शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भुसावळ ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 00:37 IST

मध्य रेल्वे : जळगाव ते शिरसोली दरम्यान ११ लहान तर ३ मोठे पूल उभारणार

जळगाव : पहिल्या टप्प्यात भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले असून भादली ते जळगाव या उर्वरित कामालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. तर आता जळगाव ते शिरसोली या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पिंप्राळा गेटपासून नुकतीच सुरुवात झाली आहे. या साडेअकरा किलोमीटरच्या मार्गावर ११ लहान पूल व ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली या मार्गावर अप व डाऊन हे दोनच मार्ग असल्यामुळे या दोन्ही मार्गावर दर दहा मिनिटाला गाड्या धावत असतात. गाड्यांची वर्दळ लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते मनमाड या तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजूरी दिली होती. यापैकी भुसावळ रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली . यामध्ये सुरुवातीला भुसावळ ते भादली य साडेअकरा किलो मीटरचे काम हाती घेतले होते. वर्षभरात हे काम पूर्ण करुन, भादली ते जळगाव या कामालाही लगेच सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, तरसोद, असोदा येथील शेतकऱ्यांना रेल्वेकडून पुरेसा मोबदला न मिळाल्यामुळे, हे काम थांबले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन, भादली ते जळगाव या उर्वरित मार्गाच्या कामालाही गेल्या आठवड्यात सुरुवात केली आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात -गेल्या आठवड्यात जळगाव ते मनमाड या १६० किलो मीटरच्या तिसºया रेल्वे मार्गाचे रेल्वेचे उप मुख्य अभियंता रोहित थावरे व इतर अधिकाऱ्यांनी यांनी मोजमाप केले होते. मोजमाप केल्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवातदेखील झाली आहे. जळगाव ते शिरसोली या ११ किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी ११ लहान पूल उभारले जाणार आहेत. तर मोठ्या आकाराचे ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत. आधी पूलांची उभारणी केल्यावर, त्यानंतर रुळ टाकले जाणार आहेत.डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, सध्या जेसीबीच्या सहाय्याने जमिन सपाटीकरणाचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यातही हे काम सुरु राहणार असून, भुसावळ येथील बी. एम. अग्रवाल व जळगाव येथील एम. एस. जैन या मक्तेदारांमार्फत या तिसऱ्या मार्गाचे काम करण्यात येत असल्याचे उप मुख्य अभियंता रोहित थावरे यांनी सांगितले.

शिरसोलीपर्यंत रेल्वेच्या हद्दीतच तिसरा मार्ग :भादली ते जळगाव या तिसºया मार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडे पुरेशी जागा नसल्यामुळे, हे काम रखडले होते. मात्र, जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेच्या हद्दीत पुरेशी जागा असल्यामुळे, हा तिसरा मार्ग रेल्वेच्या हद्दीतच तयार केला जाणार आहे. तर शिरसोलीपासून पुढे पाचोऱ्यापर्यंत रेल्वेची हद्द सोडून, तिसºया मार्गासाठी लागणाºया जागेसाठी भूसंपादनाच्या कामाला रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच सुरुवात केली जाणार आहे.तिसऱ्या रेल्वेच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला पुलांची उभारणी केली जाणार असून, त्यानंतर रुळ टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जळगाव ते शिरसोली हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. -रोहित थावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ