शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा फटका पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त

By admin | Updated: May 18, 2014 01:23 IST

तोरखेडा : शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे शनिवारी दुपारी २० मिनिटे झालेल्या वादळाचा मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना फटका बसला. यात पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त झाली

 तोरखेडा : शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे शनिवारी दुपारी २० मिनिटे झालेल्या वादळाचा मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना फटका बसला. यात पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त झाली असून, अनेक घरांवरील पत्रे उडाली आहेत. काकर्दा दिगर येथे शत्रुघ्न चंद्रसिंग भिल व भरत चंद्रसिंग भिल यांनी दोन दिवसांपूर्वी कच्च्या विटांचे घर बांधले होते. वादळी पावसाने या घरावरील पत्रे उडाली असून, पावसामुळे अन्नधान्याचे तसेच संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांचा पूर्ण संसार उघड्यावर आला आहे. तसेच अनिल रामदास मोरे यांनी ट्रॅक्टर व गुरेढोरे यांच्यासाठी पत्र्याचे शेड उभारले होते. वादळामुळे पत्र्याचे शेड खाली पडले. या वेळी सुदैवाने गुरे बाहेर असल्याने बचावली. मात्र हे शेड ट्रॅक्टरवर पडल्याने ट्रॅक्टरचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय छोटू रामा मोरे, रोहिदास गोरख कोळी, रामलाल गोरख कोळी, रामलाल गोरख कोळी, नाना गोरख कोळी, नीलेश दगा कोळी, गुलाब दगा कोळी, हिलाल सुकलाल कोळी, मोहन बाबू भिल व जंगूबाई भिल यांच्या घरावरील पत्रे उडाली. नितीन गुलाबराव गरुड यांनी दोन दिवसांपूर्वी चार एकर क्षेत्रात पपईची रोपे लावली होती. वादळाने ती सर्व उद्ध्वस्त झाली. यातून ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तुंबडू भटू गिरासे यांनी दोन दिवसांपूर्वी आठ एकर क्षेत्रात पपईची रोपे लावली होती. वादळी पावसाने ती जमीनदोस्त झाली असून, यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देवीदास गंजी मोरे यांनी आठवडाभरापूर्वी दोन एकर क्षेत्रात पपईची रोपे लावली होती. मात्र त्यातील निम्मे रोपे उद्ध्वस्त झालेली आहेत. काकर्दा दिगर येथील सरपंच शेवंता मंगलसिंग भिल व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक पाटील यांनी या भागाची पाहणी केली. (वार्ताहर)