शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार!

By अमित महाबळ | Updated: May 4, 2023 20:34 IST

परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षेनंतर ३० दिवसांत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या सध्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. कोविडमुळे गेली दोन वर्षे शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक लांबले होते. आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षा संपताच ३० दिवसांच्या आत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार किमान ३० ते कमाल ४५ दिवसांत परीक्षांचे निकाल लावावे लागतात. ही कालमर्यादा पाळली जावी म्हणून नियोजन करण्यात आले आहे. बी. कॉम. व डी. पी. ए. अभ्यासक्रमांचे पेपर ऑनलाइन तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त प्राध्यापकांनी सहभाग नोंदवावा व वेळेच्या आत ऑनलाइन तपासणी पूर्ण करावी. ३० दिवसांत निकाल लावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाला प्राध्यापकांचे सहकार्य हवे आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी सांगितले. 

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी