत्रिक ज्ञानाचा उपयोग जिल्ह्यासाठी, देशासाठी केला, पाहिजे, असा विचार करायचे. मावस भावाच्या कंपनीत १० वर्षे काम केल्यानंतर त्यांनी १९९३ मध्ये मास-टेक कंट्रोल्स प्रा.लि. कंपनी सुरू केली. अल्पावधीत कंपनीने मोठी झेप घेतली व कंपनीतील बॅटरी चार्जर आणि नियंत्रण पॅनेलची उत्पादने जगभरात पसंतीस उतरु लागली.

भविष्यात विविध उत्पादने 

ईव्ही विभागाव्यतिरिक्त मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

आव्हाने आपल्याला अधिक २ चांगले बनवण्यासाठी येतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यातूनच यश गाठता येते. या मंत्रातूनच जळगावात सुरू केलेल्या मास टेक कंपनीने झेप घेतली असून, कंपनीची उत्पादने आज विविध देशात पोहोचली आहेत.

रोजगार वाढीने आधार

मास टेक कंपनीचे वैशिष्ट्ये म्हणजे भारतात सर्वप्रथम ईव्ही चार्जर कंपनीने तयार केले आहे. कंपनीने ईव्हीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर २०२३ साली देशातील नामांकित कंपनीने मास टेक कंपनीची ईव्ही ही कंपनी टेकओव्हर केली. यामुळे जळगावात अनेकांना रोजगार मिळाला आहे.

इतर देशांमध्ये भागीदारी व्यवसाय वाढीस मदत

मास टेक कंपनीने नुकतेच नॉर्वे येथील कंपनीसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले. या भागीदारी व्यवसायाला युरोपियन व इतर देशांमध्ये नवीन बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास आणि ग्राहक वाढविण्यास मदत होत आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार

कंपनीच्या सेवांचा दर्जा सतत सुधारण्यासाठी सुभाष पाटील हे देशासह विविध देशातील सेमिनारमध्ये सहभागी होऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकत असतात. तांत्रिक क्षेत्रातील विविध तज्ज्ञांना भेटण्याच्या संधीचा फायदा घेत आणि त्यांच्या अनुभवातून नवनवीन ज्ञानाचा साठा घेत कंपनीत त्याचा उपयोग करतात. यामुळे कंपनीने मोठी भरारी घेतली आहे.

टॅग्स :businessव्यवसाय