शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रस्त्यांच्या प्रश्नावर मनपाची विशेष महासभा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 12:41 IST

जळगाव : शहरातील रस्त्यांचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जात असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ...

जळगाव : शहरातील रस्त्यांचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जात असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिक व विरोधक व नागरिकांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलेच टार्गेट केले जात आहे. तसेच ‘लोकमत’ ने देखील हा मुद्दा लावून धरला आहे. सत्ताधाऱ्यांनी आता रस्त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रभागनिहाय ५० लाख याप्रमाणे एकूण १० कोटींच्या निधीची तरतूद मनपाकडून केली जाणार असून, यासाठी मनपाकडून लवकरच विशेष महासभेचे नियोजन आखण्यात आले आहे.मनपाकडून आता लवकरच रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ही रक्कम कमी पडेल. त्यामुळे या निधीत ५ कोटींची वाढ करून प्रत्येक प्रभागात ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. मनपाकडून सध्या २४ लाखाच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र, यामध्ये कॉलनी भागातील रस्त्यांची दुरुस्ती होणे शक्य नाही. तसेच मुख्य शहरात ही या निधीतून किरकोळ दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे प्रभागनिहाय ५० लाखातून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी पदाधिकाºयांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता १० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.या निधीबाबत महासभेत विशेष मंजूरी घेण्यात येणार आहे.मनपात उद्या बैठकशहरातील रस्त्यांबाबत एका एजन्सीने १०० कोटींचे नवीन रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव मनपाला दिला आहे. तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्यात मिळाली तरी चालेल असे या एजन्सीचे म्हणणे आहे. याबाबत आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्यासह सर्वच पदाधिकारी आग्रही आहेत. या रस्त्यांच्या पार्श्वभूमीवर अंतीम चर्चा करण्यासाठी शुक्रवारी मनपात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मनपा आयुक्त देखील उपस्थित राहणार आहेत. नगरसेवकांकडून मुख्य रस्त्यांसह कॉलनी भागातील रस्त्यांचेही प्रस्ताव मागविण्यात आले असून, या प्रस्तावांवर देखील प्राथमिक चर्चा मनपाच्या बैठकीत होणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव