शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:07 IST

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे.

प्रशांत भदाणे -​​​​​​​जळगाव- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून संपावर आहेत. संप मिटावा म्हणून राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यानं संप चिघळला आहे. यामुळे पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, तर काही कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निवडला आहे. पाहुयात अशाच एका एसटी कर्मचाऱ्याची व्यथा, उदरनिर्वाहासाठी हा कर्मचारी करत असलेली धडपड पाहून तुमचेही डोळे पाणावतील...

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे. ही रसवंती चालवणारी व्यक्ती एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे. प्रवीण चौधरी असं या वाहकाचं नाव. एसटीच्या संपामुळं उपासमारीची वेळ आल्यानं प्रवीण यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन रसवंती सुरू केली आहे. हाताला ऊस काढण्याची सवय नाही, पण परिस्थितीनं त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. आधीच कोरोनामुळं वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचारी अडचणीत होते. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं संप चिघळला. अशा परिस्थितीत घर चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण झालंय. प्रवीण यांच्यावर म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी आहे. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं त्यांनी अखेर व्याजाने पैसे घेऊन रसवंती सुरू केली.

प्रवीण चौधरी मूळचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावचे रहिवासी आहेत. ते 2009 मध्ये एसटी महामंडळाच्या पालघर विभागात वाहक म्हणून नोकरीला आहेत. यानंतर त्यांनी भिवंडी येथे सेवा बजावली. सध्या ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आगारात सेवेत आहेत. 12 ते 13 वर्षे सेवा झाली असली तरी त्यांच्या हातात अवघा 8 ते 9 हजार रुपये पगार येतो. एवढ्या कमी पगारदार घर चालवताना खूप कसरत होते. आता परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. पण प्रत्यक्षात ही पगारवाढ 21 ते 22 टक्केच असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. ही पगारवाढ घेऊनही फायदा नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

बिकट परिस्थितीमुळं आजपर्यंत 85 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीये. सरकारने मागण्या अशाच दुर्लक्षित केल्या तर विपरीत घडू शकतं. असं होऊ नये म्हणून सरकारनं एसटीचं विलिनीकरण करावं, अशी आग्रही मागणी प्रवीण चौधरींनी यावेळी केली.

अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे प्रवीण हे राज्यात एकटे नाहीत, असे हजारो प्रवीण आज उदरनिर्वाहासाठी डोक्याला हात लावून बसलेत. त्यांच्या मागण्यांकडे मायबाप सरकार आतातरी लक्ष देईल का? हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपJalgaonजळगाव