शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वसंत मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:13 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रमोद पिवटे...

आकाशात संथ वाहणारं आभाळ एकाएकी दिसेनासं होतं आणि पहाटेच्या निरव शांततेला भंग करून कर्ण छेदणारा पण गोड असा कोकिळेचा सुरेल आवाज जेव्हा साखर झोप मोडून गुंजतो तेव्हाच वसंताची चाहुल लागते. अगदी पहाटेच्या गार मंद वाऱ्यात कुठेतरी शिळ घातल्यागत. हवेत मंद मंद सुगंध दरवळत येऊन मनास भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. कुठे गोठ्यातला गोहंबर माडावर अगदी दूरवर घुमत दूर दूर ठाव घेत जातो, तेव्हा वासरमणी उल्हासून वरवर येत जातो. रात्रीच्या गर्भातून जणू काही तो एक एक पैलू या भुतली आरास मांडत जन्म घेतो आणि साऱ्या सृष्टीला नवा आयाम देऊन जन्मास घालतो. लांडोरीच्या पदन्यासात रान सारं जागं होते आणि कुठे गावातल्या ललनेच्या पायातील पैजणं वाजायला लागतात. कुठे गोड कडेवरी घागर पाण्याची ठुमकत जाते तर कुठे ओल्या नाभीचा ठाव घेऊन पदर चुंबन घेतो. पाखरांची ओळ मध्येच भ्रमुनी इवल्या चोचींना भरवण्या घरटे सोडतात तेव्हा गलबलून जातो शिवार. वसंताच्या पानझडीत कुठेतरी बोडके झालेले शिवारात अधून-मधून लालबुंद केशराच्या फुलझड्या रंग उधळताना दिसतो तो पळस आणि मग उष्ण लहरी तरळतात मातीवर जणू नागिणीच्या तालावर. गावातला वड आणि पिंपळाने आच्छादलेला पार गजबजतो गावातील लोकांनी आणि इथंच सुख दुखाच्या सग्या सोयऱ्यांच्या कथा ऐकीवात येतात, यातच गावाचा मूळ इतिहास नव्या पिढीला उमगतो थंड थंड दाट साऊलीत. काकुडतीला आलेल्या शिवारात कुठे आंब्यांची दाट अमराई आणि या अमराईत पानांआड लपलेले पोपटी राघवराज, तर मध्येच एखाद्या फांदीवर घोंगावणाºया मधमाशांच पोळं कुठेतरी पाण्याचा शोध घेत निघालेलं. वाटेत भेटणाराही अदबीनं थांबून पायवाटेच्या वाटसरूला पाण्याचा एक मघ भरून तृप्त करणारा बळीराजा आणि तहानेने तृप्त झालेल्या वाटसरूला माहेरवासीणसारखा कुठे जायचं होतं पाहुणं म्हणून विचारणारा. किती किती सुखावह, आंबटगोड सरबताच्या तोडीला तोड. घरापुढच्या झाडावर पक्षी गुंजन करीत रहावं म्हणून टांगलेलं पाणपात्र. तसंच माहेरची आस लागलेली सासरवासीण कन्या. ‘केव्हा येईल मुºहाई माझा घेऊन घुंगरगाडी अन्केव्हा नेसेल मी माहेरची साडी. घेऊन गिरकी, केव्हा गाईल सई संगे गाणी’. अशा पश्चिमेच्या संध्येला पिवळ्या केशरी नारंगी छटांची वर्खरी लोभस मनमोहिनी जणू वाट पाहते कुणी एक साजणी. म्हणूनच याच सम सखी एकमेकींच्या डोळ्यास विचारती होते. ‘सई सांगते कानात, आगळा यंदा आयाजीचा सण. किती हर्षोल्हासित वसंत, पिवळ्या हातावर मेंधीचे कोंदण, देवा भेटू दे पुन्हा याच अंगणी, एका सईचं एवढंच मागणं. पुन्हा केव्हा येईल जीवनी नांदाया असाच वसंत...-प्रमोद पिवटे, मुक्ताईनगर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यMuktainagarमुक्ताईनगर