शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे बळकटीकरण करणार - जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:09 IST

वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांवर देणार भर

जळगाव : पारंपारिक गुन्ह्यांच्या व्यतिरिक्त आता आॅनलाईन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असून त्यातील आकडेही चक्रावून टाकणारे आहेत, त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालणे व घडलेले गुन्हे तातडीने उघडकीस आणण्यासाठी सायबर व आर्थिक गुन्हे या दोन्ही शाखांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.दरम्यान, जिल्ह्यातील अपघात व त्यात जीव जाणाऱ्यांची संख्या पाहता हा विषय चिंताजनक असून हे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील, असेही डॉ.उगले यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षकपदी जळगावात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच डॉ.पंजाबराव उगले यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, आगामी विधानसभा निवडणूक त्याशिवाय पोलीस दलातर्फे आगामी काळात केल्या जाणाºया उपाययोजना व उपक्रमांची माहिती डॉ.उगले यांनी दिली. त्यांच्याशी झालेला संवाद त्यांच्याच शब्दात.आॅनलाईन अपहार व फसवणुकीत मोठे आकडेगुन्हेगारी वाढली तशी गुन्ह्याची पध्दतही बदलत चालली आहे. आता मोबाईलवर आलेले संदेश किंवा इंटरनेटच्या माध्यमातून परस्पर खरेदी, बॅँक खात्यातून पैसे वळविणे, एटीएमद्वारे पैसे काढणे त्याशिवाय विविध योजना किंवा आमिष दाखवून लाखो, कोट्यवधीत गंडा घालण्याच्या गुन्ह्यांत वाढ होत चालली आहे.अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती करण्यासह तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेले अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करुन त्यांना प्रशिक्षण देणे,अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेतही अशाच पध्दतीचा बदल करुन या दोन्ही शाखांची क्षमता वाढविली जाणार असल्याचे डॉ.उगले यांनी सांगितले.जिल्ह्याची जनता शांतताप्रियजिल्ह्यात रुजू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्याचा अनुभव पाहता जिल्ह्याची जनता शांतताप्रिय आणि आदर करणारी आहे.येथे काम करायला खूप वाव आहे. १५ तालुके असल्याने जिल्हा तसा मोठा आहे. त्यामुळे समन्वयात अडचणी येत असल्याचे ते म्हणाले.जळगाव, भुसावळातील टोळ्यांवर कठोर कारवाईजळगाव व भुसावळ या दोन शहरात गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणात उदयास आलेल्या आहेत. या टोळींमध्ये तरुण वर्गच जास्त आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता या टोळ्या व गुन्हेगार यांच्यावर एमपीडीए व एमसीओसी सारख्या कठोर कारवाई करण्याबाबत हालचाली सुरु झालेल्या आहेत. गुन्हेगारांचा विषय गांभीर्याने घेतला आहे. नागरिकांनी अशा टोळ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जार्ईल, असेही आवाहन डॉ.उगले यांनी केले आहे.अपघाताच्या घटनात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाजिल्ह्यात अपघाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. अपघातात दर महिन्याला ८० ते ९० मृत्यू होतात. अनेक अपघातात खराब रस्ता, साईडपट्ट्या तसेच वळणावर सूचना फलक नसणे हे कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटनांमध्ये यापुढे संबंधित यंत्रणेवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे डॉ. उगले यांनी सांगितले. काही दिवसापूर्वी महामार्गावरील दूरदर्शन टॉवर ते जैन इरिगेशन कंपनी या मार्गाची पाहणी केली असता धक्कादायक स्थिती आढळून आली. दुचाकीस्वार तर जीव मुठीत घेऊन चालतो. याच मार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. ते रोखण्यासाठी ‘नही’ व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून उपाय योजना करण्याचे नियोजन आहे.हद्दपार आरोपींबाबत लवकरच निर्णयलोकसभा निवडणुकीत वेळ कमी असल्याने जास्त आरोपींना हद्दपार करता आले नाही. येत्या काळात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उपद्रवी व गुन्हेगार मोठ्या संख्येने हद्दपार झालेले असतील. हद्दपार केल्यानंतरही गुन्हेगार शहरात वावरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे.यात यंत्रणा कुठे कमी पडते कि आणखी काही वेगळे कारण आहे? याची माहिती काढली जात आहे. येत्या काळात निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव