शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप

By सुनील पाटील | Updated: April 19, 2023 18:27 IST

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो.

जळगाव : साफसफाईचा कचरा भरताना त्यात वजन वाढविण्यासाठी चक्क माती भरली जात असल्याचा प्रकार बुधवारी निवृत्ती नगरात उघडकीस आला आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून जळगावकरांच्या पैशाची लूट होत आहे. या प्रकारानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख नीलेश पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या कानावर हा प्रकार घातला. भविष्यात असा प्रकार झाला तर मक्तेदाराला काळे फासण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित मक्तेदाराला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्याशिवाय कॉलनी व गल्ल्यांमध्ये उघड्यावर असलेला कचरा संकलित करुन तो शहराच्या बाहेर टाकला जातो. कचऱ्याच्या एकूण वजनावर कंपनीला मोबदला अदा केला जातो. वॉटरग्रेस कंपनी व महापालिका यांच्यात कचऱ्याचा करार झालेला आहे. एका टनासाठी ९७० रुपये असा मोबदला देण्यात येतो. शहरातून एका दिवसाला ३१० टनापेक्षा जास्त कचरा संकलित होत असल्याचे दाखविले जाते. कचऱ्यात माती भरुन वजन वाढविले जात असेल तर खरोखर कचरा किती असू शकतो, याचा अंदाज येतो. कचऱ्याच्या नावाने माती भरण्याचे उद्योग करुन एक प्रकारे जनतेच्या पैशाची लूट होत आहे.शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख नीलेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने करारनाम्यातील अटीशर्तीचे उल्लंघन केले म्हणून कंत्राटदारला जागेवरच पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. त्याशिवाय गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव