शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचवण्याचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:47 IST

भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजनजागृती अभियानगावभर प्रभातफेरीवृक्ष लागवड करा, त्याचे संवर्धन करासांडपाण्याचा निचरा कराशौषखड्डे करापर्यावरण वाचवा

मुक्ताईनगर, जि. जळगाव : भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पाणी बचतीचा कृतीद्वारा संदेश आत्मसात करीत आहेत. अशा या उपक्रमाचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने मुक्ताईनगर तालुक्यात २०१६ साली ७१३ मिलिमीटर २०१७ साली ५३७ किलोमीटर, तर २०१८ साली ३५७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. यावरून झपाट्याने म्हणजेच दरवर्षी २०० मिलिमीटर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब तालुक्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. इतकेच नव्हे तर भूजल पातळीत दर सहा महिन्यांनी दहा ते साडेदहा फूट घट होत आहे. हा जलसंकटचा इशारा असून, तरीही जनता जागृत झाली नाही तर वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी वृक्ष लागवड करणे, पाण्याचा अपव्यय थांबवणे, सांडपाण्याचा निचरा शोषखड्ड््यात करणे असे विविध उपाय सर्वांनी करावे. कारण पाणी तयार करता येत नाही. त्यामुळे सजीवांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर पाणी वाचवणे, वृक्ष वाचवणे, पर्यावरण वाचवणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील रामदेव बाबा बहुउद्देशीय संस्था व सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त संकल्पनेतून व आयोजनातून देण्यात येत आहे. याबाबत १ मे महाराष्ट्र दिनापासून ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभिनव उपक्रम सतत चार-पाच दिवस सुरू आहे. उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून करण्यात येत असल्याचेही आयोजकांचे म्हणणे आहे. ही संकल्पना संस्थेचे सचिव डॉ.दिलीप पानपाटील यांनी सुचवल्यामुळे सुकळी येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे, शिक्षक दत्तात्रय फेगडे, शरद बोदडे, शरद चौधरी, वैशाली सोनवणे, राजेंद्र वाघ, विशाल काकडे, मंगेश दांडगे, संदीप पावरा, मयूर सपकाळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी नवल कोळी, सतीश सोनवणे, अनिल चौधरी हे नागरिकांच्या प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचून भेटी घेत आहेत. नागरिकांना पाण्याचे महत्त्व व बचत याबाबत मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. त्याचप्रमाणे येणारे जलसंकट किती भयावह आहे याचीही जाणीव करून देत आहेत. या अभियानाची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यातील वायला या गावापासून करण्यात आली आहे. त्यानंतर महालखेडा, टाकळी, नांदवेल, डोलारखेडा, सुकळी, सोमनगाव आणि दुई अशा गावांमध्ये संदेश पोहोचविण्यात येत आहे.वायला येथे पोलीस पाटील सुनील तायडे, बाजीराव कोळी यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदविला.नांदवेल येथे जि. प. सदस्य नीलेश पाटील यांनी सपत्नीक या अभियानात सहभाग नोंदवला. तसेच पोलीस पाटील अनिल वाघ, मुरलीधर पाटील, गजानन सुरवाडे, नंदू वाघ, दीपक वाघ, जि.प. शिक्षक हिरोळे यांनीही सहभागी होऊन जलबचतीचा संदेश दिला.महालखेडा येथे पोलीस पाटील राजू वाघ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच तसेच सेवानिवृत्त शिक्षक गुणवंतराव वाघ यांनी सहभाग नोंदवला. टाकळी येथे संस्थेचे संचालक रसाल चव्हाण यांनीही सहभाग घेतला.सुकळी सोमनगाव येथे सरपंच शकांताबाई पाटील तसेच पंचायत समिती सदस्य विकास समाधान पाटील, पोलीस पाटील संदीप इंगळे, कडू महाराज, विनोद डापके, भाऊलाल पाटील, माजी सरपंच बाजीराव सोनवणे, ग्रामपंचायतच्या माजी सदस्या सुनीता कोळी, माजी सरपंच भगवान धनगर, देवानंद चव्हाण, वामन कोळी, रघुनाथ कोळी, दादाराव नामदेव पाटील, प्रफुल्ल पाटील, वीरेंद्र पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गाजरे यांनीही सहकार्य केले.दुबई येथे वसंत तळेले सरपंच संदीप जावळे, माजी सरपंच जुलाल पाटील, राजेंद्र पाटील, मुरलीधर फेगडे यांच्यासह सुकळी येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक ई.ओ.पाटील यांनीही अभियानात सहभाग नोंदवला.डोलारखेडा येथे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ सुरेश इंगळे, विनोद इंगळे, माजी सरपंच पुंडलिक वालखड, ग्रामपंचायत सदस्य माणिक बिल्डर, सोनार तसेच समाधान थाटे, मारुती कोळी यांनीही सहकार्य केले. सदरचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आला.यावर्षी कुमारी रूपाली इंगळे या विद्यार्थिनीच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीMuktainagarमुक्ताईनगर