शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजी व काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई - पालकमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:14 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयम व सर्वांच्या सहकार्याची गरज

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन जाहीर झाले आहे. यादरम्यान कोणी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार अथवा वाढीव किंमतीने विक्री करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. दरम्यान जिल्ह्यात दीड ते दोन महिने पुरेल एवढा किराणा, धान्य उपलब्ध असून कोणीही चिंता करण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पालकमंत्री व आणि जिल्हाधिकारी यांची बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, पोलीस उप अधीक्षक (गृह) डी.बी. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते.अडचणीचा फायदा घेऊन पैसा कमविण्याची वेळ नाहीपालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शक्य त्या उपाययोजना करीत आहे. यात सर्वांचा संयम व सहकार्य आवश्यक आहे. ही वेळ संकटात सापडलेल्यांना मदत करण्याची आहे. अडचणीचा फायदा घेऊन पैसा कमविण्याची नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करू नये. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रत्येकाने घरीच थांबावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.दोन महिने पुरेल एवढा साठाजिल्ह्यात लॉक डाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही. भाजीपाला, दूध, अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. पुढील दीड ते दोन महिने ते सहज पुरणार आहे. या सोबतच आपल्या जिल्ह्याची गरज भागवून आपण इतर २ ते ३ जिल्ह्यांना मदत करू शकतो, एवढा भाजीपालादेखील आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व जीवनावश्यक वस्तूंची गरजेपुरती खरेदी करावी, अनावश्यक गर्दी करू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.प्रत्येक तहसील क्षेत्रामध्ये प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आवश्यक सेवा देणारे तसेच अन्न, खाद्य पुरविणाºयांना तहसीलदार, प्रांताधिकारी पासेस् देतील, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.विलगीकरणाची वाढीव व्यवस्थासुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र गंभीर परिस्थिती ओढावल्यास दोन हजार जणांचे विलगीकरण करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली.किराणा दुकानांची वेळ वाढवूजीवनावश्यक वस्तू पुरेशा उपलब्ध असून विनाकारण खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. हे टाळण्यासाठी किराणा, धान्य दुकानांच्या वेळा वाढवून देण्यात येतील, प्रसंगी २४ तास दुकाने उघड्या ठेवू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली. यासाठी दुकानदारांनाही सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच ही गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ््या भागात जीवनावश्यक वस्तूंची विक्रीची व्यवस्था करता येईल का, याविषयीदेखील दुकानदारांना आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत २९ जणांची तपासणीजिल्हायातील २९ संशयितांची आतापर्यंत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोघांच्या तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. कोरोना प्रतिबंधात्मक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र तपासणी विभागात विशेष कक्ष उभारला असून त्याठिकाणी २० खाटा (बेड) राखीव आहेत. तर महाविद्यालयातील निवासी क्वार्टर्समध्ये देखील २० खाटा राखीव आहेत. तसेच पथकही सज्ज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तर जिल्हाभरातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातदेखील कोरोना संशयितांची तपासणीची व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव