शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप

By सुनील पाटील | Updated: April 19, 2023 18:27 IST

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो.

जळगाव : साफसफाईचा कचरा भरताना त्यात वजन वाढविण्यासाठी चक्क माती भरली जात असल्याचा प्रकार बुधवारी निवृत्ती नगरात उघडकीस आला आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून जळगावकरांच्या पैशाची लूट होत आहे. या प्रकारानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख नीलेश पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या कानावर हा प्रकार घातला. भविष्यात असा प्रकार झाला तर मक्तेदाराला काळे फासण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित मक्तेदाराला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्याशिवाय कॉलनी व गल्ल्यांमध्ये उघड्यावर असलेला कचरा संकलित करुन तो शहराच्या बाहेर टाकला जातो. कचऱ्याच्या एकूण वजनावर कंपनीला मोबदला अदा केला जातो. वॉटरग्रेस कंपनी व महापालिका यांच्यात कचऱ्याचा करार झालेला आहे. एका टनासाठी ९७० रुपये असा मोबदला देण्यात येतो. शहरातून एका दिवसाला ३१० टनापेक्षा जास्त कचरा संकलित होत असल्याचे दाखविले जाते. कचऱ्यात माती भरुन वजन वाढविले जात असेल तर खरोखर कचरा किती असू शकतो, याचा अंदाज येतो. कचऱ्याच्या नावाने माती भरण्याचे उद्योग करुन एक प्रकारे जनतेच्या पैशाची लूट होत आहे.शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख नीलेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने करारनाम्यातील अटीशर्तीचे उल्लंघन केले म्हणून कंत्राटदारला जागेवरच पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. त्याशिवाय गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव