शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जळगाव जिल्ह्यातील १२ लाख २७ हजार विद्यार्थ्यांची होणार कृमी दोषापासून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:52 IST

१ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लाभ

ठळक मुद्दे२८३८ शाळा व ३८५३ अंगणवाड्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमजिल्ह्यस्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ११ - रक्तक्षय व कुपोषण होण्याची शक्यता असलेल्या कृमी दोषावर मात करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम हाती घेण्यात आली असून यामाध्यमातून जिल्ह्यात १ ते १९ वर्षे वयोगटातील १२ लाख २७ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. २८३८ शाळा व ३८५३ अंगणवाड्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया या मोहिमेचे तरसोद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते उद्््घाटन झाले.११ ते १४ या वयोगटातील मुलांमध्ये कृमी दोष आढळतो. यामुळे बालकांची एकंदरीत बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि बालकल्याण विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्ह्यस्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहहिमेच्या उद््घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पंचायत समितीच्या सभापती यमुनाबाई रोटे, गटविकास अधिकारी सोनवणे, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी संजय चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रवीकिरण बिºहाडे, फिरोज पठाण, बी.डी.धाडी, सरला पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ््यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांना १५ फेब्रुवारी रोजी गोळ््यांचे वितरण करण्यात येणार आहे.प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे महत्त्व विषद केले. जंतनाशकाची गोळी दिल्यानंतर मळमळ, पोटदुखी, अतिसार झाल्यास १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सरपंच अर्चना पाटील व गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा सानप यांनी स्वागत केले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ, चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे उद्घाटनदेखील करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत मुलीच्या जन्माचे स्वागतानित्ताने सुनिता ओमप्रकाश खुशवा यांचा जिल्हाधिकाºयांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुणे, शौचालयावरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे, अशा चांगल्या सवयी बालपणात रुजवून वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पोटात जंताची वाढ झाल्याने बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊन त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. तसेच मुलांचे कुपोषण टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या मुलांनी खाल्या पाहिजेत. तसेच मुलांच्या आहारात सर्व जीवनसत्त्वे आवश्यक असून याकडे पालकांनीदेखील लक्ष दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर खोंडे यांनी केले.दरम्यान, मुलांमधील आजार टाळण्यासाठी या मोहिमेंतर्गत देण्यात येणाºया या गोळ््यांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावmedicineऔषधं