शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:07 IST

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे.

प्रशांत भदाणे -​​​​​​​जळगाव- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून संपावर आहेत. संप मिटावा म्हणून राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यानं संप चिघळला आहे. यामुळे पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, तर काही कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निवडला आहे. पाहुयात अशाच एका एसटी कर्मचाऱ्याची व्यथा, उदरनिर्वाहासाठी हा कर्मचारी करत असलेली धडपड पाहून तुमचेही डोळे पाणावतील...

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे. ही रसवंती चालवणारी व्यक्ती एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे. प्रवीण चौधरी असं या वाहकाचं नाव. एसटीच्या संपामुळं उपासमारीची वेळ आल्यानं प्रवीण यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन रसवंती सुरू केली आहे. हाताला ऊस काढण्याची सवय नाही, पण परिस्थितीनं त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. आधीच कोरोनामुळं वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचारी अडचणीत होते. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं संप चिघळला. अशा परिस्थितीत घर चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण झालंय. प्रवीण यांच्यावर म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी आहे. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं त्यांनी अखेर व्याजाने पैसे घेऊन रसवंती सुरू केली.

प्रवीण चौधरी मूळचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावचे रहिवासी आहेत. ते 2009 मध्ये एसटी महामंडळाच्या पालघर विभागात वाहक म्हणून नोकरीला आहेत. यानंतर त्यांनी भिवंडी येथे सेवा बजावली. सध्या ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आगारात सेवेत आहेत. 12 ते 13 वर्षे सेवा झाली असली तरी त्यांच्या हातात अवघा 8 ते 9 हजार रुपये पगार येतो. एवढ्या कमी पगारदार घर चालवताना खूप कसरत होते. आता परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. पण प्रत्यक्षात ही पगारवाढ 21 ते 22 टक्केच असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. ही पगारवाढ घेऊनही फायदा नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

बिकट परिस्थितीमुळं आजपर्यंत 85 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीये. सरकारने मागण्या अशाच दुर्लक्षित केल्या तर विपरीत घडू शकतं. असं होऊ नये म्हणून सरकारनं एसटीचं विलिनीकरण करावं, अशी आग्रही मागणी प्रवीण चौधरींनी यावेळी केली.

अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे प्रवीण हे राज्यात एकटे नाहीत, असे हजारो प्रवीण आज उदरनिर्वाहासाठी डोक्याला हात लावून बसलेत. त्यांच्या मागण्यांकडे मायबाप सरकार आतातरी लक्ष देईल का? हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपJalgaonजळगाव