शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:07 IST

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे.

प्रशांत भदाणे -​​​​​​​जळगाव- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून संपावर आहेत. संप मिटावा म्हणून राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यानं संप चिघळला आहे. यामुळे पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, तर काही कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निवडला आहे. पाहुयात अशाच एका एसटी कर्मचाऱ्याची व्यथा, उदरनिर्वाहासाठी हा कर्मचारी करत असलेली धडपड पाहून तुमचेही डोळे पाणावतील...

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे. ही रसवंती चालवणारी व्यक्ती एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे. प्रवीण चौधरी असं या वाहकाचं नाव. एसटीच्या संपामुळं उपासमारीची वेळ आल्यानं प्रवीण यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन रसवंती सुरू केली आहे. हाताला ऊस काढण्याची सवय नाही, पण परिस्थितीनं त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. आधीच कोरोनामुळं वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचारी अडचणीत होते. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं संप चिघळला. अशा परिस्थितीत घर चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण झालंय. प्रवीण यांच्यावर म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी आहे. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं त्यांनी अखेर व्याजाने पैसे घेऊन रसवंती सुरू केली.

प्रवीण चौधरी मूळचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावचे रहिवासी आहेत. ते 2009 मध्ये एसटी महामंडळाच्या पालघर विभागात वाहक म्हणून नोकरीला आहेत. यानंतर त्यांनी भिवंडी येथे सेवा बजावली. सध्या ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आगारात सेवेत आहेत. 12 ते 13 वर्षे सेवा झाली असली तरी त्यांच्या हातात अवघा 8 ते 9 हजार रुपये पगार येतो. एवढ्या कमी पगारदार घर चालवताना खूप कसरत होते. आता परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. पण प्रत्यक्षात ही पगारवाढ 21 ते 22 टक्केच असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. ही पगारवाढ घेऊनही फायदा नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

बिकट परिस्थितीमुळं आजपर्यंत 85 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीये. सरकारने मागण्या अशाच दुर्लक्षित केल्या तर विपरीत घडू शकतं. असं होऊ नये म्हणून सरकारनं एसटीचं विलिनीकरण करावं, अशी आग्रही मागणी प्रवीण चौधरींनी यावेळी केली.

अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे प्रवीण हे राज्यात एकटे नाहीत, असे हजारो प्रवीण आज उदरनिर्वाहासाठी डोक्याला हात लावून बसलेत. त्यांच्या मागण्यांकडे मायबाप सरकार आतातरी लक्ष देईल का? हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपJalgaonजळगाव