शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

गिरणेचे पाणी उतरताच वाळूउपसा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST

महसुल प्रशासनाने गिरणा नदीला सोडले वाऱ्यावर : ‘ॲक्शन प्लॅन’ची घोषणा हवेतच विरली; ठेका नसतानाही शेकडो दररोज शेकडो ब्रास उपसा ...

महसुल प्रशासनाने गिरणा नदीला सोडले वाऱ्यावर : ‘ॲक्शन प्लॅन’ची घोषणा हवेतच विरली; ठेका नसतानाही शेकडो दररोज शेकडो ब्रास उपसा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, बांभोरी या भागातील गिरणा नदीपात्रातील पुराचे पाणी कमी होताच, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूउपसा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे भर दिवसा उपसा होवून जळगाव शहरातून सर्रासपणे वाळूने भरलेले डंपर व ट्रॅक्टर ये-जा करत असताना देखील या प्रश्नाकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक दिवसांपासून महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई देखील केली जात नसून, प्रशासनाने एकप्रकारे वाळूमाफियांना मोकळे रानच दिल्याचे दिसून येत आहे.

वाळूउपसा करण्यासोबतच गिरणा काठावरील अनेक गावांमध्ये वाळूमाफियांकडून वाळूचे साठे केले जात आहेत. नदीला पाणी येताच या साठ्यांवरून उपसा केला जात आहे. नदीला पाणी आल्यानंतर वाळू मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत साठ्यांवरील वाळू जास्त भावाने विक्री करण्याचा गोरखधंदा वाळूमाफियांकडून सुरू असून, या धंद्याला प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांकडून अभय देण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे थेट नदीत पाणी असतानाही जेसीबीच्या साहाय्याने उपसा केला जात आहे.

ठेका नसतानाही दररोज केला जातोय अनधिकृतरित्या शेकडो ब्रास उपसा

जिल्ह्यात वाळूउपसासाठी कोणताही ठेका प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. मात्र, तरीही गिरणा नदीपात्रातील आव्हाणे, खेडी, निमखेडी व बांभोरी परिसरातून दररोज शेकडो ब्रास वाळूउपसा केला जात आहे. एका दिवसात तब्बल २० लाखांहून अधिकच्या किमतीची वाळू अनधिकृतपणे उचलली जात आहे. यामुळे प्रशासनाचा महसूल तर बुडतच आहे. मात्र, गिरणा नदीपात्रातील उपसा होत असल्याने भूजलपातळी देखील खालावत आहे. गिरणा पात्रात अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडून अनेक ठिकाणी खडक देखील लागला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’ नावालाच

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मध्यंतरी अवैध वाळूउपशावर बऱ्यापैकी लगाम लावली होती. तसेच आव्हाणे, निमखेडी भागातील वाळूउपसा रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’देखील तयार केला होता. मात्र, वर्षभरातच हा ॲक्शन प्लॅन केवळ कागदावरच राहिला आहे. महसूल प्रशासनाकडून गिरणेतील अनधिकृत वाळूउपसा रोखण्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाळूउपशाबाबत प्रशासनावर टीका झाल्यानंतर एखाद कारवाई करून, औपचारिकता दाखवली जात आहे.

१. शेतकऱ्यांना दाखवली जाते ‘दादागिरी’

वडनगरी भागातील एका शेतकऱ्याचा गोठ्यासमोर अनेक वाळूमाफियांनी गिरणेतून उपसा करून, ठिय्या मांडले आहेत. शेतकऱ्यांकडून याबाबत विरोध होताच शेतकऱ्यांना दादागिरी दाखवली जात आहे. शेतकरी देखील घाबरून याबाबत कोणतीही तक्रार करायला पुढे येत नाहीत.

२. ग्रामदक्षता समिती नावालाच

गावातील वाळूउपसा रोखण्याची जबाबदारी ही गावातील ग्राम दक्षता समितीवर सोपविण्यात आली होती. मात्र, या समित्या केवळ नावालाच ठरल्या असून, या समित्यांकडूनच वाळूमाफियांना खुली सूट दिली जात आहे. प्रशासनाने ग्रामदक्षता समित्यांवर जबाबदारी सोपवून आपल्या जबाबदारीपासून पळ काढला आहे.