शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काढलेल्या गतिरोधकामुळे खड्डयांमध्ये भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:47 IST

असून अडचण नसून खोळंबा : कर भरणाऱ्या नागरिकांच्या नशिबी खडड््यांचा फेरा सुटता सुटेना

जळगाव : शहरातील ८५० अनधिकृत गतिरोधक तोडायला मनपाने गेल्या महिन्यापासून सुरुवात केली आहे. गतीरोधक मुक्त शहर करायला गेलेल्या महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची प्रचिती जळगावकरांना येत आहे. मनपाकडून गतीरोधक काढल्यानंतर त्या ठिकाणचा रस्ता समतल केला जात नसल्याने आता गतीरोधकाच्या ठिकाणी भलेमोठे खड्डे तयार होत असल्याने गतिरोधकांची समस्या ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.महापालिकेकडून शहरातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले सर्व गतिरोधक हे अनधिकृत असून, याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने शहरातील सर्व गतिरोधक काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपाकडून १६ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व ८५० गतीरोधक काढायला सुरुवात झाली. अजूनही ही मोहीम सुरुच असून, काही भागातील गतीरोधक काढण्यात आले आहेत. तर काही ठिकाणचे गतीरोधक अद्याप कायम आहेत. अनेक ठिकाणी मनपाकडून गतीरोधक काढताना रस्ता खरडला जात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आधी गतीरोधक होते अशा ठिकाणी आता खड्डे तयार झाले आहेत. शहरात आधीच रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत, अशा परिस्थितीत गतिरोधक काढण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने वाहनधारकांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहेत.गतीरोधक काढण्याचे आदेश देवून अधिकारी रजेवरमनपा प्रशासनाने गतीरोधक काढण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवस गतीरोधक काढण्याचे काम व्यवस्थित सुरु होते.मात्र, दिवाळीनंतर हे काम थांबलेले दिसून येत आहे. तर काही ठिकाणी ओबङ-धोबड पध्दतीने हे काम सुरु आहे. मनपाचे बांधकाम विभागाचे अभियंताही रजेवर गेल्याने या कामाकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही.कलेक्टर व एसपी कार्यालयासमोर व्यवस्थित काममनपाकडून शहरातील गतिरोधक काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, काव्यरत्नावती चौक ते स्टेडीयम कॉम्पलेक्सपर्यंतच्या रस्त्यावर मनपाकडून व्यवस्थित काम झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व एसपी आॅफीस समोर गतिरोधक काढून रस्त्याशी समतल जागा करण्यात आली आहे. मात्र, इतर ठिकाणी असे चोख काम होताना दिसत नसून, एक तर गतिरोधक अपूर्ण काढले आहेत तर काही ठिकाणी गतिरोधक काढून जास्तच खड्डा पाडला आहे.उपनगर व इतर रस्त्यांवर परिस्थिती खराबगणेश कॉलनी, शिवाजी नगर, चित्रा चौक परिसर, रिंगरोड या भागातील रस्त्यांवरून गतीरोधक काढण्याचे काम ओबड-धोबड पध्दतीने झालेले दिसून येतआहे. याठिकाणी काम करताना जेसीबीव्दारे गतिरोधकाचे डांबरचे गोळे तसेच रस्त्यात पडू दिले जात आहेत. मनपाकडून रस्त्यांची दुरुस्तीही केली जात नाही तर दुसरीकडे गतीरोधक काढण्याचे काम देखील व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव