शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

वसंत मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:13 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रमोद पिवटे...

आकाशात संथ वाहणारं आभाळ एकाएकी दिसेनासं होतं आणि पहाटेच्या निरव शांततेला भंग करून कर्ण छेदणारा पण गोड असा कोकिळेचा सुरेल आवाज जेव्हा साखर झोप मोडून गुंजतो तेव्हाच वसंताची चाहुल लागते. अगदी पहाटेच्या गार मंद वाऱ्यात कुठेतरी शिळ घातल्यागत. हवेत मंद मंद सुगंध दरवळत येऊन मनास भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. कुठे गोठ्यातला गोहंबर माडावर अगदी दूरवर घुमत दूर दूर ठाव घेत जातो, तेव्हा वासरमणी उल्हासून वरवर येत जातो. रात्रीच्या गर्भातून जणू काही तो एक एक पैलू या भुतली आरास मांडत जन्म घेतो आणि साऱ्या सृष्टीला नवा आयाम देऊन जन्मास घालतो. लांडोरीच्या पदन्यासात रान सारं जागं होते आणि कुठे गावातल्या ललनेच्या पायातील पैजणं वाजायला लागतात. कुठे गोड कडेवरी घागर पाण्याची ठुमकत जाते तर कुठे ओल्या नाभीचा ठाव घेऊन पदर चुंबन घेतो. पाखरांची ओळ मध्येच भ्रमुनी इवल्या चोचींना भरवण्या घरटे सोडतात तेव्हा गलबलून जातो शिवार. वसंताच्या पानझडीत कुठेतरी बोडके झालेले शिवारात अधून-मधून लालबुंद केशराच्या फुलझड्या रंग उधळताना दिसतो तो पळस आणि मग उष्ण लहरी तरळतात मातीवर जणू नागिणीच्या तालावर. गावातला वड आणि पिंपळाने आच्छादलेला पार गजबजतो गावातील लोकांनी आणि इथंच सुख दुखाच्या सग्या सोयऱ्यांच्या कथा ऐकीवात येतात, यातच गावाचा मूळ इतिहास नव्या पिढीला उमगतो थंड थंड दाट साऊलीत. काकुडतीला आलेल्या शिवारात कुठे आंब्यांची दाट अमराई आणि या अमराईत पानांआड लपलेले पोपटी राघवराज, तर मध्येच एखाद्या फांदीवर घोंगावणाºया मधमाशांच पोळं कुठेतरी पाण्याचा शोध घेत निघालेलं. वाटेत भेटणाराही अदबीनं थांबून पायवाटेच्या वाटसरूला पाण्याचा एक मघ भरून तृप्त करणारा बळीराजा आणि तहानेने तृप्त झालेल्या वाटसरूला माहेरवासीणसारखा कुठे जायचं होतं पाहुणं म्हणून विचारणारा. किती किती सुखावह, आंबटगोड सरबताच्या तोडीला तोड. घरापुढच्या झाडावर पक्षी गुंजन करीत रहावं म्हणून टांगलेलं पाणपात्र. तसंच माहेरची आस लागलेली सासरवासीण कन्या. ‘केव्हा येईल मुºहाई माझा घेऊन घुंगरगाडी अन्केव्हा नेसेल मी माहेरची साडी. घेऊन गिरकी, केव्हा गाईल सई संगे गाणी’. अशा पश्चिमेच्या संध्येला पिवळ्या केशरी नारंगी छटांची वर्खरी लोभस मनमोहिनी जणू वाट पाहते कुणी एक साजणी. म्हणूनच याच सम सखी एकमेकींच्या डोळ्यास विचारती होते. ‘सई सांगते कानात, आगळा यंदा आयाजीचा सण. किती हर्षोल्हासित वसंत, पिवळ्या हातावर मेंधीचे कोंदण, देवा भेटू दे पुन्हा याच अंगणी, एका सईचं एवढंच मागणं. पुन्हा केव्हा येईल जीवनी नांदाया असाच वसंत...-प्रमोद पिवटे, मुक्ताईनगर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यMuktainagarमुक्ताईनगर