शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

गटारीच्या पाण्यातून मार्ग काढत वराडसीम येथील विद्यार्थ्यांनी गाठली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:30 IST

शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याचे विविध उपक्रम राबवून सर्वत्र स्वागत होत असतांना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेत मात्र विपरीत चित्र दिसले. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून कसरत करीत मार्ग काढीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधीतांच्या अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आला विदारक अनुभवसमस्येकडे दूर्लक्ष केले जात असल्याबद्दल पालकांचा संतापसर्वच शिक्षक बदलून आल्याने समस्येविषयी अनभिज्ञ असल्याची चर्चा

आॅनलाईन लोकमतवराडसीम, ता. भुसावळ : विद्यार्थ्याना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आनंददायक शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळेत पहिल्याच दिवशी येणाºया विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके- वह्या देऊन तसेच मिठाई खाऊ घालून त्यांचे स्वागत केले जाते.यासाठी शालेय परिसर सजवला जातो. बैलगाडी, घोडागाडीवरून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते. शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र विद्यार्थ्याचे असेच स्वागत झाले. भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेतही विद्यार्थ्याच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. परंतु तत्पूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश करतांना प्रवेशद्वारापासूनच कसरत करावी लागली. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढून शाळा गाठावी लागल्याच्या प्रकार घडल्यामुळे पालकवर्गात संताप व्यक्त करण्यात आला.गेल्या चार पाच वर्षांपासून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच गावातील गटारींचे अधूनमधून घाण पाणी वाहून येत असते. मात्र ग्रामपंचायतीचे याकडे सर्रास दूर्लक्ष झाले असून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ही समस्या कायम आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही समस्या ठळकपणे निदर्शनास आल्याने संतापात भरच पडली होती.्नग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही दूर्लक्ष केले जात असल्याचे पालकांसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची पालकांकडून मागणी होत आहे. येथे जि.प.च्या पहिली ते चौथीचे चार वर्ग असून ९५ च्यावर विद्यार्थी आहेत, तर अंगणवाडीचे पाच वर्ग असून दिडशे पर्यंत विद्यार्थी आहेत. यंदा या शाळेवर सर्वच शिक्षक बदलून आले असून ते या समस्येविषयी अनभिज्ञ असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Schoolशाळा