शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

गटारीच्या पाण्यातून मार्ग काढत वराडसीम येथील विद्यार्थ्यांनी गाठली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:30 IST

शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याचे विविध उपक्रम राबवून सर्वत्र स्वागत होत असतांना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेत मात्र विपरीत चित्र दिसले. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून कसरत करीत मार्ग काढीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधीतांच्या अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आला विदारक अनुभवसमस्येकडे दूर्लक्ष केले जात असल्याबद्दल पालकांचा संतापसर्वच शिक्षक बदलून आल्याने समस्येविषयी अनभिज्ञ असल्याची चर्चा

आॅनलाईन लोकमतवराडसीम, ता. भुसावळ : विद्यार्थ्याना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आनंददायक शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळेत पहिल्याच दिवशी येणाºया विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके- वह्या देऊन तसेच मिठाई खाऊ घालून त्यांचे स्वागत केले जाते.यासाठी शालेय परिसर सजवला जातो. बैलगाडी, घोडागाडीवरून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते. शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र विद्यार्थ्याचे असेच स्वागत झाले. भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेतही विद्यार्थ्याच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. परंतु तत्पूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश करतांना प्रवेशद्वारापासूनच कसरत करावी लागली. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढून शाळा गाठावी लागल्याच्या प्रकार घडल्यामुळे पालकवर्गात संताप व्यक्त करण्यात आला.गेल्या चार पाच वर्षांपासून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच गावातील गटारींचे अधूनमधून घाण पाणी वाहून येत असते. मात्र ग्रामपंचायतीचे याकडे सर्रास दूर्लक्ष झाले असून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ही समस्या कायम आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही समस्या ठळकपणे निदर्शनास आल्याने संतापात भरच पडली होती.्नग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही दूर्लक्ष केले जात असल्याचे पालकांसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची पालकांकडून मागणी होत आहे. येथे जि.प.च्या पहिली ते चौथीचे चार वर्ग असून ९५ च्यावर विद्यार्थी आहेत, तर अंगणवाडीचे पाच वर्ग असून दिडशे पर्यंत विद्यार्थी आहेत. यंदा या शाळेवर सर्वच शिक्षक बदलून आले असून ते या समस्येविषयी अनभिज्ञ असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Schoolशाळा